शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
3
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
4
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
5
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
6
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
7
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
8
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
9
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
10
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
11
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
12
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
13
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
14
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
15
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
16
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
17
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
18
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
19
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
20
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
Daily Top 2Weekly Top 5

गणित, विज्ञानाच्या गुणवत्तेत नंदुरबार जिल्हा राज्यात दुसरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2018 19:18 IST

रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील 50 टक्के विद्याथ्र्याना लिहिता-वाचता येत नसल्याचा असर संस्थेने दिलेल्या अहवालानंतर राष्ट्रीय शिक्षा अनुसंधान परिषदेने केलेल्या सव्र्हेक्षणात जिल्ह्यातील गुणवत्ता वरचढ ठरली आहे. इयत्ता आठवीच्या मराठी, गणित, विज्ञान आणि सामाजिक शास्त्र या विषयासाठी झालेल्या सव्र्हेक्षणात जिल्हा राज्यात दुसरा आला आहे.नंदुरबार जिल्ह्यातील शैक्षणिक गुणवत्ता हा नेहमीच ...

रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील 50 टक्के विद्याथ्र्याना लिहिता-वाचता येत नसल्याचा असर संस्थेने दिलेल्या अहवालानंतर राष्ट्रीय शिक्षा अनुसंधान परिषदेने केलेल्या सव्र्हेक्षणात जिल्ह्यातील गुणवत्ता वरचढ ठरली आहे. इयत्ता आठवीच्या मराठी, गणित, विज्ञान आणि सामाजिक शास्त्र या विषयासाठी झालेल्या सव्र्हेक्षणात जिल्हा राज्यात दुसरा आला आहे.नंदुरबार जिल्ह्यातील शैक्षणिक गुणवत्ता हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे.  सातपुडय़ातील जिल्हा परिषदेच्या पिशवी शाळांचा प्रश्न, शिक्षकांकरवी परस्पर पोटशिक्षक नेमण्याची प्रथा, 22 ते 25 वर्ष वयोगटातील तरुणांना पहिली किंवा दुसरीच्या वर्गात प्रवेश देण्याचे प्रकरणे या सा:याच बाबी शरमेने मान खाली घालाव्या लागण्यासारखे प्रकार याच जिल्ह्यात घडले. या पाश्र्वभुमिवर गेल्यावर्षीच केंद्र सरकारने असर संस्थेमार्फत केलेल्या सव्र्हेक्षणातील अहवाल हा धक्कादायक होता. अशा स्थितीत राष्ट्रीय शिक्षा अनुसंधान परिषद अर्थात एनसीईआरटीने केलेल्या सव्र्हेक्षणाचा अहवाल हा निश्चितच दिलासा देणारा व आशादायी      आहे.या संस्थेमार्फत देशभरात इयत्ता तिसरी, पाचवी या वर्गासाठी भाषा, गणित आणि परिसर अभ्यास हे तीन विषय तर आठवीच्या वर्गासाठी मराठी, गणित, विज्ञान आणि सामाजिक शास्त्रे या चार विषयांसाठी सव्र्हेक्षण करण्यात आले. त्याचा अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला असून त्यात आठवीच्या सव्र्हेक्षणात नंदुरबार जिल्हा राज्यात दुसरा आला आहे. त्यात विज्ञान विषयासाठी 50.61, भाषा विषयासाठी 61.35 तर गणित विषयासाठी 50.82 आणि सामाजिक शास्त्रासाठी 52.32 टक्के गुणवत्ता मिळाली आहे. विशेष म्हणजे राज्यात याचे सरासरी प्रमाण अनुक्रमे 39.93, 62.27, 40.04 आणि 41.50 आहे. पहिल्या क्रमांकावर बीड जिल्हा राहिला आहे. तिसरीच्या सव्र्हेक्षणात मात्र जिल्हा राज्यात परिसर अभ्यास या विषयात 27 वा, भाषा विषयात 22 वा आणि गणित विषयात 23 व्या क्रमांकावर आहे. पाचवीच्या वर्गाच्या सव्र्हेक्षणात मात्र, समाधानकारक कामगिरी दिसून येते. या सव्र्हेक्षणात जिल्हा राज्यात परिसर अभ्यास विषयासाठी आठव्या, भाषा विषयात 20 व्या आणि गणित विषयात नवव्या क्रमांकावर आहे. एकुणच 69 टक्के आदिवासी लोकसंख्या असलेल्या या जिल्ह्यात आधीच शिक्षणाच्या नावाची ओरड आहे. सातपुडय़ातील दुर्गम, अतिदुर्गम भागातील भौगोलिक स्थितीमुळे अनेक अडचणी असतांना त्यावर मात करीत आता जिल्हाही शिक्षणाच्या बाबतीत पुढे जावू लागला आहे. हे एक आशादायक चित्र आहे. तथापी केवळ एका सव्र्हेक्षणावर समाधान न मानता शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी अजूनही अनेक त्रूटी दूर करून परिश्रम घेण्याची आवश्यकता आहे. किंबहुना असरच्या अहवालावरही गांभिर्याने विचार करण्याची आवश्यकता आहे.