शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

कोट्यवधी रुपये खर्चूनही कुपोषण, बालमृत्यू कमी का नाही? आमदार आमशा पाडवींचा सवाल

By मनोज शेलार | Updated: September 11, 2023 17:12 IST

जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेचा तसेच महिला व बालविकास विभागाचा भोंगळ कारभाराविषयी माहिती देण्यासाठी त्यांनी सोमवारी नंदुरबारात पत्रकार परिषद घेतली.

नंदुरबार : कुपोषण व बालमृत्यू रोखण्यासाठी शासन व प्रशासन अपयशी ठरले आहे. या दोन्ही बाबी कमी करण्यासाठी कोट्यवधींचा निधी खर्चा केला जात असला तरी राज्यात सर्वाधिक कुपोषण व बालमृत्यू नंदुरबारातच का होतात? असा प्रश्न शिवसेनेचे (ठाकरे गट) आमदार आमशा पाडवी यांनी उपस्थित केला. यात होणारे गैरप्रकार, भ्रष्टाचार खणून काढल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेचा तसेच महिला व बालविकास विभागाचा भोंगळ कारभाराविषयी माहिती देण्यासाठी त्यांनी सोमवारी नंदुरबारात पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी सांगितले, सन २०१९ पासून आरोग्यमंत्र्यांना ५६ उपकेंद्रांचे प्रस्ताव पाठविले आहेत. मात्र, याची दखल घेण्यात आलेली नाही. अधिवेशन संपल्यानंतर आरोग्यमंत्र्यांनी नंदुरबार जिल्ह्यात येऊन आरोग्य यंत्रणेचा आढावा घेणार होते. आरोग्य यंत्रणा बळकट करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्यांना जिल्हा दौरा करायला वेळ मिळत नसल्याची स्थिती आहे. राज्यात नंदुरबार जिल्ह्यात सर्वाधिक बालमृत्यू, माता मृत्यू, कुपोषणाचा प्रश्न असतांना सरकार डोळे लावून बसले आहे का? असा सवाल उपस्थित केला.

यावेळी त्यांनी विकासाच्या नुसत्याच घोषणा होत असल्याचे सांगून अंमलबजावणी मात्र कुठेही दिसत नाही. शासन आपल्या दारी योजनेवर एवढा खर्च केला जातो, प्रत्यक्षात तेथे लोकांना रेशनकार्ड, जातीचा दाखला दिला जातो व लोकांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोपदेखील आमदार पाडवी यांनी केला.