शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RCB च्या विजयी मिरवणुकीदरम्यान बंगळुरूत चेंगराचेंगरी; तिघांचा मृत्यू, अनेक जखमी
2
जातीय जनगणना कधी सुरू होणार? केंद्र सरकारने जाहीर केली तारीख, जाणून घ्या...
3
"हे देशद्रोहापेक्षा कमी नाही..."; राहुल गांधींवर का संतापले भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा?
4
"सरकारचा हा डाव तर नाही ना? जर असेल तर...": राज ठाकरेंचं शिक्षणमंत्र्यांना खरमरीत पत्र
5
ना प्रिती झिंटा, ना नेस वाडिया! पंजाब किंग्सचा खरा मालक वेगळाच...; हरला पण १५०० कोटी रुपये कमावले
6
Astrology: निर्जला एकादशीला या वर्षातला सर्वात मोठा राजयोग, पाच राशींना घसघशीत लाभ!
7
विराटसह टीम बसमधून प्रवास करताना अनुष्कानं शूट केला खास सीन; इथं पाहा व्हायरल व्हिडिओ
8
दोन भावांमधील घराच्या वाटणीत भारतीय लष्कराची एंट्री, कब्जा घेण्यासाठी ट्रकमधून आली जवानांची तुकडी; हातोड्यानं केली तोडफोड
9
IMFनंतर आता पाकला ADBची आर्थिक मदत, भारताच्या विरोधाला न जुमानता दिले $800 मिलियन
10
केंद्रीय कर्मचाऱ्यांना ७व्या वेतन आयोगाचा शेवटचा महागाई भत्ता; पाहा किती वाढणार पगार?
11
"मी मेलो नाही, मला मारलं गेलंय..."; राजाचा मृतदेह सापडल्यानंतर इंदूरमध्ये लागला बॅनर
12
Virat's post for Anushka: "अनुष्का बंगळुरुची आहे त्यामुळे...", आरसीबीच्या विजयानंतर विराटची बायकोसाठी खास पोस्ट
13
“चंद्रहार पाटील पक्षप्रवेश करतोय, हिंमत असेल तर थांबवा”; शिंदेसेनेचे उद्धव ठाकरेंना आव्हान
14
ऑपरेशन सिंदूरवर चर्चा करण्यास सरकार तयार, तारीखही ठरली; केंद्रीय मंत्री रिजिजूंची माहिती
15
क्रूरतेचा कळस! संशयाने पती बनला राक्षस; पत्नीचे स्तन, नाक, कान कापून गुप्तांगावर केला हल्ला
16
अमेरिकेविरोधात ड्रॅगनचं खतरनाक षडयंत्र, २ चिनी वैज्ञानिकांना पकडलं; काय आहे 'Agro Terrorism'?
17
३ लाखांवर जाणार भारतीय शेअर बाजार, अब्जाधीश गुंतवणूकदाराची मोठी भविष्यवाणी
18
'अंबानीं'च्या कंपनीला दिलासा, 'या' शेअरमध्ये ११% वाढ! बाजाराने घेतले 'यु-टर्न', वाचा कारण!
19
Mumbai Goa Highway: मुंबई- गोवा महामार्गावर दोन दिवस अवजड वाहनांना बंदी, जाणून घ्या कारण
20
सर्जन असल्याचं सांगून लग्न केलं, संसाराची सुरुवात होताच ३.५ कोटींचा चुना लावून झाला पसार!

पावसाळ्यातही पाण्यासाठी चढ-उताराच्या पायवाटेने ग्रामस्थांची भटकंती सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2019 12:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वाण्याविहीर : पावसाळा सुरू होऊन दीड महिना झाला तरी अद्यापही समाधानकारक पाऊस झाला नसल्याने अककलकुवा तालुक्यातील ...

लोकमत न्यूज नेटवर्कवाण्याविहीर : पावसाळा सुरू होऊन दीड महिना झाला तरी अद्यापही समाधानकारक पाऊस झाला नसल्याने अककलकुवा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील सल्लीबार ग्रामपंचायत अंतर्गत येणा:या पाडय़ांवरील हातपंप कोरडेच आहेत. परिणामी ग्रामस्थांना भटकंती करीत डोंगरद:यातून चढ-उताराच्या रस्त्यावरून नदी-नाल्याच्या ङिा:यातून पाणी आणावे लागत आहे.अक्कलकुवा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील सल्लीबार ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या बोरीवलपाडा येथे सहा हातपंप असूुन त्यातील चार हातपंप आटले तर दोन हातपंप जेमतेम चालत असून अर्धा किलोमीटर अंतरावरून नदीत तयार केलेल्या ङिा:यातून तेथील ग्रामस्थांना पाणी आणावे लागत आहे. फाखालपाडा येथील पाचही हातपंप अडीच महिन्यापासून आटल्याने अर्धा किलोमीटर अंतरावरून नदीत खड्डा तयार करून पाणी गाळून पिण्यासाठी आणावे लागते. पाटीलपाडा येथील आठपैकी चार हातपंप आटल्याने ग्रामस्थ नदीतील ङिा:यातून पाणी आणतात. मौलीखेडीपाडा येथील चारपैकी तीन हातपंपांची पाणी पातळी खोल गेली असून एकच हातपंप जेमतेम सुरू आहे. येथील ग्रामस्थांना पाण्याच्या शोधासाठी भटकंती करावी लागत आहे. माथाआंबापाडा, आमलीपाडा, डोसपाडा या पाडय़ांवरील हातपंपही आटल्याने तेथील ग्रामस्थांना अर्धा ते एक किलोमीटर अंतराचा चढ-उताराचा रस्ता पार करून नदी-नाल्यातील ङिा:यांमधून पाणी आणून वापरावे लागत आहे.

अक्कलकुवा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील ब:याच गाव व पाडय़ांर्पयत जाण्यासाठी अद्यापही रस्ते नाहीत. त्यामुळे पाणीपुरवठय़ासाठी या पाडय़ांमध्ये पाणी योजना राबविण्यासाठी अडचणी निर्माण होतात. या पाडय़ांमध्ये दरवर्षी पाणीटंचाई भासते. यंदा तर पावसाळा सुरू होऊन दीड महिना झाला. मात्र पुरेसा पाऊस न झाल्याने नदी-नाले कोरडे असून काही पाडय़ांवर असलेले हातपंपही आटले आहेत. त्यामुळे रोजगार हमी योजनेंतर्गत या पाडय़ांवर विहिरी खोदल्या तर पाणीटंचाईचा प्रश्न काही प्रमाणात सुटू शकतो. या पाडय़ांवरील ग्रामस्थांचे दरवर्षी पाण्यासाठी होणारे हाल थांबविण्यासाठी  प्रशासनाने प्रभावी उपाययोजना करण्याची गरज आहे.