शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

नंदुरबारात सर्वधर्मीय 84 जोडप्यांचा विवाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 12:37 IST

जिल्हाभरातील दात्यांकडून विविध मदत, शासनाचा उपक्रम

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 7 : सर्वधर्मीय सामुदायीक विवाह सोहळयात 84 जोडप्यांचा विवाह लावण्यात आला. यापैकी 44 जोडप्यांनी दहिंदुले, ता.नंदुरबार येथे सकाळी वॉटरकप स्पर्धेअंतर्गत महाश्रमदानातही सहभाग घेतला. जिल्ह्यातील धर्मादाय आयुक्त कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, धर्मादाय संस्था व जिल्हास्तरीय सामुहिक विवाह समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सर्वधर्मिय सामुदायीक विवाह  सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. एकुण 80 जोडप्यांनी सहभाग नोंदविला होता. परंतु अंतिम दिवसार्पयत एकुण 84 जणांची नोंदणी झाली. शहरातील माळीवाडा परिसरात भव्य मंडप टाकण्यात आला होता. सकाळपासूनच या भागात एकच लगबग सुरू होती. जिल्हाभरातील उपवर व वधू आणि त्यांचे नातेवाईक दाखल होत होते. त्यामुळे या परिसराला यात्रेचे स्वरूप आले होते. आयोजकांकडून विविध बाबींची सोय या ठिकाणी करण्यात आली होती. सकाळी जोडप्यांची वरात करण्यात आली. त्यानंतर ज्या त्या धर्मानुसार व जातीरिवाजानुसार विवाह लावण्यात आले.यावेळी पालकमंत्री जयकुमार रावल, आमदार डॉ.विजयकुमार गावीत, आमदार चंद्रकांत रघुवंशी, जिल्हा सत्र न्यायाधिश अभय वाघवसे, जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी, धर्मादाय सहआयुक्त प्रदीप घुगे, पोलीस अधीक्षक संजय पाटील, सहायक धर्मादाय आयुक्त सुधीर वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. समितीत गजेंद्र शिंपी, पंडित माळी, देविसिंग राजपूत, डॉ.तेजल चौधरी, सुलभा महिरे, सुभाष पानपाटील, डॉ.भरत वळवी, परवेजखान, शनिश्वर मंदीर ट्रस्ट, गोपाळ शिंपी, हिरालाल माळी, सारंगखेडा श्री दत्त मंदीर ट्रस्ट, व्ही.सी.चौधरी, अॅड.गौतम पावरा, रवींद्र शिंपी, रऊफ शेख, सतिष लाड जि.प.सदस्य अभिजीत पाटील यांनी दोन लाख 51 हजार रुपये देणगी दिली. एन.टी.व्ही.एस. संस्थेकडून 51  हजार रुपये, गोपाल शर्मा यांच्याकडून वधू-वरांना कपडे देण्यात आले. शनैश्वर मंदीर शनिमांडळ संस्थेकडून मंगळसूत्रासाठी 31 ग्रॅम सोने तर हिरा ग्रृपतर्फे 15 ग्रॅम सोने देण्यात आले. राजेंद्रकुमार गावीत व आदिवासी देवमोगरा संस्थेकडून सर्वच जोडप्यांना संसारोपयोगी साहित्य देण्यात आले. आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी शहरातील मतदार यादीत नाव असलेल्या सर्वच उपवर व वधूंना प्रत्येकी पाच हजार रुपये देण्याचे जाहीर केले. पालकमंत्र्यांच्या हस्ते जोडप्यांना नोंदणी प्रमाणपत्र देण्यात आले.यावेळी बोलतांना पालकमंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले, जिल्ह्याच्या दृष्टीने ही अभिमानाची गोष्ट आहे. आयोजक समितीने देखील मेहनमत घेवून सोहळा यशस्वीपणे पार पाडला. पुढील वर्षी किमान 200 जोडप्यांचा सहभाग राहील यादृष्टीने नियोजन करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.वैदीक पद्धतीने विवाह वसंत उदारे व कमलेश पंडित यांनी पार पाडला. सूत्रसंचलन रणजित राजपूत यांनी केले.