शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

नर्मदा खोऱ्यातील प्रश्नांसदर्भात मेधा पाटकरांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:28 IST

यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, सरदार सरोवर विस्थापन व पुनर्वसनात विस्थापितांवर मोठ्या प्रमाणात अन्याय केला जात ...

यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, सरदार सरोवर विस्थापन व पुनर्वसनात विस्थापितांवर मोठ्या प्रमाणात अन्याय केला जात आहे. प्रशासन स्तरावर केवळ कागदीच घोडे नाचविले जातात. त्यामुळे सरदार सरोवर पुनर्वसन, विस्थापन, तसेच सरदार सरोवरचा महाराष्ट्रास लाभहानी आणि त्याचबरोबर फडणवीस सरकारने गुजरातशी केलेला अवैध करार, या मुद्यावर आपल्या सोयीने लवकरात लवकर एक बैठक लावावी, अशी लेखी मागणी केली.

नर्मदा खोऱ्यातील पाणी हे या खोऱ्यातील आदिवासींना वंचित ठेवून तापीच्या खोऱ्यात वळविण्यासाठी प्रस्तावित केलेल्या आठ मध्यम प्रकल्पांना ग्रामसभांचा व अभ्यासकांचा विरोध आहे व राहील. या आराखड्यावर पुनर्विचार व नर्मदा खोऱ्यातच विकेंद्रित जलनियोजन हेही आपल्या चर्चेत घेणे आवश्यक आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील ७३ वनगावातील आदिवासींना अजूनही भूमीहक्क मिळालेले नाहीत. सर्व ७/१२ उतारे तयार असून, तसेच ७३ गावांचे महसुलीकरण हे राजपत्राद्वारे नोंदले असूनही हे काम विनाकारण अडवून पडले आहे. ज्यामुळे अनेक वर्षांपासूनचा आदिवासींवरील अन्याय दूर होईल. २००६ च्या वनाधिकार कायद्याची अंमलबजावणी ही या जिल्ह्यातील धडगाव व अक्कलकुवा तालुक्यातील दुर्गम गावांसाठी आदिवासी शेतकरी व गावांचा सामूहिक वनहक्क याबाबतीत हे प्राधान्याने होणे आवश्यक आहे.

वरील मुद्यांवर लवकर बैठक लावावी व चर्चेत नर्मदा घाटीतील अन्य प्रश्नावर चर्चा करण्यात येईल, अशा आशयाचे निवेदन देण्यात आले.

याप्रसंगी लवकरच मंत्रालयात बैठक लावण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. यावेळी नर्मदा बचाव आंदोलनाच्या लतिका राजपूत, चेतन साळवे, पुण्या वसावे, मंगल्या वसावे, खेमसिंग पाडवी, ओरसिंग पटले, नाथ्या वसावे, सीताराम पाडवी, जोरदार पावरा आदी उपस्थित होते.

गाभा समितीत नर्मदा बचाव आंदोलनाच्या कार्यकर्ती व अशासकीय सदस्य लतिका राजपूत या तळोदा, धडगाव व अक्कलकुवा तालुक्यातील आरोग्याच्या प्रश्नाबाबत नेहमीच सूचना मांडतात; परंतु अजूनही बरेच प्रश्न प्रलंबित आहेत. त्यातही आरोग्य कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागांचा मोठा प्रश्न आहे. साहजिकच यामुळे येथील आदिवासींना पुरेशा आरोग्य सुविधा मिळणे अशक्य असते. तेव्हा कर्मचाऱ्यांचा प्रश्न मार्गी लावावा, अशी आस त्यांनी प्रत्यक्ष मुख्यमंत्र्यांशी बोलून दाखवली.