शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
सोनम, सुपारी अन् सरेंडर, समोर आला लव्ह ट्रँगल...! कोण आहे राज कुशवाह? याच्यामुळेच तर झाला नसेल राजाचा 'मर्डर'?
3
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
4
"मी सिनेइंडस्ट्रीतला नाही...", मुंबई सोडून गावाला का स्थायिक झाले नाना पाटेकर?, बिग बींना सांगितलेलं कारण
5
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
6
Mumbai Local: नव्या लोकलचे दरवाजे आपोआप बंद होणार, मुंबई रेल्वे अपघातानंतर प्रशासनाला जाग!
7
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?
8
Vat Purnima 2025: सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले, तेव्हा यमाशी कसा झाला होता अखेरचा संवाद? वाचा!
9
अहिल्यानगर : एमपीएल क्रिकेट सामना बघून परताना गाडीचा भीषण अपघात; जळगावमधील दोन ठार, ११ जखमी
10
मुलाचा जन्म, पण उपचारादरम्यान मातेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती
11
"मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला", २५ वर्ष लहान अभिनेत्रीने मिथुन चक्रवर्तींवर केलेला आरोप
12
पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिले; 'बेवफा' सोनम प्रियकरासोबत युपीत सापडली...
13
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
14
Vat Purnima 2025: केवळ सौभाग्यासाठी नाही, तर दीर्घायुष्यासाठी करा वटवृक्षाची पुजा!
15
भारतात पहिल्यांदाच MCX नं केलं असं काम की विक्रमी उच्चांकी स्तरावर पोहोचले शेअर्स, जाणून घ्या
16
"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय?
17
"गेल्या १० वर्षांपासून मी मानसोपचार...", अमृता सुभाषने केला खुलासा; कारणही सांगितलं
18
अनिल अंबानींची कंपनी करणार ₹५००० कोटींची गुंतवणूक; संरक्षण क्षेत्रात इतिहास रचण्यास तयार
19
७ वर्षांत एफडीआयमध्ये महाराष्ट्र टॉप, परदेशातील सर्वाधिक गुंतवणूक राज्यात; पायाभूत सुविधांतील सुधारणा ठरतेय मोठ्या फायद्याची

रस्त्यावर उडणाऱ्या धुळीमुळे वाहनधारक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:29 IST

कोळदा ते खेतिया रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम गेल्या तीन वर्षापासून सुरू आहे. काही ठिकाणी काम अपूर्ण असल्याने स्थानिक गावकरी व ...

कोळदा ते खेतिया रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम गेल्या तीन वर्षापासून सुरू आहे. काही ठिकाणी काम अपूर्ण असल्याने स्थानिक गावकरी व वाहनधारकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. शिवाय रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर धूळ उडते. धुळीमुळे अनेक छोटे-मोठे अपघात होऊन काहींना आपले प्राण गमवावे लागले आहेत. संबंधित ठेकेदार आणि रस्त्यावर होणाऱ्या अवजड वाहतुकीचा विचार करता अपूर्ण काम त्वरित पूर्ण करावे. शिवाय ज्या भागात धूळ उडते त्याठिकाणी निदान दिवसातून दोनवेळा तरी पाणी टाकणे आवश्यक आहे. या रस्त्यावर अवजड वाहने भरधाव वेगाने ये-जा करीत असल्याने धूळ मोठ्या प्रमाणावर उडते. शेतातील पिकांवर मोठ्या प्रमाणावर धूळ बसत असल्याने पिके खराब होत आहेत. आधीच निसर्गाच्या अवकृपेमुळे उत्पन्नात मोठ्या प्रमाणावर घट येत आहे. त्यातच धुळीमुळे रस्त्यालगतच्या शेतातील पीक खराब होत असल्याने शेतकरी पुरता चिंताग्रस्त झाला आहे. प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन संबंधित विभाग व ठेकेदाराला सूचना करून तत्काळ रस्ता करण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

शहादा ते प्रकाशा दरम्यान रस्त्याचे अतिशय संथगतीने काम चालू आहे. कित्येक दिवस काम बंद असते आणि त्याचा परिणाम लोकांना सहन करावा लागतो. किरकोळ म्हणजे कमीत कमी दीड-दोन किलोमीटरचा रस्ता करणे बाकी आहे. पण तेवढ्यासाठी कोकम माता मंदिरापासून तर करजईच्या गावाच्या हद्दीपर्यंत दोन भागात काम बाकी आहे. रस्त्यावर वाहन चालवताना अतिशय हाल सहन करून वाहन चालवावे लागते. वाहनधारक खूप त्रस्त झाले आहेत. यात कित्येक मोटारसायकलस्वारांना किरकोळ दुखापती झाल्या आहेत. याचा रस्ते बांधकाम ठेकेदारावर कुठलाच परिणाम होत नसल्याचे ग्रामस्थ सांगतात.