शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
2
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
3
मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
4
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
5
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
6
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
7
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
8
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
9
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
10
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
11
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
12
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
13
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
14
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
15
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
16
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
17
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
18
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
19
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
20
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले

जिल्हाभरात 50 पैशांपेक्षा अधीक पैसेवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 12:53 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सुधारीत हंगामी पैसेवारी जाहीर करतांना देखील 50 पैशांच्या वरच जाहीर केल्याने यंदा देखील जिल्ह्यातील एकही गाव दुष्काळी राहणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. वास्तविक नंदुरबारचा पूव्रेकडील भाग आणि शहादा तालुक्यातील तापी पट्टयाच्या भागात पीक परिस्थिती समाधानकारक नसतांनाही पैसेवारीबाबत अन्याय झाल्याची भावना या भागातील शेतक:यांची आहे.जिल्ह्यात यंदा सरासरीचा ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सुधारीत हंगामी पैसेवारी जाहीर करतांना देखील 50 पैशांच्या वरच जाहीर केल्याने यंदा देखील जिल्ह्यातील एकही गाव दुष्काळी राहणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. वास्तविक नंदुरबारचा पूव्रेकडील भाग आणि शहादा तालुक्यातील तापी पट्टयाच्या भागात पीक परिस्थिती समाधानकारक नसतांनाही पैसेवारीबाबत अन्याय झाल्याची भावना या भागातील शेतक:यांची आहे.जिल्ह्यात यंदा सरासरीचा 89 टक्के पाऊस झाला असला तरी उशीराने पावसाचे आगमन आणि त्याची अनियमितता यामुळे पिकांवर परिणाम झाला होता. जून महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात झालेल्या पावसाने नंतर मध्यंतरी दोन ते तीन आठवडे दडी मारली होती. त्यामुळे अनेक भागातील शेतक:यांना दुबार पेरणीला सामोरे जावे लागत होते. त्यानंतरही पिकांना आवश्यक त्या वेळी पावसाचा खंड पडत असल्यामुळे नंदुरबार तालुक्यातील पूर्व भाग, शहादा तालुक्यातील अनेक भागात पिकांची वाढ खुंटली होती.    परिणामी यंदा उत्पादकता देखील कमी झाली आहे. असे असतांना पैसेवारी सरसकट 50 पैशांपेक्षा अधीक लावण्यात आल्याने नाराजी व्यक्त होत आहे.खरीपची 856 गावेजिल्ह्यात खरीप हंगामाची एकुण 856 गावे आहेत. त्यात सर्वाधिक 194 गावे ही अक्कलकुवा तालुक्यातील आहेत. त्या खालोखाल 165 गावे ही नवापूर तालुक्यातील आहेत. नंदुरबार तालुक्यात 145, तळोदा तालुक्यात 93, शहादा तालुक्यात 160 तर धडगाव तालुक्यात 99 गावे आहेत. या सर्वच गावांची पैसेवारी 55 ते 65 पैसे दरम्यान आहे. रब्बीच्याही गावांचा समावेशहंगामी पैसेवारी जाहीर करतांना रब्बीच्या गावांचाही समावेश करण्यात आला आहे. जिल्ह्यात रब्बीची एकुण 30 गावे आहेत. त्यात नंदुरबार तालुक्यातील दहा व शहादा तालुक्यातील 20 गावांचा समावेश आहे. या गावांमध्ये देखील रब्बीचा पेरा झाल्यामुळे त्यांचाही खरीप सुधारीत पैसेवारीत समावेश करण्यात आला आहे. अन्यायाची भावनाप्रशासनाने स्थानिक पीक परिस्थिती लक्षात न घेता पैसेवारी जाहीर केल्यामुळे दुष्काळसदृष्य गावांवर अन्याय झाल्याची भावना शेतक:यांची आहे. जिल्ह्यात यंदा सरासरीचा 89 टक्के पाऊस झाला. सर्वच तालुक्यांमध्ये सरासरीचा 85 टक्केपेक्षा अधीक पाऊस झाल्याची नोंद आहे. परंतु सर्वच भागात एक समान पाऊस झालेला नाही. नंदुरबार तालुक्यातील पूव्रेकडील रनाळे, शनिमांडळ मंडळात ही     स्थिती आहे. अनेक पिकांची उत्पादकता कमी झाली आहे. शहादा तालुक्यात देखील यंदा सरासरीचा केवळ 78 टक्के पाऊस झाला     आहे. सारंगखेडा व वडाळी मंडळात पावसाची अनियमितता कायम होती. त्याचा परिणाम पिकांवर झाला. जे थोडेफार पीक हाती येणार होते ते देखील परतीच्या पावसाने हिरावून नेले. परिणामी या भागात देखील  पीक परिस्थिती फारशी समाधानकारक नव्हती. असे असतांनाही त्या भागात देखील सरसकट 50 पैसेपेक्षा अधीक पैसेवारी जाहीर झाल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.