शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

‘लॉकडाऊन’मुळे विसरवाडी बाजारपेठेत पसरली अवकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2020 12:42 IST

लोकमत न्यूज नेटवर्क विसरवाडी : धुळे -सुरत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा व विसरवाडी-सेंधवा महामार्गावर वसलेले नवापुर तालुक्यातील विसरवाडी गाव ...

लोकमत न्यूज नेटवर्कविसरवाडी : धुळे -सुरत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा व विसरवाडी-सेंधवा महामार्गावर वसलेले नवापुर तालुक्यातील विसरवाडी गाव आहे. लॉकडाऊनमुळे पूर्णपणे प्रभावित झाले असून व्यापारीपेठ गजबजणाऱ्या विसरवाडी गावावर गेल्या पाच दिवसांपासून अवकळा पसली आहे़विसरवाडी हे गाव दोन आंतरराज्यीय महामार्गावर वसलेले तालुक्यातील व जिल्ह्यातील नावलौकिक असलेली मोठ्या बाजारपेठेचे गाव आहे़ गावाची लोकसंख्या सुमारे १२ हजार असून येथील बाजारपेठेत परिसरातील ४० ते ५० खेड्यांचा दैनंदिन संपर्क येतो. बाजारपेठ प्रशस्त व जिल्ह्यात नावलौकिक प्राप्त असल्याने बाहेरगावाहून मोठ्या संख्येने व्यापारी येथे येऊन व्यापार करतात़ मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घोषित करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे विसरवाडी बाजारपेठेसह गावातही शुकशुकाट असून आजवर अशी शांतता येथील नागरिकांनी कधीच अनुभवली नसल्याचे बोलले जात आहे़ कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी आधी महाराष्ट्र आणि नंतर केंद्र सरकारने तातडीची पावले उचलत कारवाई केली होती़ यात जमावबंदी आदेश व नंतर संचारबंदी लागू करण्यात आली़ पाठोपाठ लॉकडाऊनची घोषणा झाली़ यातून पहिल्याच दिवशी गैरसमज निर्माण होऊन रात्रीच किराणा दुकानांवर गर्दी उसळली होती़ यावेळी विसरवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश न्हायदे यांनी गावात भेटी देत नागरिकांना मार्गदर्शन केले़ गर्दी करु नये असे सांगितल्यानंतर दुकाने बंद झाली होती़ यातून मंगळवारपासून सुरळीतपणे जीवनावश्यक वस्तंूचे वितरण सुरु आहे़नवापुर आणि धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्याला लागू असलेल्या विसरवाडी येथे दोन्ही जिल्ह्यातील ग्रामस्थांसोबतच दोन्ही महामार्गांवरुन जाणाºया वाहनांचा राबता असतो़ यातून मग लॉकडाऊननंतर पोलीस, महसूल आणि पंचायत समिती प्रशासनाने याठिकाणी दक्षता घेत उपाययोजनांना प्राधान्य दिले आहे़ सध्या गावात पोलीस अधिकारी व कर्मवारी हे सातत्याने गस्त घालून गावात विनाकारण भटकंती करणाऱ्यांवर कारवाई करत आहेत़ कारवाईदरम्यान पोलीस युवकांना योग्य ती माहिती देत घरीच राहण्याचे सुचवत आहेत़

ग्रामपंचायतीमार्फत दुकानदारांना अत्यावश्यक सेवा देणारे दुकाने कधी व किती वेळ सुरु ठेवली पाहिजेत याबाबत माहिती दिली जात आहे़ यासाठी ग्रामपंचायतीने पत्रके वाटप केली आहेत़ गावात प्रत्येक दुकानाच्या बाहेर ग्राहकांना उभे राहण्यासाठी विशिष्ट अंतरावर चौकट आखून दिली आहे़ औषधी विक्रीचे दुकाने सुरु आहेत़ किराणा भाजीपाला, पिठाची गिरणी सकाळी आठ ते दुपारी १२ पर्यंत सुरु आहेत़ विसरवाडी येथे दर गुरुवारी आठवडे बाजाराची परंपरा आहे़ जिल्ह्यातून व्यापारी मोठ्या संख्येने येथे येत असल्याने ही बाजारपेठ प्रसिद्ध आहे़ आठवडे बाजार बंद असल्याने मोठे नुकसान होत आहे़ दरम्यान गावातील घराघरातही कोरोनाची भिती असल्याने बाहेर निघणे टाळले जात आहे़ बाहेरगावी गेलेल्यांची तपासणी करुनच त्यांना गावात घेतले गेल्याची माहिती असून रुग्णालयात सध्या गर्दी आहे़कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विसरवाडी ग्रामपंचायतीतर्फे नवापूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, सरपंच बकाराम गावित, विस्तार अधिकारी दिलीप कुवर, ग्राम विकास अधिकारी कैलास सोनवणे तसेच कर्मचारी वेळोवेळी विसरवाडी येथे ग्रामस्थांना व दुकानदारांना मार्गदर्शन करीत आहेत तसेच लहान मुलांना वृद्ध व्यक्तींना घरीच ठेवावे सर्वांनी तोंडाला मास्क बांधावा असे सांगितले जात आह़ेगावातील दोन्ही महामार्गावरील त्याप्रमाणे गावातील हॉटेल व्यवसाय गेल्या पाच दिवसापासून बंद अवस्थेत आहेत़ यामुळे हॉटेल कामगारांची स्थिती बिकट झाली आहे़ गावातील सर्व प्रार्थना स्थळांना कुलुप लावण्यात आले आहे.