शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

नाशिक विभागात नंदुरबार जिल्ह्यात मनरेगाचे सर्वाधिक मजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2020 12:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : लॉकडाऊनमुळे परराज्यात अडकलेले मजूर गावी परतल्याने या मजुरांना रोजगार देण्यासाठी प्रशासनाच्या प्रयत्नांना यश येत ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : लॉकडाऊनमुळे परराज्यात अडकलेले मजूर गावी परतल्याने या मजुरांना रोजगार देण्यासाठी प्रशासनाच्या प्रयत्नांना यश येत असून त्यामुळे मनरेगावरील कामांवरील मजुरांची संख्या तब्बल ५० हजाराच्या घरात गेली आहे. विशेष म्हणजे नाशिक विभागात जिल्ह्यात सर्वाधिक मजूर कामावर असल्याची नोंद झाली आहे.परजिल्ह्यात आणि परराज्यात अडकलेले हजारो मजूर जिल्ह्यात परतू लागले आहेत. नंदुरबार जिल्ह्यातील बहुतांश मजुर गुजरात राज्यात जातात गेल्या महिन्यातच हे मजूर परतल्याने १४ दिवसांच्या क्वॉरंटाईननंतर या मजुरांना रोहयोच्या कामांकडे वळविण्यात प्रशासनाला यश येत आहे. जिल्ह्यात रोजगाराची साधने नसल्याने आणि दारिद्रय रेषेखालील कुटूंबांची संख्या ७० टक्केपेक्षा अधीक असल्याने लॉकडाऊनमध्ये जिल्ह्यातील जनतेला पुरेसे अन्नधान्य अथवा रोजगार उपलब्ध करून देणे प्रशासनापुढे आव्हान होते. ही बाब जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांनी लक्षात घेवून सुरुवातीपासूनच धान्य वाटप व रोहयोच्या कामांकडे लक्ष घालून त्याचे नियोजन केले.मजूर परतण्यापूर्वीच सुमारे ६० हजार मजुरांना रोजगार मिळेल इतक्या कामांना तांत्रिक मंजुरी दिली होती. त्यामुळे मजूर परतल्यानंतर या मजुरांना ज्यांनी काम मागितले त्यांना काम देण्याला प्राधान्य दिले जात असल्याने अवघ्या तीन आठवड्यात रोहयोची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू झाली असून या कामांवरील मजुरांची संख्याही वाढली आहे.सद्य स्थितीत जिल्ह्यात ४,३३० कामांवर ४६ हजार २९४ मजूर कामावर आहेत. लवकरच ही संख्या ५० हजारांवर जाणार आहे. तालुकानिहाय सुरू असलेली कामे व त्यावरील मजूर पुढील प्रमाणे, अक्कलकुवा तालुक्यात ६०७ कामांवर ७,८०१ मजूर कार्यरत आहेत. धडगाव तालुक्यात ४५० कामांवर १२,२३४ मजूर उपस्थित आहेत. नंदुरबार तालुक्यात ६६० कामांवर सहा हजार ४६ मजूर उपस्थित आहेत.नवापूर तालुक्यात ७४१ कामांवर ९,१८० मजूर कार्यरत आहेत. शहादा तालुक्यात एक हजार ५३ कामांवर ६,६०८ मजूर कार्यरत आहेत. तर तळोदा तालुक्यात ८१९ कामांवर ४,२२५ मजूर कार्यरत आहेत. यात जॉबकार्ड नसलेले १४,९६० मजुरांचा समावेश आहे.एकुण कामांवरील मजुरांची संख्या तब्बल ५० हजारापेक्षा अधीक जाणार आहे. जिल्हा प्रशासनाने ठेवलेल्या लक्षांकापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न आहे. मजुरांनी आपल्या परिसरातच काम उपलब्ध व्हावे यासाठी कामाची मागणी करावी असे आवाहन देखील जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

जिल्ह्यात मागेल त्याला काम देण्याचे नियोजन प्रशासनाने केले असून रोहयोच्या कामाचे पुर्वनियोजन केल्यामुळे आज मोठ्या प्रमाणावर मजुरांना काम देता येत आहे.-डॉ.राजेंद्र भारूड, जिल्हाधिकारी.