शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

परीक्षा रद्दबाबत पालकांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:29 IST

जानेवारी २०२० पासून भारतात कोरोनाचा शिरकाव झाला आणि मार्चपर्यंत कोरोनाने भयंकर रूप धारण केल्याने २२ मार्च २०२० पासून लाॅकडाऊन ...

जानेवारी २०२० पासून भारतात कोरोनाचा शिरकाव झाला आणि मार्चपर्यंत कोरोनाने भयंकर रूप धारण केल्याने २२ मार्च २०२० पासून लाॅकडाऊन लागले होते. सुदैवाने तोपर्यंत दहावी व बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा आटोपल्या होत्या. फक्त दहावीचा एक पेपर रद्द झाला होता. पहिली ते नववी आणि अकरावीच्या परीक्षा रद्द करून सर्व विद्यार्थ्यांना सरसकट पुढील वर्गात पाठविण्यात आले होते. यंदादेखील कोरोनाने पुन्हा डोके वर काढले असून मागील वर्षापेक्षा कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक असल्याने शालेय शिक्षणमंत्र्यांनी पहिली ते आठवीपर्यंत परीक्षा होणार नसल्याचे तर नववी व अकरावीबाबत लवकरच निर्णय घेणार असल्याचे जाहीर केले आहे. या निर्णयाने पालक व शैक्षणिक वर्तुळात संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. गेली वर्षभर पहिली ते आठवीच्या शाळाच सुरू झाल्या नाहीत. नववी ते बारावीपर्यंत शाळा सुरू झाल्या असल्या तरी १०० टक्के विद्यार्थी उपस्थित नसल्याने अनेक विद्यार्थी प्रत्यक्ष शिक्षणापासून वंचित राहिले ऑनलाईन शिक्षणही १०० टक्के यशस्वी न झाल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. अशात परीक्षा झाल्या तरी विद्यार्थी परीक्षेला सामोरे कसे जाणार हा प्रश्न आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता यंदादेखील नववी आणि अकरावीच्या परीक्षा होण्याची शक्यता कमीच आहे. दहावी-बारावीच्या परीक्षा ऑफलाईन झाल्यास तीदेखील मोठी रिस्क ठरू शकते. एकंदरीतच यंदाचे संपूर्ण शैक्षणिक वर्षदेखील ढकलपासच होणार असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबरोबरच त्यांच्या आरोग्याबाबतही पालकांना चिंता आहे. शाळा सुरू झाल्या तर आरोग्याचा प्रश्न आणि शाळा बंद राहिल्या तर शिक्षणाचा प्रश्न अशा कात्रीत पालक सापडले आहेत.