शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

नंदुरबारात सर्वधर्मीय 84 जोडप्यांचा विवाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 12:37 IST

जिल्हाभरातील दात्यांकडून विविध मदत, शासनाचा उपक्रम

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 7 : सर्वधर्मीय सामुदायीक विवाह सोहळयात 84 जोडप्यांचा विवाह लावण्यात आला. यापैकी 44 जोडप्यांनी दहिंदुले, ता.नंदुरबार येथे सकाळी वॉटरकप स्पर्धेअंतर्गत महाश्रमदानातही सहभाग घेतला. जिल्ह्यातील धर्मादाय आयुक्त कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, धर्मादाय संस्था व जिल्हास्तरीय सामुहिक विवाह समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सर्वधर्मिय सामुदायीक विवाह  सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. एकुण 80 जोडप्यांनी सहभाग नोंदविला होता. परंतु अंतिम दिवसार्पयत एकुण 84 जणांची नोंदणी झाली. शहरातील माळीवाडा परिसरात भव्य मंडप टाकण्यात आला होता. सकाळपासूनच या भागात एकच लगबग सुरू होती. जिल्हाभरातील उपवर व वधू आणि त्यांचे नातेवाईक दाखल होत होते. त्यामुळे या परिसराला यात्रेचे स्वरूप आले होते. आयोजकांकडून विविध बाबींची सोय या ठिकाणी करण्यात आली होती. सकाळी जोडप्यांची वरात करण्यात आली. त्यानंतर ज्या त्या धर्मानुसार व जातीरिवाजानुसार विवाह लावण्यात आले.यावेळी पालकमंत्री जयकुमार रावल, आमदार डॉ.विजयकुमार गावीत, आमदार चंद्रकांत रघुवंशी, जिल्हा सत्र न्यायाधिश अभय वाघवसे, जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी, धर्मादाय सहआयुक्त प्रदीप घुगे, पोलीस अधीक्षक संजय पाटील, सहायक धर्मादाय आयुक्त सुधीर वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. समितीत गजेंद्र शिंपी, पंडित माळी, देविसिंग राजपूत, डॉ.तेजल चौधरी, सुलभा महिरे, सुभाष पानपाटील, डॉ.भरत वळवी, परवेजखान, शनिश्वर मंदीर ट्रस्ट, गोपाळ शिंपी, हिरालाल माळी, सारंगखेडा श्री दत्त मंदीर ट्रस्ट, व्ही.सी.चौधरी, अॅड.गौतम पावरा, रवींद्र शिंपी, रऊफ शेख, सतिष लाड जि.प.सदस्य अभिजीत पाटील यांनी दोन लाख 51 हजार रुपये देणगी दिली. एन.टी.व्ही.एस. संस्थेकडून 51  हजार रुपये, गोपाल शर्मा यांच्याकडून वधू-वरांना कपडे देण्यात आले. शनैश्वर मंदीर शनिमांडळ संस्थेकडून मंगळसूत्रासाठी 31 ग्रॅम सोने तर हिरा ग्रृपतर्फे 15 ग्रॅम सोने देण्यात आले. राजेंद्रकुमार गावीत व आदिवासी देवमोगरा संस्थेकडून सर्वच जोडप्यांना संसारोपयोगी साहित्य देण्यात आले. आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी शहरातील मतदार यादीत नाव असलेल्या सर्वच उपवर व वधूंना प्रत्येकी पाच हजार रुपये देण्याचे जाहीर केले. पालकमंत्र्यांच्या हस्ते जोडप्यांना नोंदणी प्रमाणपत्र देण्यात आले.यावेळी बोलतांना पालकमंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले, जिल्ह्याच्या दृष्टीने ही अभिमानाची गोष्ट आहे. आयोजक समितीने देखील मेहनमत घेवून सोहळा यशस्वीपणे पार पाडला. पुढील वर्षी किमान 200 जोडप्यांचा सहभाग राहील यादृष्टीने नियोजन करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.वैदीक पद्धतीने विवाह वसंत उदारे व कमलेश पंडित यांनी पार पाडला. सूत्रसंचलन रणजित राजपूत यांनी केले.