शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाभरात 50 पैशांपेक्षा अधीक पैसेवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 12:53 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सुधारीत हंगामी पैसेवारी जाहीर करतांना देखील 50 पैशांच्या वरच जाहीर केल्याने यंदा देखील जिल्ह्यातील एकही गाव दुष्काळी राहणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. वास्तविक नंदुरबारचा पूव्रेकडील भाग आणि शहादा तालुक्यातील तापी पट्टयाच्या भागात पीक परिस्थिती समाधानकारक नसतांनाही पैसेवारीबाबत अन्याय झाल्याची भावना या भागातील शेतक:यांची आहे.जिल्ह्यात यंदा सरासरीचा ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सुधारीत हंगामी पैसेवारी जाहीर करतांना देखील 50 पैशांच्या वरच जाहीर केल्याने यंदा देखील जिल्ह्यातील एकही गाव दुष्काळी राहणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. वास्तविक नंदुरबारचा पूव्रेकडील भाग आणि शहादा तालुक्यातील तापी पट्टयाच्या भागात पीक परिस्थिती समाधानकारक नसतांनाही पैसेवारीबाबत अन्याय झाल्याची भावना या भागातील शेतक:यांची आहे.जिल्ह्यात यंदा सरासरीचा 89 टक्के पाऊस झाला असला तरी उशीराने पावसाचे आगमन आणि त्याची अनियमितता यामुळे पिकांवर परिणाम झाला होता. जून महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात झालेल्या पावसाने नंतर मध्यंतरी दोन ते तीन आठवडे दडी मारली होती. त्यामुळे अनेक भागातील शेतक:यांना दुबार पेरणीला सामोरे जावे लागत होते. त्यानंतरही पिकांना आवश्यक त्या वेळी पावसाचा खंड पडत असल्यामुळे नंदुरबार तालुक्यातील पूर्व भाग, शहादा तालुक्यातील अनेक भागात पिकांची वाढ खुंटली होती.    परिणामी यंदा उत्पादकता देखील कमी झाली आहे. असे असतांना पैसेवारी सरसकट 50 पैशांपेक्षा अधीक लावण्यात आल्याने नाराजी व्यक्त होत आहे.खरीपची 856 गावेजिल्ह्यात खरीप हंगामाची एकुण 856 गावे आहेत. त्यात सर्वाधिक 194 गावे ही अक्कलकुवा तालुक्यातील आहेत. त्या खालोखाल 165 गावे ही नवापूर तालुक्यातील आहेत. नंदुरबार तालुक्यात 145, तळोदा तालुक्यात 93, शहादा तालुक्यात 160 तर धडगाव तालुक्यात 99 गावे आहेत. या सर्वच गावांची पैसेवारी 55 ते 65 पैसे दरम्यान आहे. रब्बीच्याही गावांचा समावेशहंगामी पैसेवारी जाहीर करतांना रब्बीच्या गावांचाही समावेश करण्यात आला आहे. जिल्ह्यात रब्बीची एकुण 30 गावे आहेत. त्यात नंदुरबार तालुक्यातील दहा व शहादा तालुक्यातील 20 गावांचा समावेश आहे. या गावांमध्ये देखील रब्बीचा पेरा झाल्यामुळे त्यांचाही खरीप सुधारीत पैसेवारीत समावेश करण्यात आला आहे. अन्यायाची भावनाप्रशासनाने स्थानिक पीक परिस्थिती लक्षात न घेता पैसेवारी जाहीर केल्यामुळे दुष्काळसदृष्य गावांवर अन्याय झाल्याची भावना शेतक:यांची आहे. जिल्ह्यात यंदा सरासरीचा 89 टक्के पाऊस झाला. सर्वच तालुक्यांमध्ये सरासरीचा 85 टक्केपेक्षा अधीक पाऊस झाल्याची नोंद आहे. परंतु सर्वच भागात एक समान पाऊस झालेला नाही. नंदुरबार तालुक्यातील पूव्रेकडील रनाळे, शनिमांडळ मंडळात ही     स्थिती आहे. अनेक पिकांची उत्पादकता कमी झाली आहे. शहादा तालुक्यात देखील यंदा सरासरीचा केवळ 78 टक्के पाऊस झाला     आहे. सारंगखेडा व वडाळी मंडळात पावसाची अनियमितता कायम होती. त्याचा परिणाम पिकांवर झाला. जे थोडेफार पीक हाती येणार होते ते देखील परतीच्या पावसाने हिरावून नेले. परिणामी या भागात देखील  पीक परिस्थिती फारशी समाधानकारक नव्हती. असे असतांनाही त्या भागात देखील सरसकट 50 पैसेपेक्षा अधीक पैसेवारी जाहीर झाल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.