शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
3
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
4
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
5
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
6
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
7
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
8
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
9
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
10
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
11
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
12
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
13
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
14
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
15
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
16
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
17
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
18
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
19
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट

दिव्यांगांना पालिकेचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2019 12:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : शहरी भागातील दिव्यांग बांधवांना पालिकेमार्फत त्यांच्या स्वत:च्या उत्पन्नातून पाच टक्के निधी वाटप करण्यात यावा, ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : शहरी भागातील दिव्यांग बांधवांना पालिकेमार्फत त्यांच्या स्वत:च्या उत्पन्नातून पाच टक्के निधी वाटप करण्यात यावा, असा शासन निर्णय जाहिर करण्यात आला आहे. त्यानुसार तळोदा पालिकेने शहरातील 148 नोंदणीकृत दिव्यांग बांधवांना एम हजार 218 प्रमाणे एक लाख 80 हजाराचा निधी वाटप करण्यात आला आहेत. तळोदा शहरातील दिव्यांग बांधवांना पालिकेमार्फत पाच टक्के निधी वाटप करीत त्यांना आधार द्यावा, अशी मागणी प्रहार अपंग क्रांती संघटनेतर्फे करण्यात येत होती. या मागणीसाठी संघटनेचे तळोदा तालुकाध्यक्ष मंगलचंद जैन, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र कलाल, दिलीप जोहरी, रसिलाबाई देसाई यांनी सातत्याने नगराध्यक्ष अजय परदेशी, मुख्याधिकारी सपना वसावा, उपनगराध्यक्षा भाग्यश्री चौधरी यांच्याकडे पाठपुरावा सुरू ठेवला. या पाठपुराव्याची दखल घेत शिवाय दिव्यांग बांधवांची दयनिय अवस्था लक्षात घेत तळोदा पालिका प्रशासनामार्फत मागणी मंजूर करण्यात आली आहेत. या मागणीसाठी संघटनेने शासन निर्णयाचा आधार घेत विधायक मार्गाने मागणी केली असून यश देखील पदरी पाडून घेतले आहे. मागणी मंजूर करीत शहरातील 148 दिव्यांग बांधवांना प्रत्येकी एक हजार 218 असा एकुण एक लाख 80 हजाराचा निधी वाटप केला आहे. ही रक्कम दिव्यांग बांधवांच्या खात्यावर थेट जमा करण्यात आल्याचे पालिका प्रशासनामार्फत सांगण्यात आले. पालिकेच्या या भूमिकेमुळे दिव्यांग बांधवांच्या नोंदणीत मोठी भर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दिव्यांगांसाठी जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करणा:या पालिकांपैकी तळोदा पालिका ही एक स्थानिक स्वराज्य संस्था असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे अन्य पालिकांमार्फत देखील त्या-त्या शहरातील दिव्यांग बांधवांसाठी अशी योजना राबवावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

दिव्यांग बांधवांच्या समस्या सामान्यांपेक्षा वेगळ्या व अधिक असतात. त्यामुळे शहरी भागातील दिव्यांगाना पालिकेने स्वउत्पन्नातून आर्थिक हातभार लावावा, असा आदेश शासनामार्फत देण्यात आला आहे. त्यानुसार शासनाच्या आदेशाचे पालन करीत तळोदा पालिकेमार्फत योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. वार्षीक निधी वाटप केल्यानंतर त्यांना निवा:याचाही आधार मिळावा, म्हणून त्यांना पालिकेमार्फत आकारण्यात येणारी घरपट्टी 50 टक्के माफ करण्याचा ठराव देखील तळोदा पालिकामार्फत मंजूर करण्यात आला आहे. त्यानुसार पुढील वर्षापासून या ठरावानुसार 50 टक्के घरपट्टी माफ करण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनामार्फत सांगण्यात आले.