शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

सार्वजनिक बांधकाम विभागाकडून भूसंपादन करताना शेतकऱ्यांची दिशाभूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:59 IST

याबाबत संबंधित विभागाकडे लेखी तक्रार करून जमीन भूसंपादनाबाबत चौकशी केली असता शेतकऱ्यांना खुलासा न करता व भूसंपादित जमिनीचे प्रस्ताव ...

याबाबत संबंधित विभागाकडे लेखी तक्रार करून जमीन भूसंपादनाबाबत चौकशी केली असता शेतकऱ्यांना खुलासा न करता व भूसंपादित जमिनीचे प्रस्ताव तयार न करता उडवाउडवीची उत्तर देऊन शेतकऱ्यांना शासकीय नियमानुसार मोबदला न देता आर्थिक नुकसान करीत आहे. केंद्रीय दळणवळण विभाग मंत्रालयाचे भूसंपादित जमिनीचा मोबदला देण्याकामी यापूर्वीचे आदेश करून शेतकऱ्यांचे शोषण व पिळवणूक न करता परिपत्रकाप्रमाणे टीएलआर विभागाकडून सविस्तर मोजणी करून मोजणी सीटनुसार व प्रचलित बाजारभावाप्रमाणे नुकसान भरपाई मोबदला देण्याचे स्पष्ट आदेश असताना या भागातील शेतकऱ्यांसाठी सार्वजनिक बांधकाम विभाग नंदुरबार व जिल्हा भूसंपादन अधिकारी यांनी नियमानुसार कोणतीही कारवाई न करता प्रस्ताव विचाराधीन ठेवले आहेत. या भागातील शेतकरी आधीच कर्जबाजारी असून अल्पभूधारक आहेत. शासनाने सहमती न घेता परस्पर जमिनी संपादित करून चौपदरीकरणाचे काम सुरू करून अन्याय केला आहे. तसेच राज्य महामार्ग प्रकाशा ते तोरणमाळ दरम्यान रस्ता चौपदरीकरण करण्याच्या कामाबाबत काथर्दे दिगर, ता.शहादा येथील अनेक शेतकऱ्यांनी २४ ऑक्टोबर २०२० रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली होती. संबंधित प्रकरणातील दखल घेऊन १२ नोव्हेंबर २०२० रोजी तक्रारदार शेतकरी, तहसीलदार व कार्यकारी अभियंता यांच्यासह रस्ता कामाचे ठेकेदार यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत सर्व बाबींवर चर्चा होऊन शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून हा रस्ता नकाशा अधिकृत आहे की नाही याबाबत खात्री करून चौकशी करण्याचे ठरले होते. तसेच सर्व शेतकऱ्यांनी सर्व रस्त्यालगत असणाऱ्या शेतीची मोजणी करून देण्याची मागणीही केली होती. ही बैठक होऊन दोन महिने होऊनही संबंधितांकडून कोणतीही कारवाई झालेली नाही. माहितीच्या अधिकारात मागितलेली माहितीही सार्वजनिक बांधकाम विभागाने दिलेली नाही. त्यामुळे रस्ता ठेकेदारास कोणतेही आदेश नसल्यामुळे अर्धवट काम केल्याने रस्त्याचा वापर करणे अत्यंत त्रासदायक झाले असून शेतकऱ्यांना शेतमालाची वाहतूक करण्यासाठी अनेक अडचणी येत आहेत. रस्त्यावर उडणाऱ्या धुळीमुळे पिके खराब होत आहेत. त्यात शेतकऱ्यांचे आतापावेतो सुमारे १५ लाखांचे नुकसान झालेले आहे. म्हणून संबंधितांनी सहानुभूतीने विचार करावा व शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी नंदुरबार जिल्हाधिकाऱ्यांनाही निवेदन देण्यात आले होते. पण त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे, असे काथर्दे दिगर येथील सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील व गावातील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.