शहरं
Join us  
Trending Stories
1
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
2
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
3
"रुपाली चाकणकरांनी एका बाईला आमदाराविरोधात व्हिडीओ तयार लावलेला, ती बाई..."; रुपाली ठोंबरेंचा स्फोटक आरोप
4
किंमती वाढल्या, भारतात सोने खरेदी वाढली की कमी झाली? अवाक् करणारी आकडेवारी
5
Babar Azam World Record: धावांसाठी संघर्ष करणाऱ्या बाबर आझमनं मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
6
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
7
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
8
"नाव लक्षात ठेवा!" नेहमी तिखट भाष्य करणाऱ्या इंग्लिश क्रिकेटरचं जेमी संदर्भातील 'ते' ट्विट व्हायरल
9
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
10
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
11
Smartphones: नवा फोन घेण्याचा विचार करताय? थांबा! बाजारात येतायेत एकापेक्षा एक भारी फोन
12
धक्कादायक! विद्यापीठात महिलेवर लैंगित अत्याचार; बंगळुरू विद्यापीठाच्या प्राध्यापकाला अटक
13
"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
14
मेट्रो ठेकेदार जे. कुमार इन्फ्राला ५ लाखाचा दंड; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एमएमआरडीएचा दणका
15
Dularchand Yadav: दुलारचंद यादव यांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला नाही, डॉक्टरांचा मोठा खुलासा!
16
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
17
मोबाईलचे जीपीएस ठरू शकते तुमच्या डिजिटल अरेस्टचे कारण; आयआयटी दिल्लीत महत्त्वाचा रिसर्च
18
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
19
ICC T20 Rankings : टीम इंडियाचं अव्वलस्थान धोक्यात! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर दुहेरी आव्हान
20
"मी त्याला काही वर्षांपूर्वीही भेटले होते...:, रोहित आर्याबद्दल रुचिता जाधवचा खुलासा, ९ मिनिटं...

नंदुरबार जिल्ह्यात कागदावरच कमी होतेय कुपोषण, फेरसर्वेक्षणाच्या आकडेवारीत साडेचार पटीने वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2018 11:11 IST

राज्यात कुपोषणाच्या बाबतीत सर्वात संवेदनशील असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातच प्रशासन कुपोषणाचे प्रमाण कागदावरच कमी होत असल्याचे चित्र उघड झाले आहे.

- रमाकांत पाटीलनंदुरबार : राज्यात कुपोषणाच्या बाबतीत सर्वात संवेदनशील असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातच प्रशासन कुपोषणाचे प्रमाण कागदावरच कमी होत असल्याचे चित्र उघड झाले आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार नव्याने झालेल्या कुपोषित बालकांच्या सर्वेक्षणात अतिकुपोषित बालकांच्या आकडेवारीत साडेचार पटीने वाढ झाली आहे.सातपुड्यातील कुपोषण आणि बालमृत्यूचा प्रश्न राज्यातच नव्हे तर देशात गाजले आहेत. येथील कुपोषित बालकांची संख्या आणि बालमृत्यूचे प्रमाण राज्यात जास्त येत असल्याने गेल्या काही वर्षापासून कुपोषित बालकांची संख्या आणि बालमृत्यू कागदावरच कमी केले जात असल्याचा संशय वेळोवेळी व्यक्त झाला आहे. गेल्या १५ वर्षांपूर्वी राज्यातील सरासरी बालमृत्यूचे प्रमाण त्याकाळी ४८ असताना नंदुरबार जिल्ह्यातील हे प्रमाण केवळ २१ दाखविण्यात आले होते. त्यावेळी संशय व्यक्त झाल्याने शासनाने दखल घेतली आणि नव्याने सर्वेक्षण झाले तेव्हा ते प्रमाण २१ वरून ५३ वर गेले होते. सध्यादेखील चित्र यापेक्षा वेगळे नाही.यावर्षी एप्रिल २०१८ मध्ये जिल्ह्यातील अतिकुपोषित बालकांची संख्या केवळ ८२९ होती. प्रशासनानेच यासंदर्भातील वेळोवेळी दिलेल्या अहवालात आकडेवारीत फारसा बदल दिसून येत नव्हता. मात्र प्रत्यक्षात कुपोषणाचे प्रमाण जिल्ह्यात जास्त असल्याच्या तक्रारी वाढल्याने जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी कुपोषित बालकांचे नव्याने सर्वेक्षण करून वास्तव अहवाल तयार करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार गेल्या दोन महिन्यात जिल्ह्यातील कुपोषित बालकांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. या सर्वेक्षणानुसार जवळपास साडेचार पटीने कुपोषित बालकांची संख्या वाढली आहे.एप्रिल २०१८ मध्ये धडगाव तालुक्यातील अतिसंवेदनशील कुपोषित बालकांची संख्या ४०९ होती. ती आता एक हजार १७५ झाली आहे. अक्कलकुवा तालुक्यातील संख्या १९० होती ती आता ७१६ झाली आहे. तळोदा तालुक्यातील संख्या ८३ होती ती नवीन सर्वेक्षणात ६२७ झाली आहे. शहादा तालुक्यात संख्या केवळ ५९ होती ती आता ७५४ झाली आहे. नवापूर तालुक्यात अतिकुपोषित बालके एप्रिल २०१८ केवळ २१ होती ती आता २८० झाली आहेत तर नंदुरबार तालुक्यात ही संख्या ६७ होती ती आता १३५ झाली आहे. यातही काही केंद्रांचे सर्वेक्षण बाकी आहे. एकूणच एप्रिल २०१८ मध्ये अतिकुपोषित बालके ८२९ होती ती नवीन सर्वेक्षणात तीन हजार ६८७ झाली आहे.यावरूनच कुपोषणाचे प्रमाण महिला व बालकल्याण विभाग केवळ कागदावरच कमी होत असल्याचे चित्र रंगवत असल्याचे उघड झाले आहे. वास्तविक कुपोषित बालकांचे बारकाईने सर्वेक्षण करून वास्तव चित्र समोर आल्यास प्रभावी उपाययोजना करण्यास प्रशासनाला मदत मिळणार आहे. त्यामुळे यासंदर्भात सरकारने गांभीर्याने दखल घेण्याचे आवश्यकता आहे.