शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
3
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
4
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
5
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
6
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
7
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
8
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
9
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
10
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
11
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
12
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
13
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
14
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
15
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
16
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
17
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
18
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
19
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
20
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!

माझे कुटुंब माझी जबाबदारी याबाबत विभागीय आयुक्तांची नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:24 IST

तळोदा- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ अभियान शहादा शहराबरोबरच तळोदा शहर व ग्रामीण भागात अत्यंत उदासीनतेने ...

तळोदा- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ अभियान शहादा शहराबरोबरच तळोदा शहर व ग्रामीण भागात अत्यंत उदासीनतेने चालू असून संशयित आढळलेल्या ३६१ रुग्णांपैकी केवळ २० जणांचे स्वॅब घेण्यात आले आहे. साहजिकच, येथील यंत्रणेच्या कामाबाबत विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करून जिल्हा परिषद प्रशासनास दखल घेण्याचे पत्रात सूचित केले आहे.

कोरोना महामारीने दिवसेंदिवस अक्षरशः उग्र स्वरूप धारण केले आहे. परिणामी, संपूर्ण राज्यात रुग्णवाढीचा वेग प्रचंड वाढला आहे. परिणामी, शासनानेदेखील लॉकडाऊनसारखे कडक निर्बंध लावले आहे. त्याउपरही रुग्णसंख्या आवाक्यात येत नसल्याचे चित्र आहे. गेल्या वर्षी माझे कुटुंब माझी जबाबदारी अभियान राबविण्यात आले होते. त्याला चांगला प्रतिसाद मिळून कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाला यश आले होते. साहजिकच, शासनाने २९ तारखेपासून पुन्हा हे अभियान सुरू केले आहे. गुरुवारपासून संपूर्ण आठवडाभर अभियान शहराबरोबरच ग्रामीण भागात सुरू झाले आहे. या अंतर्गत प्रत्येक कुटुंबाची आरोग्याची माहिती घेतली जात आहे. प्राथमिक, माध्यमिक, अंगणवाडीसेविका, आशा कार्यकर्त्या आशा कर्मचारी यांच्यामार्फत कुटुंबांचे सर्वेक्षण केले जात आहे. यात प्रत्येकाचे तापमान, ऑक्सिजन, इतर लक्षणे अशी माहिती घेतली जात आहे. तथापि, हे अभियान सुरू करून तीन दिवस झाले. तरीही शहादा, तळोदा शहरांबरोबरच ग्रामीण भागात अत्यंत संथगतीने सुरू आहे. तेथील अधिकारी, कर्मचाऱ्यांना अभियानाचे गांभीर्य नसल्याचे पत्रात विभागीय आयुक्त राधाकृष्ण गेम यांनी नमूद केले आहे. एवढेच नव्हे या सर्वेक्षणात ३६१ कोरोना संशयित आढळून आले आहेत. त्यांच्यापैकी केवळ २० जणांचे स्वॅब टेस्टिंग केल्याचा ठपका पत्रात ठेवला आहे. वास्तविक, या सर्वेक्षणातून कोरोना संशयित रुग्ण निश्चितच समोर येतील. त्यामुळेच शासनाने पुन्हा अभियान सुरू केले आहे. परंतु, त्याची अंमलबजावणी प्रभावीपणे होत नसल्यामुळे अभियानाचा हेतू सफल होत नाही. त्यामुळे संबंधित प्रशासनाने गांभीर्याने घेऊन कर्मचाऱ्यांना सूचना द्याव्यात, अशी सूचना मांडली आहे. दरम्यान, शेजारच्या धुळे, जळगाव जिल्ह्यांतील पारोळा, सावदा, जामनेर ग्रामीण येथे तसेच चित्र आहे. २,५६० संशयितांपैकी ६६० जणांची कोरोना चाचणी घेण्यात आलेली नाही. धुळ्याठी ४७८ संशयितांपैकी एकाचीही स्वॅब टेस्टिंग करण्यात आली नसल्याचे म्हटले आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने दखल घेऊन तातडीने कार्यवाही करून तसा अहवाल पाठवण्याची सूचना देण्यात आली आहे.

ग्रामीण भागात कुटुंबांचे असहकार्य

शासनाने कोरोना महामारीचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण व माझे कुटुंब माझी जबाबदारी अभियान राबविण्याचे निर्देश दिले असले, तरी ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात कुटुंबे सर्वेक्षणास सहकार्य करत नसल्याचे चित्र आहे. आधीच लसीकरणाच्या अफवांमुळे लसीकरणाविषयी प्रचंड दहशत आहे. सर्वेक्षण व जनजागृती करणारे कर्मचारी त्यांचे प्रबोधन करतात, मात्र अशिक्षितपणामुळे ते ऐकायला तयार नसतात. अशा घटनांमुळे कर्मचाऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. निदान, वरिष्ठ अधिकारी यांनीदेखील स्वतः गावकऱ्यांचे प्रबोधन करणे गरजेचे आहे.