लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : गेल्या काही वर्षात कचरा संकलन आणि त्याची विल्हेवाट यात नंदुरबार नगरपालिका समाधानकारक भूमिका बजावत असून यामुळे शहरातील कचºया ढिग नाहिसे झाले आहेत़ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कचरा व्यवस्थापन गांभिर्याने घेतले जात असून दरदिवशी शहरातून ३० टन कचरा संकलित करुन त्याची विल्हेवाट लावण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आहे़कोरोनाची धास्ती दिवसेंदिवस वाढत असताना स्वच्छता आणि उपाययोजनांना वेग आला आहे़ जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभाग जिल्हाभर बैठका घेऊन जनजागृती करत आहेत़ यात कचºयाचे व्यवस्थापन करुन त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्याचा मुद्दा सध्या ऐरणीवर आला आहे़ यात नंदुरबार नगरपालिकेने आघाडी घेतल्याचे चित्र सध्यातरी आहे़ पालिकेने खाजगी ठेकेदारासह पालिकेच्या सफाई कामगारांना नियुक्त करुन पहाटे सहा ते दुपारी १ व सायंकाळी सात वाजेनंतर कचºयाचे संकलन करण्याची पद्धत अवलंबली आहे़ यातून दिवसभरात ओला आणि सुका असा कचरा संकलित करुन त्याची विल्हेवाट लावली जात आहे़ असे असतानाही शहरात दिवसभरात मोकळ्या जागांवर कचरा टाकून घाण करणाऱ्यांची संख्याही कमी होत नसल्याचे चित्र आहे़ यातून मार्ग काढत पालिकेने जागोजागी कचरा कुंड्या ठेवल्याने कचºयाचे विस्थापन टळल्याचे दिसून आले आहे़ संकलित करण्यात येणार कचरा हा ओला आणि सुका अशा दोन वर्गवारीनुसार ठेवला जात असल्याने त्याची विल्हेवाट लावणे सोपे झाल्याची माहिती देण्यात आली आहे़एकीकडे ही स्थिती असताना दुसरीकडे पालिका हद्दीतून वाहणारे नाले, पाताळगंगा नदी आणि गटारी यांची स्वच्छता करणेही गरजेचे असल्याचे चित्र दिसून आले आहे़ गटारींमध्ये साचणारी घाण आरोग्याला हानीकारक असल्याने त्याबाबत कारवाई करण्याची गरज आहे़ मोकाट वराह आणि कुत्रे यांच्याकडून घाण पसरवण्याचा प्रकार सुरु असल्याने समस्या वाढत असल्याची स्थिती आहे़ शहरातील दाट लोकवस्तीच्या भागात गटारींमध्ये अडकलेले प्लास्टिक सांडपाण्याचे वहन थांबवत असल्याने त्याकडे गांभिर्याने लक्ष देण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे़पालिकेकडून दर दिवशी ३० कचरा संकलित होतो़ यासाठी पालिकेचे १५६ तर ठेकेदाराकडून २१५ सफाई कामगार नियुक्त करण्यात आले आहेत़२० घंटागाड्या २ ढंपर आणि चार ट्रॅक्टरच्या सहाय्याने शहरातील विविध भागातून कचरा संकलन होते़साक्री रोडवरील डंपिग ग्राउंडमध्ये कचरा टाकल्यानंतर त्याचे विलगीकरण केले जाते़ यात ओला आणि सुका असे वर्गीकरण तसेच प्लास्टिक, डब्बे, चप्पल, पिशव्या, सॅनेटरी पॅडस, बॅटरी अशी वेगवेगळ्या प्रकारे विल्हेवाट लावण्यात येते़कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोमवारपासून पालिका हद्दीतील सार्वजनिक जागांवर धूर फवारणी व औषध फवारणीला सुरुवात होणार असून रेल्वेस्थानक, बसस्टँड, रुग्णालये याठिकाणी प्राधान्य दिले जाणार काही ठिकाणी फवारणी सुरु करण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली आहे़
पालिका दरदिवशी लावते ३० टन कचऱ्याची विल्हेवाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 12:28 IST