शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

वडिलांच्या गुरूमंत्रानेच आयुष्य प्रकाशमान झाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2020 12:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळे गुरू भेटत गेले आणि आपण घडत गेलो पण जीवनाला खऱ्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळे गुरू भेटत गेले आणि आपण घडत गेलो पण जीवनाला खऱ्या अर्थाने कलाटणी मिळाली ती वडीलांनी दिलेल्या शिक्षणाच्या गुरूमंत्राने. शिक्षणातूनच जीवन आणि समाज घडविता येतो. दीन दु:खी समाजाला प्रकाश देता येतो, असे आपले वडील यशवंत सोमजी पाटील हे नेहमी म्हणत आणि त्याच प्रेरणेने आपले आयुष्य प्रकाशमान केले असे, उद्योगपती रवींद्र पाटील सांगतात.रवींद्र पाटील हे मुळ ब्राह्मणपुरी, ता.शहादा या छोट्याशा गावातील रहिवासी. सद्या मात्र ते पुण्यात सहा उद्योग चालवितात, अनेकांना त्यांनी रोजगार दिला, ग्रामीण भागातील हा तरूण उद्योजक आंतरराष्टÑीय बाजार पेठेतही आपली छाप निर्माण करीत आहे. आपल्या गुरू विषयी ते सांगतात. आपण एका शेतकरी कुटुंबात जन्माला आलो. बालवयापासूनच आपली शैक्षणिक गुणवत्ता लक्षात घेता वडीलांनी आपल्याला उच्च शिक्षणासाठी प्रेरणा दिली. मुंबई सारख्या शहरात आयआयटीमध्ये शिक्षणासाठी पाठविले आणि उच्च शिक्षण घेतल्यानंतर चांगली नोकरी मिळत होती. पण उद्योग क्षेत्रात काम करण्याचा वडीलांनी सल्ला दिला. खूप संघर्ष करावा लागला पण संघर्षानंतरचे फळ चांगलेच असते त्याचा अनुभव आपणही घेतला. या काळात आई आणि पत्नीचेही खूप सहकार्य व मार्गदर्शन मिळाले. खरे तर आयुष्याच्या टप्या टप्प्यात भेटणारे मित्र, मोठ्या लोकांची भेट, सोबत काम करणारे सहकारी यांच्याकडूनही खूप काही शिकायला मिळाले. जे-जे चांगले ते सर्वांकडून घेता आले आणि त्यातूनच आयुष्याचा पुष्पगुच्छ गुंफता आला.बालपणीच आई-वडीलांनी दिलेली खरे बोलण्याची शिकवण आयुष्यात मोलाची ठरली.कितीही संकट आले तरी त्याला शांतपणे सामोरे जाण्याची वडीलांची शिकवण महत्त्वाची ठरली.स्वत:शी व आपल्या कामाशी प्रामाणिक राहण्याचा त्यांनी सल्ला दिला होता.आयुष्यात घेणाºयापेक्षा देणारे व्हावे. दुसºयाला नेहमी मदत करावी ही शिकवण मिळाली होती.शब्द तोलून बोलावे ही शिकवण आज उपयोगी ठरत आहे.आपला जन्म एका शेतकरी कुटुंबात झाला. आई-वडील शिकलेले नसले तरी त्यांनी आपल्याला उच्च शिक्षणासाठी आग्रह धरला. त्यासाठी सातत्याने प्रेरणा आणि प्रोत्साहन दिले. विशेषत: वडीलांनी बालपणीच जे संस्कार व शिकवण दिली ती मनात कायम स्वरूपी कोरली गेली. त्या वेळी त्यांनी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टी आयुष्यात जणू गुरूमंत्र बनले आणि त्यातूनच आयुष्य फुलत गेले आणि जीवन खºया अर्थाने प्रकाशमान झाले.