शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

नर्मदा खो:यातील सर्वच धरणे रिकामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 17:54 IST

सरदार सरोवर भरण्याची प्रतिक्षा : साडेआठ मिटर पाण्याची पातळी खाली

रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : महाकाय सरदार सरोवर प्रकल्पाचा जलपूजनानंतर देशभरात लक्षवेधी ठरलेल्या नर्मदा खो:यातील सर्वच्या सर्व आठ प्रकल्प अद्याप रिकामेच आहेत. दरम्यान, याच खो:यातील सर्वात शेवट असलेला सरदार सरोवर प्रकल्प अद्यापही साडेआठ मिटरने खाली असून तो भरण्याकडे सर्वाचे लक्ष लागून आहे.तब्बल 56 वर्षानंतर गेल्या 17 सप्टेंबरला जगातील दुसरा मोठा प्रकल असलेल्या सरदार सरोवर प्रकल्पाचे जलपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. या प्रकल्पामुळे विस्थापीत होणा:या महाराष्ट्रातील काही आणि मध्यप्रदेशातील सुमारे 40 हजार बाधितांचे पुनर्वसन बाकी असतांना त्याचे जलपूजन झाल्याने सर्वाचेच लक्ष नर्मदा खो:याकडे लागले आहे. खास करून सरदार सरोवर प्रकल्प त्याची उंची वाढवावी कि कमी करावी  याबाबत यापूर्वीच वादातीत ठरला आहे. या वादातही प्रकल्पाची उंची 138.68 मिटर्पयत पुर्ण वाढविल्याने सर्वानाच तो भरण्याची प्रतिक्षा आहे. कारण यापूर्वी सरदार सरोवर प्रकल्पावर गेट बसविण्यापूर्वी त्या ठिकाणी 131 मिटर्पयत पाण्याची पातळी वाढली होती. धरण पुर्ण झाल्यानंतर ते भरल्यास त्याच्या पाणलोटात किती भागाला धोका पोहचू शकतो याचे ख:या अर्थाने प्रत्यक्षात चित्र समोर येणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प पुर्ण भरल्यानंतर सर्वाना त्याचे उत्तर मिळणार आहे. पण त्यासाठी अजून महिनाभर तरी प्रतिक्षा करावी लागेल असे चित्र आहे. शिवाय पाऊस न झाल्यास यंदा प्रकल्प भरेल की नाही याबाबत साशंकताच आहे. कारण सद्य स्थितीत नर्मदा खो:यातील सर्व आठ प्रकल्प अजूनतरी भरलेले नाही. या खो:यात सुरुवातीला असलेला बर्गी प्रकल्पाची उंची 422.76 मिटर असून त्यात सद्यस्थितीत 420.05 मिटर पाणीसाठा आहे. तर बुरमनघाट प्रकल्प 322 मिटरपैकी 308.24 मिटर भरला आहे. तवा प्रकल्पाची उंची 355.40 मिटर असून त्यात 350.34 मिटर पाणीसाठा आहे. इतर प्रकल्पांची स्थिती अशी कंसात धरणाची एकुण उंची मिटरमध्ये- होशांगाबाद (293.83) 285.35 मिटर, आयएसपी रिझरव्हायर (162.3) 252.07, ओएसपी रिझरव्हायर (196.60) 190.98, मंडलेश्वर (157.29) 142.30. सर्वच प्रकल्पात दोन ते 15 मिटरने अद्याप खाली आहेत. सरदार सरोवर प्रकल्पाची उंची गेट बसल्यानंतर 138.68 असून त्यात सद्यस्थितीत 130 मिटर पाणीसाठा आहे.