शहरं
Join us  
Trending Stories
1
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
2
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
3
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
4
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
5
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
6
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
7
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
8
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
9
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
10
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
11
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
12
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
13
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
14
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
15
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू
16
Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!
17
Dance Bar Raid: उल्हासनगरातील चांदणी लेडीज सर्व्हिस बारवर पोलिसांची धाड, ९ महिलांसह १५ जणांना अटक
18
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
19
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
20
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या

जिल्हाभरात 50 पैशांपेक्षा अधीक पैसेवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 12:53 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सुधारीत हंगामी पैसेवारी जाहीर करतांना देखील 50 पैशांच्या वरच जाहीर केल्याने यंदा देखील जिल्ह्यातील एकही गाव दुष्काळी राहणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. वास्तविक नंदुरबारचा पूव्रेकडील भाग आणि शहादा तालुक्यातील तापी पट्टयाच्या भागात पीक परिस्थिती समाधानकारक नसतांनाही पैसेवारीबाबत अन्याय झाल्याची भावना या भागातील शेतक:यांची आहे.जिल्ह्यात यंदा सरासरीचा ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सुधारीत हंगामी पैसेवारी जाहीर करतांना देखील 50 पैशांच्या वरच जाहीर केल्याने यंदा देखील जिल्ह्यातील एकही गाव दुष्काळी राहणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. वास्तविक नंदुरबारचा पूव्रेकडील भाग आणि शहादा तालुक्यातील तापी पट्टयाच्या भागात पीक परिस्थिती समाधानकारक नसतांनाही पैसेवारीबाबत अन्याय झाल्याची भावना या भागातील शेतक:यांची आहे.जिल्ह्यात यंदा सरासरीचा 89 टक्के पाऊस झाला असला तरी उशीराने पावसाचे आगमन आणि त्याची अनियमितता यामुळे पिकांवर परिणाम झाला होता. जून महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात झालेल्या पावसाने नंतर मध्यंतरी दोन ते तीन आठवडे दडी मारली होती. त्यामुळे अनेक भागातील शेतक:यांना दुबार पेरणीला सामोरे जावे लागत होते. त्यानंतरही पिकांना आवश्यक त्या वेळी पावसाचा खंड पडत असल्यामुळे नंदुरबार तालुक्यातील पूर्व भाग, शहादा तालुक्यातील अनेक भागात पिकांची वाढ खुंटली होती.    परिणामी यंदा उत्पादकता देखील कमी झाली आहे. असे असतांना पैसेवारी सरसकट 50 पैशांपेक्षा अधीक लावण्यात आल्याने नाराजी व्यक्त होत आहे.खरीपची 856 गावेजिल्ह्यात खरीप हंगामाची एकुण 856 गावे आहेत. त्यात सर्वाधिक 194 गावे ही अक्कलकुवा तालुक्यातील आहेत. त्या खालोखाल 165 गावे ही नवापूर तालुक्यातील आहेत. नंदुरबार तालुक्यात 145, तळोदा तालुक्यात 93, शहादा तालुक्यात 160 तर धडगाव तालुक्यात 99 गावे आहेत. या सर्वच गावांची पैसेवारी 55 ते 65 पैसे दरम्यान आहे. रब्बीच्याही गावांचा समावेशहंगामी पैसेवारी जाहीर करतांना रब्बीच्या गावांचाही समावेश करण्यात आला आहे. जिल्ह्यात रब्बीची एकुण 30 गावे आहेत. त्यात नंदुरबार तालुक्यातील दहा व शहादा तालुक्यातील 20 गावांचा समावेश आहे. या गावांमध्ये देखील रब्बीचा पेरा झाल्यामुळे त्यांचाही खरीप सुधारीत पैसेवारीत समावेश करण्यात आला आहे. अन्यायाची भावनाप्रशासनाने स्थानिक पीक परिस्थिती लक्षात न घेता पैसेवारी जाहीर केल्यामुळे दुष्काळसदृष्य गावांवर अन्याय झाल्याची भावना शेतक:यांची आहे. जिल्ह्यात यंदा सरासरीचा 89 टक्के पाऊस झाला. सर्वच तालुक्यांमध्ये सरासरीचा 85 टक्केपेक्षा अधीक पाऊस झाल्याची नोंद आहे. परंतु सर्वच भागात एक समान पाऊस झालेला नाही. नंदुरबार तालुक्यातील पूव्रेकडील रनाळे, शनिमांडळ मंडळात ही     स्थिती आहे. अनेक पिकांची उत्पादकता कमी झाली आहे. शहादा तालुक्यात देखील यंदा सरासरीचा केवळ 78 टक्के पाऊस झाला     आहे. सारंगखेडा व वडाळी मंडळात पावसाची अनियमितता कायम होती. त्याचा परिणाम पिकांवर झाला. जे थोडेफार पीक हाती येणार होते ते देखील परतीच्या पावसाने हिरावून नेले. परिणामी या भागात देखील  पीक परिस्थिती फारशी समाधानकारक नव्हती. असे असतांनाही त्या भागात देखील सरसकट 50 पैसेपेक्षा अधीक पैसेवारी जाहीर झाल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.