शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
2
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
3
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
4
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
5
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
6
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
7
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
8
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
9
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश
10
'माझ्याकडे मरण्याशिवाय काही पर्याय नाहीये'; उत्तराखंडच्या माजी मुख्यमंत्र्याच्या भाच्याचा व्हिडीओ व्हायरल
11
Duleep Trophy : सिराज-KL राहुलला संघात घ्या! BCCI नं जोर लावला; पण सिलेक्टर्संचा साफ नकार, कारण...
12
Tech: फोनमध्ये कॉल आणि डायलर सेटिंग अचानक बदलण्यामागे नेमके काय कारण? बदल शक्य आहे का?
13
काळजी घ्या! मार्केटमध्ये नवीन स्कॅम आला, व्हॉट्सअ‍ॅपवर लग्नपत्रिका पाठवून बँक खाते रिकामे करतात
14
Viral Video: भटक्या कुत्र्यांना खायला दिलं म्हणून महिलेला भररस्त्यात मारहाण; एका व्यक्तीला अटक
15
वर्धा: पत्नी माधुरीची हत्या करून घराशेजारच्या खड्ड्यात पुरला मृतदेह, पण, सुभाषची एक चुक अन् पोलिसांनी ठोकल्या बेड्या
16
इथं हिटमॅन रोहित लॅम्बोर्गिनीतून फिरतोय; तिकडं क्रिकेटच्या पंढरीत किंग कोहली प्रॅक्टिसमध्ये मग्न
17
पोस्ट ऑफिसचा मोठा निर्णय, अमेरिकेत जाणाऱ्या पार्सलवर बंदी! फक्त 'या' गोष्टींना सूट मिळणार
18
भारताचे समर्थन करणारे माजी सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांच्या घरावर एफबीआयची धाड, प्रकरण काय?
19
मैत्रिणीसोबत थांबला होता फ्लॅटमध्ये, तरुणाने अचानक ३२व्या मजल्यावरून मारली उडी
20
IB Recruitment: गुप्तचर विभागात ज्युनियर ऑफिसर पदांसाठी भरती, जाणून घ्या पात्रता

स्मृती जतन करण्यासाठी स्मारकाचा विकास व्हावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2020 11:33 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : रावलापाणी येथे इंग्रजांच्या गोळीबारात धारातिर्थ पडलेल्या आदिवासी क्रांतीकारकांच्या स्मारकाचा विकास लवकर व्हावा व या ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : रावलापाणी येथे इंग्रजांच्या गोळीबारात धारातिर्थ पडलेल्या आदिवासी क्रांतीकारकांच्या स्मारकाचा विकास लवकर व्हावा व या ऐतिहासिक स्थळाला नावारुपाला आणावे यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. येथील खडकावरील गोळीबाराच्या खुणा जपल्या जाव्यात व स्वातंत्र्य संग्रामाचे मोठे स्मारक व्हावे. त्यातून समाजाला प्रेरणा मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.सातपुड्यातील दुर्गम भागात असलेल्या रावलापाणी येथे २ मार्च रोजी १९४३ रोजी इंग्रजांनी केलेल्या गोळीबारात १५ क्रांतीकारक शहीद झाले होते. या स्मारकाचा विकास व्हावा यासाठी शासन दरबारी प्रयत्न सुरू आहेत. परंतु अपेक्षीत दखल घेतली जात नाही. या स्मारकाचा विकास झाल्यास हे एक चांगले पर्यटनस्थळ देखील होऊ शकणार आहे.या घटनेचा इतिहास मोठा प्रेरणादायी आहे. १९४२ च्या चलेजाव चळवळीमुळे देश पेटून उठला होता.त्याआधी पश्चिम खान्देश जिल्ह्याच्या तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी आप चळवळीचे संत श्री रामदास महाराज यांच्यावर १० जून १९४१ रोजी पहिली बंदी आणली. २४ आॅक्टोबर १९४१ ला जावली (गंगठा संस्थान) येथे दंगा झाला. आप धर्मियांवर अत्याचार झालेत. जाळपोळ झाली. यावेळी आरतीवर बंदीची मागणी लावून धरण्यात आली. ३० आॅक्टोबर १९४१ रोजी तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी मोरवड येथे कलम १४४ लावून आरतीवर सक्तीने बंदी आणली. नंतरच्या काळात अर्थात २३ एप्रिल १९४२ रोजी संत रामदास महाराज व इतर ३० अनुयायी यांना दोन वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार केले गेले.तत्कालीन पश्चिम खान्देश जिल्ह्यातील आदिवासी, गोर-गरिबांचा या चळवळीत प्रत्यक्ष सहभाग व्हावा म्हणून तत्कालीन जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानासाहेब ठकार यांनी आप चळवळीचे प्रमुख संत श्री. रामदास महाराज यांना दोन वर्षाच्या हद्दपारीची शिक्षा भोगत असतांना प्रत्यक्ष आवाहन केले.आपली हद्दपारीची मुदत संपलेली नसतांना चलेजाव चळवळीला आपल्या संघटन शक्तीतून मोठे बळ देण्याच्या हेतूने, क्रांतीकारकांच्या पाठीशी भक्कमपणे राहण्यासाठी वाटचाल करणाºया आप समुदायाला बन, ता.तळोदा येथून ५ किलोमिटर अंतरावर लक्ष केले गेले. ४ मार्च रोजी महाशिवरात्रला आरतीला पोहचण्यासाठी हा जत्था निघाला होता. २ मार्च रोजी निझरा नदीच्या पात्रात हजारोच्या संख्येने मुक्कामाला असणाºया समाजावर बेछूट गोळीबार केला गेला. कॅप्टन ड्युमन याच्या आदेशावरून गोळीबार झाला त्यात १५ जण शहीद झाले. परंतु कोण शहीद झाले त्यांची नावे उपलब्ध नाहीत.गोळीबार एवढा अमानुष होता की ८० वर्षापूर्वी झालेल्या गोळीबाराच्या खूना आजही दगडांवर स्पष्टपणे दिसून येतात. यासंदर्भात तळोदा पोलिसात त्यावेळी दोन गुन्हे दाखल झाले. ३०० पेक्षा अधीक जणांना आरोपी केले गेले.या सर्वांचे नेतृत्व संत रामदास महाराज करीत होते. अशा या ऐतिहासिक स्थळाचा विकासासाठी सर्व घटकांकडून प्रयत्न होणे आवश्यक आहे.