शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

सार्वजनिक बांधकाम विभागाकडून भूसंपादन करताना शेतकऱ्यांची दिशाभूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:59 IST

याबाबत संबंधित विभागाकडे लेखी तक्रार करून जमीन भूसंपादनाबाबत चौकशी केली असता शेतकऱ्यांना खुलासा न करता व भूसंपादित जमिनीचे प्रस्ताव ...

याबाबत संबंधित विभागाकडे लेखी तक्रार करून जमीन भूसंपादनाबाबत चौकशी केली असता शेतकऱ्यांना खुलासा न करता व भूसंपादित जमिनीचे प्रस्ताव तयार न करता उडवाउडवीची उत्तर देऊन शेतकऱ्यांना शासकीय नियमानुसार मोबदला न देता आर्थिक नुकसान करीत आहे. केंद्रीय दळणवळण विभाग मंत्रालयाचे भूसंपादित जमिनीचा मोबदला देण्याकामी यापूर्वीचे आदेश करून शेतकऱ्यांचे शोषण व पिळवणूक न करता परिपत्रकाप्रमाणे टीएलआर विभागाकडून सविस्तर मोजणी करून मोजणी सीटनुसार व प्रचलित बाजारभावाप्रमाणे नुकसान भरपाई मोबदला देण्याचे स्पष्ट आदेश असताना या भागातील शेतकऱ्यांसाठी सार्वजनिक बांधकाम विभाग नंदुरबार व जिल्हा भूसंपादन अधिकारी यांनी नियमानुसार कोणतीही कारवाई न करता प्रस्ताव विचाराधीन ठेवले आहेत. या भागातील शेतकरी आधीच कर्जबाजारी असून अल्पभूधारक आहेत. शासनाने सहमती न घेता परस्पर जमिनी संपादित करून चौपदरीकरणाचे काम सुरू करून अन्याय केला आहे. तसेच राज्य महामार्ग प्रकाशा ते तोरणमाळ दरम्यान रस्ता चौपदरीकरण करण्याच्या कामाबाबत काथर्दे दिगर, ता.शहादा येथील अनेक शेतकऱ्यांनी २४ ऑक्टोबर २०२० रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली होती. संबंधित प्रकरणातील दखल घेऊन १२ नोव्हेंबर २०२० रोजी तक्रारदार शेतकरी, तहसीलदार व कार्यकारी अभियंता यांच्यासह रस्ता कामाचे ठेकेदार यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत सर्व बाबींवर चर्चा होऊन शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून हा रस्ता नकाशा अधिकृत आहे की नाही याबाबत खात्री करून चौकशी करण्याचे ठरले होते. तसेच सर्व शेतकऱ्यांनी सर्व रस्त्यालगत असणाऱ्या शेतीची मोजणी करून देण्याची मागणीही केली होती. ही बैठक होऊन दोन महिने होऊनही संबंधितांकडून कोणतीही कारवाई झालेली नाही. माहितीच्या अधिकारात मागितलेली माहितीही सार्वजनिक बांधकाम विभागाने दिलेली नाही. त्यामुळे रस्ता ठेकेदारास कोणतेही आदेश नसल्यामुळे अर्धवट काम केल्याने रस्त्याचा वापर करणे अत्यंत त्रासदायक झाले असून शेतकऱ्यांना शेतमालाची वाहतूक करण्यासाठी अनेक अडचणी येत आहेत. रस्त्यावर उडणाऱ्या धुळीमुळे पिके खराब होत आहेत. त्यात शेतकऱ्यांचे आतापावेतो सुमारे १५ लाखांचे नुकसान झालेले आहे. म्हणून संबंधितांनी सहानुभूतीने विचार करावा व शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी नंदुरबार जिल्हाधिकाऱ्यांनाही निवेदन देण्यात आले होते. पण त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे, असे काथर्दे दिगर येथील सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील व गावातील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.