शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

परवानाधारक रिक्षा चालकांना महिनाभरापासून लागली मदतीची आस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:31 IST

नंदुरबार : परवानाधारक रिक्षा चालकांना राज्य सरकारने दीड हजार रुपये मदत देण्याचे जाहीर केले असले तरी जिल्ह्यात त्याबाबत काहीही ...

नंदुरबार : परवानाधारक रिक्षा चालकांना राज्य सरकारने दीड हजार रुपये मदत देण्याचे जाहीर केले असले तरी जिल्ह्यात त्याबाबत काहीही हालचाल नाहीत. जिल्ह्यात अवघे ३५० परवानाधारक रिक्षाचालक आहेत. उर्वरित साडेतीन हजार रिक्षा चालकांकडे परवाना नाहीत. त्यामुळे त्यांना या मदतीपासून वंचित राहावे लागणार आहे.

संचारबंदी काळात रिक्षा वाहतूक बंद आहे. त्यामुळे रिक्षा चालकांना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. गेल्या वर्षी देखील दोन महिन्याचे लाॅकडाऊन व त्यानंतरही वेळोवेळी लावण्यात आलेले निर्बंध यामुळे रिक्षा चालकांचे हाल झाले. हातावर पोट असणाऱ्या काही कुटुंबांना तर मोठ्या संकटाला सामोरे जावे लागले. निर्बंध शिथिल झाल्यावर देखील रिक्षामध्ये दोन पेक्षा अधिक प्रवासी बसत नव्हते. त्यामुळे व्यवसायावर पूर्णत: परिणाम झाला.

अनेक रिक्षा चालक हे शालेय विद्यार्थी वाहतूक करतात त्यांना तर इतर व्यवसाय शोधावा लागला. कारण वर्षभर शाळा बंद होत्या. मध्यंतरी शाळा सुरू झाल्या, तरीही विद्यार्थी वाहतुकीला परवानगी देण्यात आलेली नव्हती. त्यामुळे शाळा सुरू होऊन देखील काहीही उपयोग झाला नव्हता.

अनेक रिक्षा चालकांनी कर्ज काढून रिक्षा घेतल्या होत्या. परंतु वर्षभरापासून व्यवसायच होत नसल्याने बॅंकाचे हप्ते थकले. कर्ज वाढले. त्यामुळे अनेक रिक्षाचालकांनी थेट रिक्षा विकून दुसरा व्यवसाय निवडला. कुणी भाजी विक्री सुरू केली, कुणी दुसरीकडे कामाला लागले तरी कुणी इतर व्यवसाय शोधला.

यंदाच्या कोरोना संचारबंदीत राज्य शासनाने परवानाधारक रिक्षा चालकांना दीड हजार रुपये मदत देण्याचे जाहीर केले. थेट रिक्षा चालकांच्या बॅंक खात्यावर ही रक्कम जमा होणार आहे. परंतु या घोषणेला आता महिना होण्यात आला, तरीही काहीही हालचाल झालेली दिसत नाही. त्यामुळे रिक्षा चालक या मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.

जिल्ह्यात एकूण चार हजारापेक्षा अधिक रिक्षाचालक आहेत. त्यातील केवळ साडेतीनशे जणांकडेच परवाना असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे जवळपास साडेतीन हजार रिक्षा चालकांना या मदतीचा काहीही उपयोग होणार नाही. त्यामुळे सरसकट सर्वच रिक्षा चालकांना मदतीची हात राज्य शासनाने द्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. शिवाय मिळणाऱ्या मदतीची रक्कम देखील वाढवून मिळावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

राज्य शासनाने रिक्षा चालकांना मदत जाहीर केली तरी त्याबाबत अद्याप काहीही हालचाली नाहीत. केवळ परवानाधारक रिक्षा ऐवजी सरसकट सर्व रिक्षा चालकांना या मदतीचा लाभ झाला पाहिजे.

-किरण गवळी, अध्यक्ष, नेताजी रिक्षाचालक संघटना, नंदुरबार.