असे का होते?
वारंवार मोबाईलकडे लक्ष
विचार करण्याची प्रक्रिया न करणे
आठवणी, स्मरणशक्ती याकडे दुर्लक्ष
पाढे पाठ न करता कॅल्क्युलेटर वापरणे
कोणत्याही गोष्टीत थेट सोपी पद्धत वापरणे
बुद्धीचा वापर न करता शॉर्टकटकडे कल
अस्थिरता, अस्वस्थता आणि चंचलता वाढणे
हे टाळण्यासाठी...
दिवसभर संपूर्ण कुटुंबाने मोबाईल, टीव्ही, संगणक, टॅब अशी कोणतीही स्क्रीन पाहणे टाळायचे त्याला मोबाईल फास्ट असे नाव द्यायचे.
झोपण्याच्या ठिकाणी मोबाईल घेऊन जाऊ नये, पुरेशी झोप घ्यायलाच हवी
मेमरी गेम म्हणजे बुद्धिबळ, कॅरम, स्मरणशक्तीचे खेळ प्रत्यक्ष खेळणे, मोबाईलवरील गेम नव्हे
पाठांतर करणे, स्तोत्र मंत्र म्हणणे, कविता, भाषण, संवाद कला जोपासणे
चिंतन, मनन करणे, प्राणायाम, योग, व्यायाम करणे
मुलांना,आई वडिलांना नंबर पाठ कारण...
ऑनलाइन शिक्षणामुळे मोबाईल मुलांच्या जीवनाचाही अविभाज्य घटक बनला आहे. याचे फायदे नव्हे तर तोटेच अधिक दिसत आहेत. मेंदू हा यंत्राप्रमाणेच विचार करू लागला आहे. त्यामुळे मुलांची विचारक्षमता खुंटत आहे. एखाद्या प्रश्नाचे उत्तर काय असू शकते किंवा गणिताची आकडेमोड हेदेखील मुलांना मोबाईलशिवाय करता येण शक्य होत नाही.
-रवींद्र काशीराम कटारे, पालक, ब्राह्मणपुरी
ऑनलाइन शिक्षणाच्या नावाखाली मुले गेम खेळत बसतात. त्यामुळे त्यांची विचार क्षमता कमी होताना दिसून येत आहे. त्याचबरोबर वाचनाची गोडीदेखील कमी होताना दिसून येत आहे. त्यामुळे लहान मुलांना नंबर पाठ नसल्याचे दिसून येते.
-शितल रवींद्र कटारे, ब्राह्मणपुरी
शाळेचे शिक्षण ऑनलाइन असल्यामुळे तेवढ्यापुरताच मोबाईलचा वापर करते. आई-बाबांनी ऑनलाइन क्लासव्यतिरिक मोबाइल वापरण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे मोबाइलची फारसी सवय नाही.
-दिव्यानी रवींद्र कटारे, विद्यार्थिनी, ब्राह्मणपुरी
सध्या मोबाईलचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. आधी आपल्याकडे पर्याय उपलब्ध नसल्याने आपण नंबर पाठ करीत होतो. परंतु आता मोबाईलमुळे नंबर पाठ करण्याची गरजच राहिली नाही. गरज उरली नाही म्हणून मेंदूत मेमरी निर्माण करण्याची आवश्यकता राहिली नाही. यामुळे मेंदूतील मेमरीवर फिजीओलॉजीकल व सायकोलॉजीकल फरक पडत आहे.
-चंद्रकांत जोशी, मानसोपचार तज्ज्ञ, नंदुरबार