शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

शहादा तालुक्यातील धांद्रे खुर्द व उभादगड आदिवासीबहुल गावांमध्ये ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:36 IST

जयनगर : दीड वर्षांपासून कोरोना महामारीमुळे शाळा बंद असल्यामुळे पहिली ते सहावीच्या मुलांचे चांगलेच शैक्षणिक नुकसान होत आहे. सध्या ...

जयनगर : दीड वर्षांपासून कोरोना महामारीमुळे शाळा बंद असल्यामुळे पहिली ते सहावीच्या मुलांचे चांगलेच शैक्षणिक नुकसान होत आहे. सध्या आठवी ते १२ वीचे वर्ग चालू आहेत. मात्र, गेल्या दीड वर्षापासून पहिली ते चौथीचे वर्ग अजून चालू झाले नाही. त्यामुळे आदिवासीबहुल वस्तीतील प्राथमिक शाळेतील मुलांचे मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक नुकसान होत आहे.

शहादा तालुक्याच्या पूर्वेला १७ किलोमीटर अंतरावर असलेल्या जयनगर जवळील धांद्रे खुर्द व उभादगड या आदिवासी बहुल गावांमधील विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षणामुळे खूप मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक नुकसान होत आहे. एकतर या आदिवासी बहुल गावांमध्ये पुरेशा प्रमाणात नेटवर्क नाही. शिवाय येथील विद्यार्थ्यांच्या पालकांकडे अँड्रॉइड मोबाईल नसल्यामुळे ऑनलाईन शिक्षण म्हणजे काय? हे देखील दीड वर्षात अजून पालक व विद्यार्थ्यांना उमगलेले नाही. फक्त महामारी चालू आहे. त्यामुळे शाळा बंद आहेत. एवढेच या विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना समजत आहे. मात्र, ऑनलाईन शिक्षण म्हणजे काय? ते कसे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचते? पीडीएफ म्हणजे काय? झूम ॲप, एम.एस. टीम ॲप म्हणजे काय? या शब्दांविषयी आदिवासी बहुल गावांमधील विद्यार्थी व पालकांना समजत नाहीये.

धांद्रे खुर्द या गावामध्ये पहिली ते सहावीपर्यंत व उभादगड या गावामध्ये पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग असून, दीड वर्षापासून पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी शाळेचे दार अजूनही उघडले गेले नसल्याने या विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात असून, भविष्यात शिक्षणाच्या बाबतीत आपल्या मुलांचे काय होईल? याची चिंता या आदिवासीबहुल गावातील पालकांना सतावत आहे. म्हणून शिक्षण विभागाने या आदिवासीबहुल विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन शिक्षणाच्या काळात फुल नाहीतर, फुलाची पाकळी तरी शिक्षणाच्या बाबतीत करायला हवे, अशी मागणी पालकांकडून करण्यात येत आहे.

उन्हाळ्याचे खेळ पावसाळ्यात

धांद्रे खुर्द व उभादगड येथील मुलांना फक्त खेळ आणि खेळच सध्या तरी माहित आहे. शाळा बंद असल्यामुळे उन्हाळ्यात खेळले जाणारे खेळही ते सध्या पावसाळ्यात खेळत आहेत. यामध्ये मग गोट्या, भोवरा, विटी-दांडू या सारखे खेळ मुले सध्या खेळताना दिसत आहे. अभ्यास, पाटी-पेन्सिल, वही-पेन हे शब्दही दीड वर्षापासून त्यांच्या कानावर पडलेले नाहीत. म्हणून केवळ खेळ खेळण्याबरोबर शाळा बंद असल्यामुळे मुलांचा आयुष्याचा खेळ होताना दिसत आहे.