शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
5
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
6
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
7
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
8
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
9
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
10
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
11
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
12
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
13
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
14
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
15
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
16
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
17
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
18
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
19
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
20
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात

दुर्गम भागातील अनेक गावात अमृत आहार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2020 12:45 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अंगणवाड्यांमधील बालके व मातांना घरपोच अमृत आहार देण्याचे शासनाचे निर्देश असतांना धडगाव ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अंगणवाड्यांमधील बालके व मातांना घरपोच अमृत आहार देण्याचे शासनाचे निर्देश असतांना धडगाव व अक्कलकुवा तालुक्यातील बहुसंख्य गावांना हा आहार अद्यापपर्यंत पोहोचला नसल्याची माहिती समितीच्या सदस्यांनी बैठकीत उपस्थित केली. या वेळी संबंधीत अधिकाऱ्यांची उत्तरे देतांना चांगलीच भंबेरी उडाली होती. येत्या ६ जून पर्यंत या लाभार्थ्यांना आहाराचे वाटप करण्याचा अल्टीमेटम् उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिला. दरम्यान मागील बैठकीत झालेल्या प्रश्नांवर कुठलीच कार्यवाही केली जात नाही. केवळ कागदी घोडे नाचविले जात असल्याने सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती.तळोदा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पात प्रकल्पाधिकारी अविशांत पांडा यांच्च्या अध्यक्षतेखाली नवसंजीवनी समितीची बैठक मंगळवारी घेण्यात आली. या वेळी सदस्य डॉ.कांतीलाल टाटीया, लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे, संजय महाजन, नर्मदा बचाव आंदोलनाच्या लतिका राजपूत, चेतन साळवे, तहसीलदार पंकज लोखंडे, अक्कलकुव्याचे तहसीलदार सचिन म्हस्के, धडगावचे ज्ञानेश्वर सपकाळे, गटविकास अधिकारी सावित्री खर्डे, सी.के. माळी, चंद्रकांत बोडरे, बालविकास प्रकल्प अधिकारी भाऊसाहेब बोरकर, एस.ए. चौधरी, राजकुमार ऐवळे, अभिजित मोलाणे, किशोर पगारे, योगिता नाईक, सहायक गटविकास अधिकारी आर.बी. सोनवणे, वीज वितरण कंपनीचे सचिन काळे, डॉ.वंदना पाटील, अभियंता सागर पवार, एस.व्ही. पवार, राहुल गिरासे, ओरसिंग पटले, रंजना कान्होरे, नायब तहसीलदार शैलेंद्र गवते, सहाय्यक प्रकल्पाधिकारी शैलेश पाटील आदी उपस्थित होते.या वेळी मागील कामांचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर प्रत्येक विभाग निहाय प्रश्न उपस्थित करण्यात आले. तिन्ही तालुक्यातील एकात्मिक बाल विकास प्रकल्पातील अंगणवाड्यामधील लहान बालके व मातांच्या अमृत आहाराविषयी चर्चा करण्यात आली. तेव्हा अक्कलकुवा व धडगाव या दोन तालुक्यांमधील बहुसंख्य दुर्गम गावांमध्ये आजातागायत घरपोच अमृत आहार पोहचविण्यात आला नसल्याची माहिती बहुतेक सर्वच सदस्यांनी उपस्थित केली होती. वास्तविक कोरोना महामारीमुळे लाभार्थ्यांना घरपोच आहार देण्याचे शासनाचे निर्देश होते. तरीही अजून पावेतो आहार का? पोहोचला नाही असा सवाल उपस्थित करण्यात आला होता. त्या वेळी अधिकाºयांनी वाहतुकीच्या अडचणीचे थातूर मातूर उत्तरे दिली होती. येत्या चार ते पाच दिवसात आहार वाटप करण्याची सक्त ताकीद उपविभागीय अधिकाºयांनी दिली. याशिवाय या दोन्ही तालुक्यामधील अनेक प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रांचा प्रश्नही गंभीर असल्याचे सदस्यांनी सांगितले. कुठे उपकेंद्राचे कामे अपूर्ण आहेत तर कुठे रिक्त जागा आहेत. त्यामुळे कुपोषण व मातांचा प्रश्न कसा कमी होईल असा सवालदेखील उपस्थित केला होता. आहाराबाबत सर्व अंगणवाड्यांमध्ये माहिती फलक लावून वाटपाचे नियोजन गावकºयांना सांगा. अक्कलकुवा तालुक्यातील नवानागरमुथा येथील आरोग्य केंद्राची इमारत दोन वर्षांपासून हस्तांतरनाच्या प्रतिक्षेत आहे. त्या आधीच दुरवस्था झाली आहे. शासनाच्या कोणत्याही योजनेचे वाटप करतांना दुर्गम भागाकडून सुरूवात करावी, अशी मागणी सदस्यांनी केली. याशिवाय अक्कलकुवा तालुक्यातील गावांमध्ये अजूनही लसीकरण झालेले नाही. पावसाळ्यापूर्वी करावे. त्याचबरोबर अनेक दुर्गम गावांमध्ये अजूनही रस्त्यांचा प्रश्न कायम आहे. तेथे आरोग्य, रेशन कसे पोहोचाविणार असाही सवाल उपस्थित करून पावसाळ्यापूर्वीच अशा ठिकाणी धान्य तातडीने पोहचवावे. याशिवाय दुर्गम भागातील आरोग्य उपकेंद्रावर आधी डॉक्टरांची नियुक्ती करावी, असेही सदस्यांनी सूचीत केले. त्याचबरोबर अंगणवाड्यांना पुरविले जाणारे गॅससिलिंडरचा पुरवठा नंदुरबारहून होतो. त्यामुळे तालुकास्तरावर ते लवकर उपलब्ध होत नाही. त्यामुळे तालुक्यातील स्थानिक एजन्सीमार्फत करावी, अशी मागणीही या वेळी करण्यात आली.बैठकीत झालेल्या विविध प्रश्नांवरील उपाययोजना, केलेली कार्यवाही पुढील बैठकीत सादर करावी. केवळ कागदी घोडे नाचवू नये अन्यथा अशा अधिकाºयांवर कारवाईचा बडगा उगारावा अशा संतप्त भावना सदस्यांनी व्यक्त केल्या. आभार सचिव डॉ.महेंद्र चव्हाण यांनी मानले.अक्कलकुवा व धडगाव तालुक्यातील नर्मदा किनारी गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी लागणारे मेडीक्लोअरच्या औषधाचा पुरवठा करण्यात आलेला नाही. त्यामुळे या गावांमधील गावकºयांना आजही दूषित पाणी प्यावे लागत असल्याचे सदस्यांनी सांगितले. तेव्हा संबंधीत गटविकास अधिकाºयांनी हे औषध खरेदी करण्याचे अधिकार ग्रामपंचायतींना दिले आहेत. परंतु ग्रामपंचायती खरेदी करीत नाही. वास्तविक वर्षभर त्याचा पुरवठा होणे अपेक्षित असतांना त्याकडे गांभीर्याने लक्ष घातले जात नाही. त्यामुळे अशा ग्रामपंचायतींना तत्काळ नोटीसा बाविण्याची सूचना प्रकल्पाधिकाºयांनी दिली. याशिवाय तळोदा, धडगाव तालुक्यातील कुयलीडाबर, पालाबार, केलापाणी, चिरमाळ, सावºयादिगर, तोरणमाळ, तºहावद येथील पाण्याचा प्रश्न तीव्र बनत आहे. ते कायम स्वरूपी उपाययोजना करण्याऐवजी थातूर मातूर कार्यवाही केली. जाते. नर्मदा काठांवरील गावांमध्ये पाणी नाही, नदीचे पाणी पितात. असे अनेक प्रश्न सदस्यांनी उपस्थित केले होते.