शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री उदय सामंत चौथ्यांदा 'शिवतीर्थ'वर; मनसे प्रमुख राज ठाकरेंची घेतली भेट, कारण काय?
2
सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...
3
हिंडन विमानतळावरून बंगळुरू, लुधियाना, नांदेडसाठी आजपासून विमानसेवा सुरू; मुंबई, गोव्यासाठी केव्हा सुरू होणार?
4
Stock Market Today: विक्रमी तेजीनंतर शेअर बाजारात घसरण; ५०० पेक्षा जास्त अंकांनी आपटला, तरीही फार्मा सेक्टरमध्ये तेजी का?
5
सावधान! 'या' नंबरवरून पाकिस्तानी हॅकर्सचा भारतीयांना फोन; सुरक्षा यंत्रणेचा मोठा अलर्ट
6
धक्कादायक! अमृतसरमध्ये विषारी दारूमुळे १२ जणांचा मृत्यू, ५ जणांची प्रकृती गंभीर
7
India retaliatory tariff: चीननंतर भारताचं अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर, स्टील-अ‍ॅल्युमिनिअम टॅरिफवर मोठी घोषणा
8
'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारतावर १५ लाख सायबर हल्ले; पाकिस्तान,बांगलादेशसह या ५ देशातील हॅकर्स
9
भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार?
10
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
11
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
12
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
14
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
15
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
16
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
17
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
18
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
19
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
20
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय

महामारीत मुन्नाभाई एमबीबीएस गायब, वर्षभरात जिल्ह्यात कारवाई नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:21 IST

नंदुरबार : बोगस डाॅक्टरांवर कारवाईचे सत्र गेल्या काही वर्षांत जिल्ह्यात राबविण्यात आलेले नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी असे डाॅक्टर्स सक्रिय ...

नंदुरबार : बोगस डाॅक्टरांवर कारवाईचे सत्र गेल्या काही वर्षांत जिल्ह्यात राबविण्यात आलेले नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी असे डाॅक्टर्स सक्रिय आहेत. विशेष म्हणजे गेल्या दोन वर्षांत बोगस डाॅक्टरांवर जिल्ह्यात कारवाईच झालेली नाही. शिवाय स्थानिक स्तरावरूनदेखील त्याबाबत कुणी तक्रारी केलेल्या नसल्याचे दिसून येत आहे.

जिल्ह्यातील सातपुड्याच्या दुर्गम भागात मोठ्या प्रमाणावर पूर्वी बोगस डाॅक्टरांचा सुळसुळाट राहत होता; परंतु आता आरोग्य सेवा सर्वदूर पोहोचल्याने अशा डाॅक्टरांची दुकानदारी काही प्रमाणात बंद झाली आहे; परंतु अनेक महाभाग अजूनही सक्रिय आहेत. लोकांचीही त्यांच्यावर भावना बसली आहे. शिवाय वेळेवर आणि कमी पैशात उपचार मिळत असल्याने जिवाची पर्वा न करता अशा डॅाक्टरांकडे अनेक जण उपचार करून घेत असतात.

शासकीय आरोग्य केंद्रातील उपचार...

दुर्गम भागात शासकीय आरोग्य केंद्रात डाॅक्टरच उपस्थित राहत नसल्यामुळे ऐनवेळी तेथील परिचारिकांनाच उपचार करावा लागतो. अत्यवस्थ रुग्ण आल्यास त्यावर तात्पुरता उपचार करून ग्रामीण किंवा उपजिल्हा रुग्णालयात रेफर केले जाते. साध्या आजारावर मात्र परिचारिकाच औषधी देऊन वेळ निभावून नेत असल्याचेही प्रकार दुर्गम भागात अनेक आरोग्य केंद्रांत दिसून येतात.

तक्रार आली तरच कारवाई

शहरासह ग्रामीण भागात बोगस डाॅक्टरांची संख्या सर्वाधिक आहे. कारवाई किंवा माहिती देण्याचे अधिकार स्थानिक सरंपच किंवा ग्रामसेवक, पोलीस पाटील तसेच नागरिकांनादेखील आहेत. मात्र, कारवाईबाबत कोणीही माहिती देत नाही, तसेच तक्रार केल्यावर प्रशासनाकडून कारवाई केली जाते.