शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
5
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
6
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
7
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
8
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
9
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
10
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
11
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
12
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
13
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
14
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
15
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
16
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
17
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
18
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
19
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
20
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?

ग्रामीण भागात जनजीवन विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2018 13:06 IST

थंडीचा परिणाम : सातपुडा परिसरात गोठवणारी थंडी, शेकोटीचा आधार

सोमावल : तळोदा तालुक्यातील सातपुडा परिसरात आलेल्या थंडीच्या लाटेमुळे जनजीवन विस्कळीत झाले आह़े गुरुवारी सायंकाळपासून किमान तापमानाचा पारा घसरण्यास सुरुवात झाली होती़ किमान तापमानात दिवसेंदिवस घट होत असल्याने ग्रामीण भागात  उब मिळवण्यासाठी ग्रामस्थ शेकोटय़ांचा आधार घेत आहेत़दरम्यान परिसरात गेल्या काही दिवसांपासून किमान तापमानात चढ-उतार होत आहे. कधी ढगाळ वातावरण तर कधी सुसाटय़ाने वाहणा:या शीतलहरींमुळे थंडीची तीव्रता कमी-अधिक होत आहे. गेल्या तीन दिवसांपासून येथील        परिसरातील नागरिक वाढत्या थंडीने गारठले आहे. उत्तरेकडून वाहत असलेल्या थंड वा:यांमुळे मागील तीन दिवसात सातपुडा परिसरात थंडीत वाढ झालेली दिसून येत आह़े याचा परिणाम म्हणून ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत होताना दिसून येत आह़े दुर्गम भागात शरीर गोठवणारी थंडी निर्माण झालेली आह़े त्यामुळे साहजिकच सकाळ व रात्री ग्रामीण भागात शुकशुकाट दिसून येत आह़े थंडीपासून बचाव करण्यासाठी ग्रामस्थ शेकोटी पेटवून त्यापासून उब मिळवत आह़े गेल्या पंधरवाडय़ापासून थंडीची लाट कायम आह़े त्यामुळे साहजिकच रब्बी पिकांना फायदा होणार असला तरी या कडाक्याच्या थंडीमुळे परिसरातील शेतक:यांना पिकांना पाणी देण्यासाठी रात्री शेतात जावे लागत असल्याने चिंता वाढल्या आहेत. त्यामुळे वीज वितरण कंपनीने शेतशिवारासाठी दिवसा वीजपुरवठा करण्याची मागणी होत आहे. कडाक्याच्या थंडीमुळे वृद्धांची प्रकृतीदेखील खालावत असल्याचे दिसून येत आह़े दरम्यान, थंडीत वाढ होत असल्याने साथरोगांची भितीदेखील वाढली आह़े त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच ग्रामीण रुग्णालयात  रुग्णांची मोठय़ा संख्येने गर्दी होताना दिसून येत आह़े ग्रामीण भागात ठिकठिकाणी शेकोटय़ा पेटवून थंडीपासून बचाव करण्यात येत आह़े वाढत्या थंडीमुळे विद्याथ्र्याना शाळेत जाण्यास मोठय़ा प्रमाणात अडचणी येत आहेत़ अनेक विद्याथ्र्याच्या शाळा सकाळच्या सत्रात भरत आह़े त्यामुळे भर थंडीत विद्याथ्र्यांना सकाळी शाळेत जाणे जिकीरीचे ठरत आह़े ग्रामीण भागात सायंकाळी लवकर शुकशुकाट होत असतो़ त्यामुळे दुपारच्या सत्रात भरणा:या शाळादेखील लवकर सोडण्यात याव्या अशी मागणी आह़े बहुतेक ठिकाणी विद्याथ्र्याना शाळा तसेच महाविद्यालयात जाण्यासाठी गावापासून दूर अपडाऊन करावे लागत असत़े त्यामुळे त्यांना घरी येत रात्री उशिर होत असल्याने शाळा, महाविद्यालयांनी आपआपल्या वेळेत बदल करावा अशी मागणी जोर धरु लागली आह़े