शहरं
Join us  
Trending Stories
1
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
2
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
3
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
4
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?
5
३ वर्षात १ लाखाचे झाले १५ लाखांपेक्षा अधिक, ६ महिन्यांत १८०% नं वधारला स्टॉक
6
"हे विजयाचं परिमाण असू शकत नाही, भारताने...!"; भारत-पाकिस्तान सामन्यासंदर्भात काय म्हणाले ओवेसी?
7
एकीकडे 'घरवाली' दुसरीकडे 'बाहेरवाली'; दोघींसोबत आनंदाने जगत होता तरुण अन् एक दिवस असं काही झालं... 
8
पितृपक्ष इंदिरा एकादशी २०२५: १० राशींवर श्रीहरी प्रसन्न, शिव-गौरी-लक्ष्मी कृपा; शुभ-लाभ-पैसा!
9
'क्रिस्टल ब्लॅक पर्ल' रंगात होंडा अमेझ भारतात लॉन्च; नव्या लूकमध्ये दिसते आणखी धासू!
10
बीचवर फिरायला गेलेल्या तरुणीवर बॉयफ्रेंडसमोरच सामूहिक बलात्कार; पोलिसांनी आरोपी कसे शोधले?
11
महाराष्ट्रात ७९ ठिकाणी शेतकरी भवन उभारणार; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ८ महत्त्वाचे निर्णय
12
आयटी इंजिनिअरने १० टक्के पगारवाढ मागितली, नोकरी गमावली; मग त्याला काढणाऱ्याचीही गेली...
13
भारत आणि चीनचं टेन्शन वाढवणार युरोपियन युनियन! अमेरिकेच्या समोर झुकलं का EU?
14
'ओझेम्पिक टीथ' म्हणजे काय? वजन कमी करण्याच्या औषधाचा होतोय 'असा' दुष्परिणाम
15
Nupur Bora: नुपूर बोरा आहे तरी कोण? सहा वर्षात अनेक गैरव्यवहार, घरातही सापडलं मोठं घबाड!
16
निष्पाप लेकरावर दयाही आली नाही! ७ वर्षांच्या मुलीला तिसऱ्या मजल्यावरून फेकलं, सावत्र आईचा गुन्हा 'असा' झाला उघड
17
6G क्षेत्रात भारताची मोठी झेप, IIT हैदराबादने विकसित केले प्रोटोटाइप; 2030 पर्यंत लॉन्च होणार
18
दही, दूध, लोणी घागर भरूनी...! सर्व स्वस्त झाले, या मोठ्या डेअरीने GST कपातीपूर्वीच घोषणा केली
19
बंगल्याचा हव्यास, गोविंद बरगेंचा छळ; पूजा गायकवाडचा तुरुंगातील मुक्काम वाढला
20
ITR भरण्यासाठी उरले शेवटचे काही तास! आयकर विभागाकडून करदात्यांसाठी ६ टिप्स

माझे कुटुंब माझी जबाबदारी याबाबत विभागीय आयुक्तांची नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:24 IST

तळोदा- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ अभियान शहादा शहराबरोबरच तळोदा शहर व ग्रामीण भागात अत्यंत उदासीनतेने ...

तळोदा- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ अभियान शहादा शहराबरोबरच तळोदा शहर व ग्रामीण भागात अत्यंत उदासीनतेने चालू असून संशयित आढळलेल्या ३६१ रुग्णांपैकी केवळ २० जणांचे स्वॅब घेण्यात आले आहे. साहजिकच, येथील यंत्रणेच्या कामाबाबत विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करून जिल्हा परिषद प्रशासनास दखल घेण्याचे पत्रात सूचित केले आहे.

कोरोना महामारीने दिवसेंदिवस अक्षरशः उग्र स्वरूप धारण केले आहे. परिणामी, संपूर्ण राज्यात रुग्णवाढीचा वेग प्रचंड वाढला आहे. परिणामी, शासनानेदेखील लॉकडाऊनसारखे कडक निर्बंध लावले आहे. त्याउपरही रुग्णसंख्या आवाक्यात येत नसल्याचे चित्र आहे. गेल्या वर्षी माझे कुटुंब माझी जबाबदारी अभियान राबविण्यात आले होते. त्याला चांगला प्रतिसाद मिळून कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाला यश आले होते. साहजिकच, शासनाने २९ तारखेपासून पुन्हा हे अभियान सुरू केले आहे. गुरुवारपासून संपूर्ण आठवडाभर अभियान शहराबरोबरच ग्रामीण भागात सुरू झाले आहे. या अंतर्गत प्रत्येक कुटुंबाची आरोग्याची माहिती घेतली जात आहे. प्राथमिक, माध्यमिक, अंगणवाडीसेविका, आशा कार्यकर्त्या आशा कर्मचारी यांच्यामार्फत कुटुंबांचे सर्वेक्षण केले जात आहे. यात प्रत्येकाचे तापमान, ऑक्सिजन, इतर लक्षणे अशी माहिती घेतली जात आहे. तथापि, हे अभियान सुरू करून तीन दिवस झाले. तरीही शहादा, तळोदा शहरांबरोबरच ग्रामीण भागात अत्यंत संथगतीने सुरू आहे. तेथील अधिकारी, कर्मचाऱ्यांना अभियानाचे गांभीर्य नसल्याचे पत्रात विभागीय आयुक्त राधाकृष्ण गेम यांनी नमूद केले आहे. एवढेच नव्हे या सर्वेक्षणात ३६१ कोरोना संशयित आढळून आले आहेत. त्यांच्यापैकी केवळ २० जणांचे स्वॅब टेस्टिंग केल्याचा ठपका पत्रात ठेवला आहे. वास्तविक, या सर्वेक्षणातून कोरोना संशयित रुग्ण निश्चितच समोर येतील. त्यामुळेच शासनाने पुन्हा अभियान सुरू केले आहे. परंतु, त्याची अंमलबजावणी प्रभावीपणे होत नसल्यामुळे अभियानाचा हेतू सफल होत नाही. त्यामुळे संबंधित प्रशासनाने गांभीर्याने घेऊन कर्मचाऱ्यांना सूचना द्याव्यात, अशी सूचना मांडली आहे. दरम्यान, शेजारच्या धुळे, जळगाव जिल्ह्यांतील पारोळा, सावदा, जामनेर ग्रामीण येथे तसेच चित्र आहे. २,५६० संशयितांपैकी ६६० जणांची कोरोना चाचणी घेण्यात आलेली नाही. धुळ्याठी ४७८ संशयितांपैकी एकाचीही स्वॅब टेस्टिंग करण्यात आली नसल्याचे म्हटले आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने दखल घेऊन तातडीने कार्यवाही करून तसा अहवाल पाठवण्याची सूचना देण्यात आली आहे.

ग्रामीण भागात कुटुंबांचे असहकार्य

शासनाने कोरोना महामारीचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण व माझे कुटुंब माझी जबाबदारी अभियान राबविण्याचे निर्देश दिले असले, तरी ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात कुटुंबे सर्वेक्षणास सहकार्य करत नसल्याचे चित्र आहे. आधीच लसीकरणाच्या अफवांमुळे लसीकरणाविषयी प्रचंड दहशत आहे. सर्वेक्षण व जनजागृती करणारे कर्मचारी त्यांचे प्रबोधन करतात, मात्र अशिक्षितपणामुळे ते ऐकायला तयार नसतात. अशा घटनांमुळे कर्मचाऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. निदान, वरिष्ठ अधिकारी यांनीदेखील स्वतः गावकऱ्यांचे प्रबोधन करणे गरजेचे आहे.