दरम्यान उपस्थित शेतकऱ्यांनी सद्यपरिस्थितीत एवढे बिल भरणे शक्य नसल्याचे सांगितले. यावर तोडगा म्हणून जयसिंग माळी यांनी पाच हजार व नंतर उर्वरित दोन हजार असे भरू असे सांगताच संबंधित अधिकाऱ्यांनी शासनाच्या नियमानुसार वीज बिलाचा भरणा करावाच लागेल असे सांगितले. तसेच शेतकऱ्यांनी ट्रान्सफार्मरवरील कनेक्शन कट केल्यास आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही संबंधितांना दिला. यावेळी जयसिंग माळी, डॉ. पुंडलिक राजपूत, दत्तात्रय पाटील, नंदुगीर गोसावी, बबन गोसावी, राजेंद्र गोसावी, विलास चौधरी, किरण चौधरी, दिलीप पाटील, योगेश चौधरी, बबन चौधरी, मंगेश पाटील, गुलाबसिंग गिरासे, शहादा उपविभागीय कार्यकारी अभियंता के.डी. पावरा, अतिरिक्त कार्यकारी अभियंता रामेश्वर एन. सोनत, तळोदा वीज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अधिकारी प्रदीप चहाडे, बोरद उपकेंद्राचे कनिष्ठ अभियंता विलास गुरव, नीरज कुमार, इमरान पिंजारी, लाईनमन, वायरमन उपस्थित होते.
तळोदा तालुक्याची वीज बिलाची एकूण थकबाकी १२० काेटी असून, त्यातील ४० लाखाचा भरणा झाला आहे. घरगुती थकबाकी एक कोटी २० लाख असून, ९० लाखांचा भरणा असल्याचे चहाडे यांनी सांगितले.