शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
3
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
4
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
5
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
6
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
7
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
8
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
9
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
10
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
11
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
12
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
13
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
14
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
15
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
16
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
17
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
20
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान

नर्मदा खोऱ्यातील प्रश्नांसदर्भात मेधा पाटकरांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:28 IST

यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, सरदार सरोवर विस्थापन व पुनर्वसनात विस्थापितांवर मोठ्या प्रमाणात अन्याय केला जात ...

यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, सरदार सरोवर विस्थापन व पुनर्वसनात विस्थापितांवर मोठ्या प्रमाणात अन्याय केला जात आहे. प्रशासन स्तरावर केवळ कागदीच घोडे नाचविले जातात. त्यामुळे सरदार सरोवर पुनर्वसन, विस्थापन, तसेच सरदार सरोवरचा महाराष्ट्रास लाभहानी आणि त्याचबरोबर फडणवीस सरकारने गुजरातशी केलेला अवैध करार, या मुद्यावर आपल्या सोयीने लवकरात लवकर एक बैठक लावावी, अशी लेखी मागणी केली.

नर्मदा खोऱ्यातील पाणी हे या खोऱ्यातील आदिवासींना वंचित ठेवून तापीच्या खोऱ्यात वळविण्यासाठी प्रस्तावित केलेल्या आठ मध्यम प्रकल्पांना ग्रामसभांचा व अभ्यासकांचा विरोध आहे व राहील. या आराखड्यावर पुनर्विचार व नर्मदा खोऱ्यातच विकेंद्रित जलनियोजन हेही आपल्या चर्चेत घेणे आवश्यक आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील ७३ वनगावातील आदिवासींना अजूनही भूमीहक्क मिळालेले नाहीत. सर्व ७/१२ उतारे तयार असून, तसेच ७३ गावांचे महसुलीकरण हे राजपत्राद्वारे नोंदले असूनही हे काम विनाकारण अडवून पडले आहे. ज्यामुळे अनेक वर्षांपासूनचा आदिवासींवरील अन्याय दूर होईल. २००६ च्या वनाधिकार कायद्याची अंमलबजावणी ही या जिल्ह्यातील धडगाव व अक्कलकुवा तालुक्यातील दुर्गम गावांसाठी आदिवासी शेतकरी व गावांचा सामूहिक वनहक्क याबाबतीत हे प्राधान्याने होणे आवश्यक आहे.

वरील मुद्यांवर लवकर बैठक लावावी व चर्चेत नर्मदा घाटीतील अन्य प्रश्नावर चर्चा करण्यात येईल, अशा आशयाचे निवेदन देण्यात आले.

याप्रसंगी लवकरच मंत्रालयात बैठक लावण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. यावेळी नर्मदा बचाव आंदोलनाच्या लतिका राजपूत, चेतन साळवे, पुण्या वसावे, मंगल्या वसावे, खेमसिंग पाडवी, ओरसिंग पटले, नाथ्या वसावे, सीताराम पाडवी, जोरदार पावरा आदी उपस्थित होते.

गाभा समितीत नर्मदा बचाव आंदोलनाच्या कार्यकर्ती व अशासकीय सदस्य लतिका राजपूत या तळोदा, धडगाव व अक्कलकुवा तालुक्यातील आरोग्याच्या प्रश्नाबाबत नेहमीच सूचना मांडतात; परंतु अजूनही बरेच प्रश्न प्रलंबित आहेत. त्यातही आरोग्य कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागांचा मोठा प्रश्न आहे. साहजिकच यामुळे येथील आदिवासींना पुरेशा आरोग्य सुविधा मिळणे अशक्य असते. तेव्हा कर्मचाऱ्यांचा प्रश्न मार्गी लावावा, अशी आस त्यांनी प्रत्यक्ष मुख्यमंत्र्यांशी बोलून दाखवली.