शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबार जिल्ह्यात कागदावरच कमी होतेय कुपोषण, फेरसर्वेक्षणाच्या आकडेवारीत साडेचार पटीने वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2018 11:11 IST

राज्यात कुपोषणाच्या बाबतीत सर्वात संवेदनशील असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातच प्रशासन कुपोषणाचे प्रमाण कागदावरच कमी होत असल्याचे चित्र उघड झाले आहे.

- रमाकांत पाटीलनंदुरबार : राज्यात कुपोषणाच्या बाबतीत सर्वात संवेदनशील असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातच प्रशासन कुपोषणाचे प्रमाण कागदावरच कमी होत असल्याचे चित्र उघड झाले आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार नव्याने झालेल्या कुपोषित बालकांच्या सर्वेक्षणात अतिकुपोषित बालकांच्या आकडेवारीत साडेचार पटीने वाढ झाली आहे.सातपुड्यातील कुपोषण आणि बालमृत्यूचा प्रश्न राज्यातच नव्हे तर देशात गाजले आहेत. येथील कुपोषित बालकांची संख्या आणि बालमृत्यूचे प्रमाण राज्यात जास्त येत असल्याने गेल्या काही वर्षापासून कुपोषित बालकांची संख्या आणि बालमृत्यू कागदावरच कमी केले जात असल्याचा संशय वेळोवेळी व्यक्त झाला आहे. गेल्या १५ वर्षांपूर्वी राज्यातील सरासरी बालमृत्यूचे प्रमाण त्याकाळी ४८ असताना नंदुरबार जिल्ह्यातील हे प्रमाण केवळ २१ दाखविण्यात आले होते. त्यावेळी संशय व्यक्त झाल्याने शासनाने दखल घेतली आणि नव्याने सर्वेक्षण झाले तेव्हा ते प्रमाण २१ वरून ५३ वर गेले होते. सध्यादेखील चित्र यापेक्षा वेगळे नाही.यावर्षी एप्रिल २०१८ मध्ये जिल्ह्यातील अतिकुपोषित बालकांची संख्या केवळ ८२९ होती. प्रशासनानेच यासंदर्भातील वेळोवेळी दिलेल्या अहवालात आकडेवारीत फारसा बदल दिसून येत नव्हता. मात्र प्रत्यक्षात कुपोषणाचे प्रमाण जिल्ह्यात जास्त असल्याच्या तक्रारी वाढल्याने जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी कुपोषित बालकांचे नव्याने सर्वेक्षण करून वास्तव अहवाल तयार करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार गेल्या दोन महिन्यात जिल्ह्यातील कुपोषित बालकांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. या सर्वेक्षणानुसार जवळपास साडेचार पटीने कुपोषित बालकांची संख्या वाढली आहे.एप्रिल २०१८ मध्ये धडगाव तालुक्यातील अतिसंवेदनशील कुपोषित बालकांची संख्या ४०९ होती. ती आता एक हजार १७५ झाली आहे. अक्कलकुवा तालुक्यातील संख्या १९० होती ती आता ७१६ झाली आहे. तळोदा तालुक्यातील संख्या ८३ होती ती नवीन सर्वेक्षणात ६२७ झाली आहे. शहादा तालुक्यात संख्या केवळ ५९ होती ती आता ७५४ झाली आहे. नवापूर तालुक्यात अतिकुपोषित बालके एप्रिल २०१८ केवळ २१ होती ती आता २८० झाली आहेत तर नंदुरबार तालुक्यात ही संख्या ६७ होती ती आता १३५ झाली आहे. यातही काही केंद्रांचे सर्वेक्षण बाकी आहे. एकूणच एप्रिल २०१८ मध्ये अतिकुपोषित बालके ८२९ होती ती नवीन सर्वेक्षणात तीन हजार ६८७ झाली आहे.यावरूनच कुपोषणाचे प्रमाण महिला व बालकल्याण विभाग केवळ कागदावरच कमी होत असल्याचे चित्र रंगवत असल्याचे उघड झाले आहे. वास्तविक कुपोषित बालकांचे बारकाईने सर्वेक्षण करून वास्तव चित्र समोर आल्यास प्रभावी उपाययोजना करण्यास प्रशासनाला मदत मिळणार आहे. त्यामुळे यासंदर्भात सरकारने गांभीर्याने दखल घेण्याचे आवश्यकता आहे.