शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
4
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
5
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
8
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
9
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
10
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
11
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
12
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
13
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
14
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
15
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
16
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
18
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
19
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
20
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू

लॉकडाऊन वाढला शिथिलता मात्र कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 12:35 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : लॉकडाऊन ३१ मे पर्यंत वाढवण्याचे आदेश शासनाने दिले आहेत़ या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात यापूर्वी लागू ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : लॉकडाऊन ३१ मे पर्यंत वाढवण्याचे आदेश शासनाने दिले आहेत़ या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात यापूर्वी लागू करण्यात आलेले सर्व आदेश ‘जैसे थे’ राहतील असे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कळवण्यात आले आहे़ यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे़कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत़ संचारबंदीच्या कालावधीत ३१ मे मध्यरात्रीपर्यंत वाढ करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र भारुड यांनी दिले आहेत़ यातून यापूर्वी काढलेले सर्व आदेश ३१ मे पर्यंत लागू असतील असे त्यांनी म्हटले आहे़ जिल्ह्यातील शहरी भागामध्ये सध्या सकाळी सात ते दुपारी १२ व सायंकाळी चार ते सायंकाळी सात या कालावधीत दुकाने सुरु ठेवण्यात येत आहेत़ यातून नागरिकांना बऱ्यापैकी दिलासा मिळाला असून व्यावसायिकांचे व्यवसाय काही अंशी सुरळीतपणे सुरु झाले आहेत़ लॉकडाऊनचा चौथा टप्पा ३१ मे पर्यंत वाढवण्यात आला असला तरी नंदुरबार शहरासह शहादा, नवापुर, तळोदा, धडगाव व अक्कलकुवा या शहरांमध्ये बाजारपेठा सकाळी आणि सायंकाळी खुलत असल्याने अडचणी कमी झाल्या होत्या़ गेल्या तीन दिवसात कोठेही गर्दी किंवा अनुचित प्रकार घडलेले नसल्याने ३१ मे पर्यंत हे आदेश नियमित करण्यात आले असल्याची माहिती आहे़ग्रामीण भागात यापूर्वी सकाळी सात ते सायंकाळी सात अशी सूट देण्यात आली असल्याने तेथील अर्थचक्राला बºयापैकी गती आल्याचे चित्र आहे़ नियमांमध्ये शिथिलता दिली गेली असली संचारबंदी असलेल्या वेळेत फिरणाऱ्यांवर पोलीसांकडून कारवाई सुरु आहे़सध्या रमजान महिना सुरु आहे़ या पार्श्वभूमीवर कपडे व इतर साहित्य खरेदी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा अशी मुस्लिम बांधवांची अपेक्षा होती़ जिल्ह्यात नियमांमध्ये शिथिलता मिळाल्याने बाजारात त्यांच्याकडून कपडे व इतर चीजवस्तू खरेदीसाठी भेटी दिल्या जात आहेत़ यातून जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये उलाढाल वाढत आहे़