शहरं
Join us  
Trending Stories
1
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
2
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
5
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
6
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
7
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
8
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
9
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
10
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
11
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
12
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
13
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
14
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
17
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
18
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे
19
६ महिन्यांत ६ वेळा बंद पडली अभिनेत्रीची नवीन कार! मनवा नाईकने शेअर केला भयानक अनुभव, म्हणाली...
20
आमची कसदार जमीन ‘शक्तीपीठला’ देणार नाही; भाटेगाव परिसरातील शेतकऱ्यांचा विरोध

कोट्यवधी रुपये खर्चूनही कुपोषण, बालमृत्यू कमी का नाही? आमदार आमशा पाडवींचा सवाल

By मनोज शेलार | Updated: September 11, 2023 17:12 IST

जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेचा तसेच महिला व बालविकास विभागाचा भोंगळ कारभाराविषयी माहिती देण्यासाठी त्यांनी सोमवारी नंदुरबारात पत्रकार परिषद घेतली.

नंदुरबार : कुपोषण व बालमृत्यू रोखण्यासाठी शासन व प्रशासन अपयशी ठरले आहे. या दोन्ही बाबी कमी करण्यासाठी कोट्यवधींचा निधी खर्चा केला जात असला तरी राज्यात सर्वाधिक कुपोषण व बालमृत्यू नंदुरबारातच का होतात? असा प्रश्न शिवसेनेचे (ठाकरे गट) आमदार आमशा पाडवी यांनी उपस्थित केला. यात होणारे गैरप्रकार, भ्रष्टाचार खणून काढल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेचा तसेच महिला व बालविकास विभागाचा भोंगळ कारभाराविषयी माहिती देण्यासाठी त्यांनी सोमवारी नंदुरबारात पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी सांगितले, सन २०१९ पासून आरोग्यमंत्र्यांना ५६ उपकेंद्रांचे प्रस्ताव पाठविले आहेत. मात्र, याची दखल घेण्यात आलेली नाही. अधिवेशन संपल्यानंतर आरोग्यमंत्र्यांनी नंदुरबार जिल्ह्यात येऊन आरोग्य यंत्रणेचा आढावा घेणार होते. आरोग्य यंत्रणा बळकट करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्यांना जिल्हा दौरा करायला वेळ मिळत नसल्याची स्थिती आहे. राज्यात नंदुरबार जिल्ह्यात सर्वाधिक बालमृत्यू, माता मृत्यू, कुपोषणाचा प्रश्न असतांना सरकार डोळे लावून बसले आहे का? असा सवाल उपस्थित केला.

यावेळी त्यांनी विकासाच्या नुसत्याच घोषणा होत असल्याचे सांगून अंमलबजावणी मात्र कुठेही दिसत नाही. शासन आपल्या दारी योजनेवर एवढा खर्च केला जातो, प्रत्यक्षात तेथे लोकांना रेशनकार्ड, जातीचा दाखला दिला जातो व लोकांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोपदेखील आमदार पाडवी यांनी केला.