शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
3
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
4
Mumbai Local: नव्या लोकलचे दरवाजे आपोआप बंद होणार, मुंबई रेल्वे अपघातानंतर प्रशासनाला जाग!
5
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?
6
अहिल्यानगर : एमपीएल क्रिकेट सामना बघून परताना गाडीचा भीषण अपघात; जळगावमधील दोन ठार, ११ जखमी
7
मुलाचा जन्म, पण उपचारादरम्यान मातेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती
8
"मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला", २५ वर्ष लहान अभिनेत्रीने मिथुन चक्रवर्तींवर केलेला आरोप
9
पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिले; 'बेवफा' सोनम प्रियकरासोबत युपीत सापडली...
10
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
11
Vat Purnima 2025: केवळ सौभाग्यासाठी नाही, तर दीर्घायुष्यासाठी करा वटवृक्षाची पुजा!
12
भारतात पहिल्यांदाच MCX नं केलं असं काम की विक्रमी उच्चांकी स्तरावर पोहोचले शेअर्स, जाणून घ्या
13
"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय?
14
"गेल्या १० वर्षांपासून मी मानसोपचार...", अमृता सुभाषने केला खुलासा; कारणही सांगितलं
15
अनिल अंबानींची कंपनी करणार ₹५००० कोटींची गुंतवणूक; संरक्षण क्षेत्रात इतिहास रचण्यास तयार
16
७ वर्षांत एफडीआयमध्ये महाराष्ट्र टॉप, परदेशातील सर्वाधिक गुंतवणूक राज्यात; पायाभूत सुविधांतील सुधारणा ठरतेय मोठ्या फायद्याची
17
आऊट देताच महिला अंपायरवर भडकला अश्निन, रागाच्या भरात पॅडवर मारली बॅट!
18
हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक
19
Sonam Raghuwanshi: राजा रघुवंशीची हत्या करण्यासाठी सोनमने घेतली तिघांची मदत; दोघांना अटक, एक फरार

परीक्षा रद्दबाबत पालकांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:29 IST

जानेवारी २०२० पासून भारतात कोरोनाचा शिरकाव झाला आणि मार्चपर्यंत कोरोनाने भयंकर रूप धारण केल्याने २२ मार्च २०२० पासून लाॅकडाऊन ...

जानेवारी २०२० पासून भारतात कोरोनाचा शिरकाव झाला आणि मार्चपर्यंत कोरोनाने भयंकर रूप धारण केल्याने २२ मार्च २०२० पासून लाॅकडाऊन लागले होते. सुदैवाने तोपर्यंत दहावी व बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा आटोपल्या होत्या. फक्त दहावीचा एक पेपर रद्द झाला होता. पहिली ते नववी आणि अकरावीच्या परीक्षा रद्द करून सर्व विद्यार्थ्यांना सरसकट पुढील वर्गात पाठविण्यात आले होते. यंदादेखील कोरोनाने पुन्हा डोके वर काढले असून मागील वर्षापेक्षा कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक असल्याने शालेय शिक्षणमंत्र्यांनी पहिली ते आठवीपर्यंत परीक्षा होणार नसल्याचे तर नववी व अकरावीबाबत लवकरच निर्णय घेणार असल्याचे जाहीर केले आहे. या निर्णयाने पालक व शैक्षणिक वर्तुळात संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. गेली वर्षभर पहिली ते आठवीच्या शाळाच सुरू झाल्या नाहीत. नववी ते बारावीपर्यंत शाळा सुरू झाल्या असल्या तरी १०० टक्के विद्यार्थी उपस्थित नसल्याने अनेक विद्यार्थी प्रत्यक्ष शिक्षणापासून वंचित राहिले ऑनलाईन शिक्षणही १०० टक्के यशस्वी न झाल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. अशात परीक्षा झाल्या तरी विद्यार्थी परीक्षेला सामोरे कसे जाणार हा प्रश्न आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता यंदादेखील नववी आणि अकरावीच्या परीक्षा होण्याची शक्यता कमीच आहे. दहावी-बारावीच्या परीक्षा ऑफलाईन झाल्यास तीदेखील मोठी रिस्क ठरू शकते. एकंदरीतच यंदाचे संपूर्ण शैक्षणिक वर्षदेखील ढकलपासच होणार असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबरोबरच त्यांच्या आरोग्याबाबतही पालकांना चिंता आहे. शाळा सुरू झाल्या तर आरोग्याचा प्रश्न आणि शाळा बंद राहिल्या तर शिक्षणाचा प्रश्न अशा कात्रीत पालक सापडले आहेत.