शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

जिल्हाभरात 50 पैशांपेक्षा अधीक पैसेवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 12:53 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सुधारीत हंगामी पैसेवारी जाहीर करतांना देखील 50 पैशांच्या वरच जाहीर केल्याने यंदा देखील जिल्ह्यातील एकही गाव दुष्काळी राहणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. वास्तविक नंदुरबारचा पूव्रेकडील भाग आणि शहादा तालुक्यातील तापी पट्टयाच्या भागात पीक परिस्थिती समाधानकारक नसतांनाही पैसेवारीबाबत अन्याय झाल्याची भावना या भागातील शेतक:यांची आहे.जिल्ह्यात यंदा सरासरीचा ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सुधारीत हंगामी पैसेवारी जाहीर करतांना देखील 50 पैशांच्या वरच जाहीर केल्याने यंदा देखील जिल्ह्यातील एकही गाव दुष्काळी राहणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. वास्तविक नंदुरबारचा पूव्रेकडील भाग आणि शहादा तालुक्यातील तापी पट्टयाच्या भागात पीक परिस्थिती समाधानकारक नसतांनाही पैसेवारीबाबत अन्याय झाल्याची भावना या भागातील शेतक:यांची आहे.जिल्ह्यात यंदा सरासरीचा 89 टक्के पाऊस झाला असला तरी उशीराने पावसाचे आगमन आणि त्याची अनियमितता यामुळे पिकांवर परिणाम झाला होता. जून महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात झालेल्या पावसाने नंतर मध्यंतरी दोन ते तीन आठवडे दडी मारली होती. त्यामुळे अनेक भागातील शेतक:यांना दुबार पेरणीला सामोरे जावे लागत होते. त्यानंतरही पिकांना आवश्यक त्या वेळी पावसाचा खंड पडत असल्यामुळे नंदुरबार तालुक्यातील पूर्व भाग, शहादा तालुक्यातील अनेक भागात पिकांची वाढ खुंटली होती.    परिणामी यंदा उत्पादकता देखील कमी झाली आहे. असे असतांना पैसेवारी सरसकट 50 पैशांपेक्षा अधीक लावण्यात आल्याने नाराजी व्यक्त होत आहे.खरीपची 856 गावेजिल्ह्यात खरीप हंगामाची एकुण 856 गावे आहेत. त्यात सर्वाधिक 194 गावे ही अक्कलकुवा तालुक्यातील आहेत. त्या खालोखाल 165 गावे ही नवापूर तालुक्यातील आहेत. नंदुरबार तालुक्यात 145, तळोदा तालुक्यात 93, शहादा तालुक्यात 160 तर धडगाव तालुक्यात 99 गावे आहेत. या सर्वच गावांची पैसेवारी 55 ते 65 पैसे दरम्यान आहे. रब्बीच्याही गावांचा समावेशहंगामी पैसेवारी जाहीर करतांना रब्बीच्या गावांचाही समावेश करण्यात आला आहे. जिल्ह्यात रब्बीची एकुण 30 गावे आहेत. त्यात नंदुरबार तालुक्यातील दहा व शहादा तालुक्यातील 20 गावांचा समावेश आहे. या गावांमध्ये देखील रब्बीचा पेरा झाल्यामुळे त्यांचाही खरीप सुधारीत पैसेवारीत समावेश करण्यात आला आहे. अन्यायाची भावनाप्रशासनाने स्थानिक पीक परिस्थिती लक्षात न घेता पैसेवारी जाहीर केल्यामुळे दुष्काळसदृष्य गावांवर अन्याय झाल्याची भावना शेतक:यांची आहे. जिल्ह्यात यंदा सरासरीचा 89 टक्के पाऊस झाला. सर्वच तालुक्यांमध्ये सरासरीचा 85 टक्केपेक्षा अधीक पाऊस झाल्याची नोंद आहे. परंतु सर्वच भागात एक समान पाऊस झालेला नाही. नंदुरबार तालुक्यातील पूव्रेकडील रनाळे, शनिमांडळ मंडळात ही     स्थिती आहे. अनेक पिकांची उत्पादकता कमी झाली आहे. शहादा तालुक्यात देखील यंदा सरासरीचा केवळ 78 टक्के पाऊस झाला     आहे. सारंगखेडा व वडाळी मंडळात पावसाची अनियमितता कायम होती. त्याचा परिणाम पिकांवर झाला. जे थोडेफार पीक हाती येणार होते ते देखील परतीच्या पावसाने हिरावून नेले. परिणामी या भागात देखील  पीक परिस्थिती फारशी समाधानकारक नव्हती. असे असतांनाही त्या भागात देखील सरसकट 50 पैसेपेक्षा अधीक पैसेवारी जाहीर झाल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.