शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
2
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
3
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
4
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
5
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
6
अमेरिकेच्या टॅरिफचा फटका! सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी कोसळला, 'या' क्षेत्राला सर्वाधिक धक्का
7
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
8
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
9
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
10
Ganesh Chaturthi 2025:वडीलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मोठ्या मुलानेच गणपती आणायचा? पंचांगकर्ते सोमण सांगतात... 
11
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; सासरच्यांनी पकडल्यावर मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून...,
12
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
13
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
14
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
15
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
16
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
17
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
18
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
19
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
20
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा

शहादा तालुक्यातील धांद्रे खुर्द व उभादगड आदिवासीबहुल गावांमध्ये ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:36 IST

जयनगर : दीड वर्षांपासून कोरोना महामारीमुळे शाळा बंद असल्यामुळे पहिली ते सहावीच्या मुलांचे चांगलेच शैक्षणिक नुकसान होत आहे. सध्या ...

जयनगर : दीड वर्षांपासून कोरोना महामारीमुळे शाळा बंद असल्यामुळे पहिली ते सहावीच्या मुलांचे चांगलेच शैक्षणिक नुकसान होत आहे. सध्या आठवी ते १२ वीचे वर्ग चालू आहेत. मात्र, गेल्या दीड वर्षापासून पहिली ते चौथीचे वर्ग अजून चालू झाले नाही. त्यामुळे आदिवासीबहुल वस्तीतील प्राथमिक शाळेतील मुलांचे मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक नुकसान होत आहे.

शहादा तालुक्याच्या पूर्वेला १७ किलोमीटर अंतरावर असलेल्या जयनगर जवळील धांद्रे खुर्द व उभादगड या आदिवासी बहुल गावांमधील विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षणामुळे खूप मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक नुकसान होत आहे. एकतर या आदिवासी बहुल गावांमध्ये पुरेशा प्रमाणात नेटवर्क नाही. शिवाय येथील विद्यार्थ्यांच्या पालकांकडे अँड्रॉइड मोबाईल नसल्यामुळे ऑनलाईन शिक्षण म्हणजे काय? हे देखील दीड वर्षात अजून पालक व विद्यार्थ्यांना उमगलेले नाही. फक्त महामारी चालू आहे. त्यामुळे शाळा बंद आहेत. एवढेच या विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना समजत आहे. मात्र, ऑनलाईन शिक्षण म्हणजे काय? ते कसे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचते? पीडीएफ म्हणजे काय? झूम ॲप, एम.एस. टीम ॲप म्हणजे काय? या शब्दांविषयी आदिवासी बहुल गावांमधील विद्यार्थी व पालकांना समजत नाहीये.

धांद्रे खुर्द या गावामध्ये पहिली ते सहावीपर्यंत व उभादगड या गावामध्ये पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग असून, दीड वर्षापासून पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी शाळेचे दार अजूनही उघडले गेले नसल्याने या विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात असून, भविष्यात शिक्षणाच्या बाबतीत आपल्या मुलांचे काय होईल? याची चिंता या आदिवासीबहुल गावातील पालकांना सतावत आहे. म्हणून शिक्षण विभागाने या आदिवासीबहुल विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन शिक्षणाच्या काळात फुल नाहीतर, फुलाची पाकळी तरी शिक्षणाच्या बाबतीत करायला हवे, अशी मागणी पालकांकडून करण्यात येत आहे.

उन्हाळ्याचे खेळ पावसाळ्यात

धांद्रे खुर्द व उभादगड येथील मुलांना फक्त खेळ आणि खेळच सध्या तरी माहित आहे. शाळा बंद असल्यामुळे उन्हाळ्यात खेळले जाणारे खेळही ते सध्या पावसाळ्यात खेळत आहेत. यामध्ये मग गोट्या, भोवरा, विटी-दांडू या सारखे खेळ मुले सध्या खेळताना दिसत आहे. अभ्यास, पाटी-पेन्सिल, वही-पेन हे शब्दही दीड वर्षापासून त्यांच्या कानावर पडलेले नाहीत. म्हणून केवळ खेळ खेळण्याबरोबर शाळा बंद असल्यामुळे मुलांचा आयुष्याचा खेळ होताना दिसत आहे.