शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
नक्षलवाद्यांनी पेरलेल्या IED चा भीषण स्फोट; ASP आकाश राव शहीद, अनेक जवान जखमी
3
Sonam Raghuvanshi : "सोनम धाब्यावर आली, घाबरलेली, रडत म्हणाली..."; साहिलने सांगितलं रात्री १ वाजता काय घडलं?
4
हनिमूनसाठी कौशलेंद्र-अंकिता सिक्कीमला गेले अन् नको ते घडलं; दोन आठवड्यांपासून थांगपत्ता नाही
5
१ लाख रुपयांचे झाले ५५ लाख; अनिल अंबानींच्या कंपनीचे शेअर्स नव्या उच्चांकी स्तरावर, तुमच्याकडे आहे का?
6
Sonam Raghuvanshi : "सोनमला फाशी झालीच पाहिजे"; राजाच्या हत्येनंतर आईचा आक्रोश, घरात कशी वागायची सून?
7
नशीब पहिला मुलगाच झाला! प्रेग्नंसीनंतर नातेवाईकाच्या बोलण्याने दुखावलेल्या रेणुका शहाणे, म्हणाल्या...
8
सोनम, सुपारी अन् सरेंडर, समोर आला लव्ह ट्रँगल...! कोण आहे राज कुशवाह? याच्यामुळेच तर झाला नसेल राजाचा 'मर्डर'?
9
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
10
"मी सिनेइंडस्ट्रीतला नाही...", मुंबई सोडून गावाला का स्थायिक झाले नाना पाटेकर?, बिग बींना सांगितलेलं कारण
11
"आम्ही कधीच चांगले मित्र नव्हतो, पण...", सोनाली बेंद्रेचा सलमान खानविषयी खुलासा, म्हणाली...
12
Vat Purnima 2025: आयुष्यात एकदा तरी 'या' पाच पुरातन वटवृक्षाला आवर्जून फेऱ्या मारा; मिळेल सिद्धी-संपत्ती!
13
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
14
Mumbai Local: नव्या लोकलचे दरवाजे आपोआप बंद होणार, मुंबई रेल्वे अपघातानंतर प्रशासनाला जाग!
15
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?
16
Vat Purnima 2025: सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले, तेव्हा यमाशी कसा झाला होता अखेरचा संवाद? वाचा!
17
अहिल्यानगर : एमपीएल क्रिकेट सामना बघून परताना गाडीचा भीषण अपघात; जळगावमधील दोन ठार, ११ जखमी
18
मुलाचा जन्म, पण उपचारादरम्यान मातेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती
19
"मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला", २५ वर्ष लहान अभिनेत्रीने मिथुन चक्रवर्तींवर केलेला आरोप
20
पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिले; 'बेवफा' सोनम प्रियकरासोबत युपीत सापडली...

मोबाइलमुळे मुलं विसरली मैदानी खेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:29 IST

नंदुरबार : स्मार्टफोन आता घराघरात आला आहे. कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या हातात स्मार्टफोन दिसू लागला आहे. त्यात सहा वर्षाच्या मुलापासून ...

नंदुरबार : स्मार्टफोन आता घराघरात आला आहे. कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या हातात स्मार्टफोन दिसू लागला आहे. त्यात सहा वर्षाच्या मुलापासून ७० वर्षांच्या वृृद्धांचा समावेश आहे. यामुळेच लहान मुले पारंपरिक खेळ विसरली असून मोबाइलमधील ॲानलाइन गेमसह इतर खेळाच्या आहारी गेली.

पूर्वी फावल्या वेळात अर्थात शाळेच्या व्यतिरिक्त वेळात सकाळी किंवा सायंकाळी गावाच्या मोकळ्या मैदानात, शहरी भागात वसाहतींच्या मोकळ्या जागेत मुलं एकत्र येऊन विविध खेळ खेळत असत. त्यात विटीदांडू, सुरपारंब्या, लंगडी, लगोरी, भोवरा, सागरगोटे, कब्बडी, कुस्ती, गोट्या, लपंडाव, आंधळी कोशिंबीर, संगीत खुर्ची यासह इतर विविध खेळांचा त्यात समावेश होता. या खेळांच्या माध्यमातून मुलांची शारीरिक व बौद्धिक वाढदेखील होत होती. शिवाय एकत्र खेळल्याने सांघिक भावना निर्माण होऊन मैत्री देखील घट्ट होत होती. परंतु आता सर्वच बदलले आहे. सद्या मोबाइल गेममुळे मुलं विदेशी खेळांकडे आणि ॲानलाइन खेळाच्या आहारी गेली आहेत. त्यामुळे त्यांची बौद्धिक, शारीरिक वाढ खुंटत चालली आहे.

मुलांचा मोबाइलवरील स्क्रीन टाईम किती असावा याबाबत तज्ज्ञांनी विविध मते-मतांतरे व्यक्त केली आहेत. परंतु अनेक मुलं ही सुट्टीच्या दिवशी किंवा शाळेव्यतिरिक्त कायमच मोबाइल हाताळतांना दिसतात. काही मुलांना तर मोबाइल फोबियादेखील झाल्याचे उदाहरणे दिसून आली आहेत. गेल्या वर्षभरापासून ॲानलाइन शिक्षणामुळे तर गरीब बापालादेखील आपल्या मुलासाठी महागडा स्मार्टफोन घेऊन द्यावा लागला आहे. अभ्यासाव्यतिरक्त गेम खेळणे, इंटरनेटवर विविध बाबी सर्चिंग करणे असे प्रकार वाढले आहेत.

विटीदांडू, सुरपारंब्या विसरले...

n सद्याच्या पिढीची मुलं तर विटीदांडू आणि सुरपारंब्या विसरल्याचे चित्र आहे. वास्तविक हे दोन्ही खेळ हे मुलांमधील एकाग्रता वाढविणे, अचूक निशाना साधणे यासह शारीरिक कसरत देखील या खेळांच्या माध्यमातून होत होते. परंतु हे दोन्ही खेळ सद्या ग्रामीण भागातदेखील अभावानेच मुलं खेळतांना आढळून येतात.

n पूर्वी सायंकाळच्या वेळी गावाच्या पाराजवळ किंवा मोकळ्या मैदानात मुलांचा घोळका विविध खेळ खेळतांना दिसून येत असत. सर्व गावातील, वसाहतींमधील मुलं एकत्र खेळ खेळण्यासाठी येत असल्याने त्यांच्यातील संघभावाना, एकोपा वाढीस लागत होता. आता नेमके त्याचीच कमतरता दिसून येते.

कोरोनाने तर अनेक बाबतीत बदल घडविले. लॅाकडाऊन काळात आणि त्यानंतरच्या काळात देखील पालक आपल्या मुलांना खेळण्यासाठी बाहेर जाऊ देत नव्हते. त्यामुळे सहाजिकच मुलं टीव्ही पहाणे किंवा मोबाइलवर गेम खेळणे याला प्राधान्य देऊ लागली. पालकांनाही नाईलाजाने मुलांच्या हातात मोबाइल द्यावा लागला. यामुळे मात्र मुलांवर विपरीत परिणाम दिसून येऊ लागला. सतत मोबाइल पहाण्यामुळे डोळ्यांचे आजार तर वाढलेच. शिवाय चिडचिडेपणा होणे, एकलकोंडे होणे, डोकेदुखी असे प्रकार वाढले. शिवाय पालक व मुलांमधील संवाददेखील खुंटला. त्यामुळे मुलांसाठी मोबाइल किंवा संगणक यांचा स्क्रीन टाईम किती असावा यासाठी पालकांनीच नियोजन करणे आवश्यक ठरले आहे.