शहरं
Join us  
Trending Stories
1
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
2
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
3
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
4
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
5
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
6
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
7
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
8
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?
9
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
10
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश
11
"बाई आणि बाटली..." शरद पोंक्षेंकडून मुलाला दोन महत्त्वाचे सल्ले, म्हणाले "नाहीतर करिअरची वाट"
12
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
13
भारताचा संघ Asia Cup 2025 मध्ये सहभागी होणार? BCCI ने दिली महत्त्वाची ताजी अपडेट
14
Shrikant Shinde On Rahul Gandhi: 'राहुल गांधींना देशभक्तीपेक्षा राजकारणात रस' श्रीकांत शिंदेंचा टोला
15
"मला आतापर्यंत भेटलेला सर्वात मेहनती भारतीय"; दिव्यांग रिक्षा चालकाला पाहून व्लॉगर भावुक
16
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
17
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
18
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
19
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
20
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी

नंदुरबारसह चार शहरात ‘लॉकडाऊन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 21:34 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने नंदुरबार, शहादा, तळोदा, नवापूर या चार शहरात आठ दिवस लॉकडाऊनची ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने नंदुरबार, शहादा, तळोदा, नवापूर या चार शहरात आठ दिवस लॉकडाऊनची घोषणा प्रशासनाने केली आहे़ २२ रोजी मध्यरात्रीपासून हा लॉकडाऊन सुरू होणार असून ३० जुलैपर्यंत हे लॉकडाऊन राहणार असल्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले आहेत.गुरूवारी मध्यरात्रीपासून सुरू होणाऱ्या या लॉकडाऊनमध्ये दूध आणि वृत्तपत्र विक्रेत्यांना सकाळी ७ ते ९ या दरम्यान व्यवसाय करण्यास मुभा राहणार आहे़ या काळात वैद्यकीय सेवा, औषध विक्रीची दुकाने पूर्वीप्रमाणे पूर्णवेळ सुरू राहतील. सर्व प्रकारची दुकाने, खाजगी आस्थापना बंद राहील. शासकीय कार्यालये या कालावधीत सुरु राहणार आहेत़ चारही शहरात केवळ वैद्यकीय कारणासाठी नागरिकांना बाहेर पडण्यास मुभा राहणार आहे़ मात्र यासाठी रुग्णालयातील सबंधीत कागदपत्र सोबत ठेवावे असे प्रशासनाकडून कळवण्यात आले आहे़जिल्हाधिकारी डॉ़ भारूड यांनी काढलेल्या आदेशानुसार शहरांमधील सरकारी कार्यालये मर्यादित उपस्थितीत सुरू राहतील तथापि अभ्यागतांना कार्यालयास भेट देण्यास परवानगी नसेल. स्वस्त धान्य दुकानदारांनी या काळात धान्य वाटप न झालेल्या लाभार्थींना धान्य वाटप करावे, पेट्रोलपंपावर कोरोना विषयी कामकाज करणाºया ओळखपत्रधारक शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांनाच तसेच शासकीय वाहनांनाच पेट्रोल किंवा डिझेल देण्यात यावे. या व्यतिरिक्त अन्य वाहनांना पेट्रोल किंवा डिझेल देऊ नये असे निर्धारित करण्यात आले आहे़कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी तसेच विषाणूची संपर्क साखळी खंडीत करणे आवश्यक आहे. नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे. कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात येईपर्यंत किंवा पुढील आदेश येईपर्यंत संचारबंदीचे पालन करावे. या काळात अनावश्यकपणे बाहेर फिरणाºयांवर कडक कारवाई करण्यात येणार असून नागरिकांनी आवश्यक वस्तूंची खरेदी आधीच करावी. वस्तू खरेदी करताना गर्दी करू नये व संचारबंदीचे पालन करून प्रशासनास सहकार्य करण्याचे जिल्हाधिकारी डॉ़ राजेंद्र भारूड यांनी कळवले आहे़दरम्यान लॉकडाऊन होणार असल्याची माहिती असल्याने अनेक जणांनी सायंकाळपासून शहरी भागातील पेट्रोल पंपांवर गर्दी केली होती़ बुधवारी दिवसभर व्यवहार सुरू राहणार असल्याने बाजारपेठेत मोठी गर्दी उसळण्याची शक्यता आहे़

या कालावधीत अक्कलकुवा व धडगाव शहरातील सर्व आस्थापना व दुकाने सकाळी ७ ते दुपारी ३ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा राहणार आहे़ ३० जुलैपर्यंत वैद्यकीय कारणाव्यतिरिक्त आंतरजिल्हा प्रवासास पूर्णत: बंदी घालण्यात आली आहे. दुकाने आणि आस्थापनांनी २२ जुलै रोजी अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा आवश्यकतेनुसार करावा असे आदेशही देण्यात आले आहेत़