शहरं
Join us  
Trending Stories
1
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
4
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिला सर्वोच्च सन्मान
5
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
6
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
7
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
8
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
9
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
10
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
11
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
12
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
13
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
14
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
15
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
16
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
17
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
18
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
19
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
20
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
Daily Top 2Weekly Top 5

बाजारपेठेतील व्यवहार सुरळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2020 12:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरात लागू करण्यात आलेला ४ दिवशीय लॉकडाऊन शुक्रवारी मध्यरात्री संपल्याने सकाळपासूनच शहरातील बाजारपेठा सुरळीत ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहरात लागू करण्यात आलेला ४ दिवशीय लॉकडाऊन शुक्रवारी मध्यरात्री संपल्याने सकाळपासूनच शहरातील बाजारपेठा सुरळीत सुरू झाल्या होत्या. मात्र, शहरात प्रवेश करणाऱ्या अनेक रस्त्यांवरील बॅरीकेटींग जैसे थे ठेवण्यात आलेले होते.नंदुरबारात मंगळवारपासून लॉकडाऊन लागू करण्यात आले होते. चार दिवशीय लॉकडाऊन शुक्रवारी मध्यरात्री संपले. लॉकडाऊन वाढविले नसल्याने शनिवारी सकाळपासून व्यवहार सुरळीत सुरू झाले. सर्वच भागातील बाजारपेठा सुरळीत सुरू झाल्या. सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेची मर्यादा मात्र कायम ठेवण्यात आली. धार्मिक स्थळे बंदच आहेत. ३० जूनपर्यंत रात्रीची अर्थात रात्री ९ ते पहाटे ५ वाजेपर्यंतची संचारबंदी कायम ठेवण्यात आली आहे. शिवाय जमावबंदीचा आदेश देखील कायम राहणार आहे. लग्नकार्य आणि अंत्ययात्रा यांच्यातील उपस्थितीची मर्यादाही कायम आहे.शनिवारी सकाळपासूनच बाजारपेठेत गर्दी होती. बियाणे व खते घेण्यासाठी शेतकरी खाजगी वाहनांनी व ट्रॅक्टर घेवून आलेले होते. दुपारपर्यंत शहरातील चारही भागातील चौफुलींवरील बॅरीकेटींग कायम ठेवण्यात आलेले असल्यामुळे शेतकऱ्यांना अडचणींना सामोरे जावे लागले.४ दिवस बाजारपेठ बंद राहिली असल्यामुळे रविवार सुट्टीच्या दिवशी देखील बाजारपेठ सुरू राहण्याची शक्यता आहे.दरम्यान, ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त कायम होता. वाहतूक शाखेच्या कर्मचाºयांची ड्युटी देखील फिक्स पॉर्इंटवर लावण्यात आलेले होती. त्यामुळे रहदारीचीही फारशी अडचण निर्माण झाली नसल्याचे चित्र शनिवारी दिसून आले.एकजण कोरोनामुक्तनंदुरबारातील गाझीनगर भागातील एक महिला कोरोनामुक्त झाल्यांना त्यांना दुपारी जिल्हा रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. जिल्हा रुग्णालयातील कोवीड कक्षात ३७ जण उपचार घेत होते. त्यापैकी एकजण कोरोनामुक्त झाल्याने आता ३६ जण येथे उपचार घेत आहेत. आणखी तीन जणांचे दुसरा अहवाल निगेटिव्ह आला आहे. आणखी एक अहवाल निगेटिव्ह आल्यावर त्यांनाही रुग्णालयातून सुट्टी दिली जाणार आहे.दरम्यान, गेल्या दोन दिवसात एकही रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेला नाही. अद्याप ८७ अहवालांची प्रतिक्षा आहे.साक्रीनाका ते नवापूर चौफुलीचा रस्ता वाहतुकीसाठी शनिवारीही बंद होता. पाताळगंगा नदीवर लावण्यात आलेले बॅरीकेटींग दुपारपर्यंत कायम होते. त्यामुळे या भागातील नागरिकांना शासकीय कार्यालयांमध्ये जाण्यासाठी धुळेरोड, बायपासमार्गे जावे लागत होते. या भागात आढळलेल्या कोरोना रुग्णाचा मृत्यू झालेला असल्यामुळे हा भाग आधीच प्रतिबंधीत क्षेत्र घोषीत करण्यात आलेला आहे. त्यामुळे या भागातील बॅरीकेटींग कायम राहणार असल्याचे सांगण्यात आले. केवळ बागवान गल्लीपुरते प्रतिबंधीत क्षेत्र असायला हवे असे असतांना मुख्य रस्ता बंद करण्यामागचे कारण काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.