शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
5
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
6
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
7
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
8
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
9
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
10
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
11
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
12
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
13
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
14
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
15
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
16
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
17
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
18
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
19
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
20
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुक्त जिल्ह्याची ओळख कायम ठेवणे सर्वांसाठी आव्हानच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2020 13:02 IST

रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जगभर कोरोना विषाणूजन्य आजाराने थैमान घातले असताना नंदुरबार जिल्ह्यात मात्र या ...

रमाकांत पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जगभर कोरोना विषाणूजन्य आजाराने थैमान घातले असताना नंदुरबार जिल्ह्यात मात्र या विषाणूचा शिरकाव रोखण्यास प्रशासनासह जिल्ह्यातील नागरिकांनाही यश आले आहे. तथापि, अजूनही काही दिवस सर्वांसाठीच परीक्षेचे आहे. या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी सर्वांनाच प्रशासन व आरोग्य यंत्रणेचे नियम पाळणे आवश्यक आहे. नव्हे तर कोरोनामुक्त जिल्ह्याची ओळख कायम ठेवणे सर्वांसाठी आव्हानच ठरणार आहे.नंदुरबार जिल्हा तसा राज्यात आरोग्य सेवेची बोंब असणारा जिल्हा म्हणून परिचित आहे. येथील कुपोषण, सिकलसेल अ‍ॅनिमिया यासह इतर आरोग्याचे प्रश्न सातत्याने चर्चेत राहिले आहेत. या पार्श्वभूमीवर देशात कोरोनाची धोक्याची घंटी वाजताच येथील नागरिक व प्रशासन खऱ्या अर्थाने खळबळून जागे झाले. त्यामुळे त्याचा उपाययोजनांची काळजीही सुरुवातीपासून नागरिकांनी घेतली. कोरोनापासून बचावासाठी सरकारने जे जे आवाहन केले ते गांभीर्याने घेऊन पाळण्याचे जनतेने प्रयत्न केले. खास करून आदिवासी दुर्गम भागात हा संदेश वेगाने पोहोचला. अनेकांनी आदिवासी बोलीभाषेत जनजागृतीचे आवाहन केले. कोणी गीते तयार केली, कोणी संदेश तयार केले, कोणी पथनाट्य केली. त्या माध्यमातून घराघरात कोरोनाची जागृती झाली. बाहेरील अनोळखी व्यक्तीला गावात प्रवेश नकोच या संदेशाचे आदिवासी भागात इतके गांभीर्याने पालन केले गेले की अनेक गावांचे रस्तेच तरुणांनी रस्त्यावर दगड व लाकूड ठेवून बंद केले. काही गावात तर तरुण रस्त्यांच्या सीमेवर पहारा देत बसले. अनेक दिवस गावात अनोळखी व्यक्तीला प्रवेशही होऊ दिला नाही. पूर्णवेळ घरातच थांबण्याचा निर्णय ग्रामीण भागात कठोरतेने पाळला गेला. शहरी भागात मात्र याउलट परिस्थिती असली तरी प्रशासनाने नियम तोडणाऱ्यांना वठणीवर आणण्याचे काटेकोर प्रयत्न केल्याने परिस्थिती नियंत्रणात राहिली.जिल्हा प्रशासनदेखील मात्र डोळ्यात तेल घालून या प्रश्नावर सजग राहिले. सुविधांचा अभाव असतानाही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी गांभीर्याने व तत्परतेने प्रयत्न केले. जिल्हास्तरावर क्वारंटाइन कक्ष तयार केला. याशिवाय तालुक्याच्या ठिकाणीदेखील वसतिगृहांमध्ये सात क्वारंटाइन कक्ष तयार करून जर रुग्ण आढळले तर त्यांच्या आरोग्य सेवेसाठी प्रयत्न करण्यात आले. लॉकडाऊनच्या काळातही जनतेला कमीत कमी गैरसोय व्हावी यासाठी प्रयत्न केले. कधी लाठी दाखवून तर कधी फुल देऊन लोकांना सरकारचे नियम पाळण्याचे आवाहन केले. दुसरीकडे लॉकडाऊनच्या काळात गरीब व अनाथ लोकांना अन्नाची व्यवस्था व्हावी यासाठी अनेक सामाजिक संघटना, दानशूर व्यक्ती पुढे आले आणि मानवतेचे दर्शन घडविले. अजूनही हे कार्य सुरूच असल्याने लॉकडाऊन असले तरी गरीबातीत गरीब जनतेपर्यंतही सुविधा पोहोचविण्यासाठी प्रयत्न होताना दिसून येत आहेत.नंदुरबार जिल्हा हा गुजरात आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर असल्याने या दोन्ही राज्यातून बाधीत व्यक्ती रोखण्याचे प्रशासनापुढे आव्हान होते. याशिवाय जिल्ह्यातील जवळपास २५ हजारपेक्षा अधिक लोक शिक्षण व नोकरीनिमित्ताने पुणे आणि मुंबईत आहेत. महाराष्टÑात सर्वाधिक कोरोनाबाधीत रुग्ण या दोन शहरांमध्येच असल्याने तेदेखील आव्हान होते. त्यामुळे सुरुवातीच्या काळात जे लोक पुणे-मुंबईतून आले त्या सर्वांना प्रशासनाच्या प्रयत्नाने व लोकांनीही स्वत:हून तपासणी करून घेतली व स्वत:च विलगीकरण केले. त्यामुळे त्याचे चांगले परिणाम दिसून आले. विदेशातून आलेल्या लोकांनाही क्वारंटाइन करण्यात आले. त्यांचे नमुनेही तपासणीसाठी पाठविण्यात आले. ते सर्व निगेटीव्ह आले. याच काळात दिल्लीतील मरकज कार्यक्रमातील दोन व्यक्ती शहरात आल्याचे कळताच प्रशासनाने त्यांचाही तात्काळ शोध घेऊन त्यांचीही तपासणी करून घेतली. आतापर्यंत जवळपास ५० जणांचे नमुने तपासण्यात आले आहेत. सर्वांचे अहवाल निगेटीव्ह असल्याने जिल्ह्यात अजून तरी कोरोना विषाणूचा संसर्ग झाला नसल्याचे स्पष्ट आहे.मात्र कोरोनामुक्त जिल्ह्याची ओळख कायम ठेवण्यासाठी अजूनही काही दिवस सर्वांना डोळ्यात तेल घालून काम करावे लागणार आहे. खास करून जिल्ह्याच्या सीमा अधिक गांभीर्याने रोखाव्या लागणार आहेत. काही जण मुंबई-पुण्यातून छुप्या मार्गाने प्रवेश करीत आहेत. त्यांच्यावरही लक्ष केंद्रीत करावे लागणार असून नागरिकांनाही अशी माहिती मिळताच त्यांनी तात्काळ प्रशासनाला कळवून संबंधित व्यक्तीची तपासणी व विलगीकरणात ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. भाजीपाला आणि किराणा खरेदीसाठी, बँकांमध्ये, रेशन दुकानासमोर सोशल डिस्टन्सिंग पाळली जात नाही. त्याकडे प्रशासनानेही व लोकांनी स्वत:हून नियम पाळण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.