शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

परवानाधारक रिक्षा चालकांना महिनाभरापासून लागली मदतीची आस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:31 IST

नंदुरबार : परवानाधारक रिक्षा चालकांना राज्य सरकारने दीड हजार रुपये मदत देण्याचे जाहीर केले असले तरी जिल्ह्यात त्याबाबत काहीही ...

नंदुरबार : परवानाधारक रिक्षा चालकांना राज्य सरकारने दीड हजार रुपये मदत देण्याचे जाहीर केले असले तरी जिल्ह्यात त्याबाबत काहीही हालचाल नाहीत. जिल्ह्यात अवघे ३५० परवानाधारक रिक्षाचालक आहेत. उर्वरित साडेतीन हजार रिक्षा चालकांकडे परवाना नाहीत. त्यामुळे त्यांना या मदतीपासून वंचित राहावे लागणार आहे.

संचारबंदी काळात रिक्षा वाहतूक बंद आहे. त्यामुळे रिक्षा चालकांना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. गेल्या वर्षी देखील दोन महिन्याचे लाॅकडाऊन व त्यानंतरही वेळोवेळी लावण्यात आलेले निर्बंध यामुळे रिक्षा चालकांचे हाल झाले. हातावर पोट असणाऱ्या काही कुटुंबांना तर मोठ्या संकटाला सामोरे जावे लागले. निर्बंध शिथिल झाल्यावर देखील रिक्षामध्ये दोन पेक्षा अधिक प्रवासी बसत नव्हते. त्यामुळे व्यवसायावर पूर्णत: परिणाम झाला.

अनेक रिक्षा चालक हे शालेय विद्यार्थी वाहतूक करतात त्यांना तर इतर व्यवसाय शोधावा लागला. कारण वर्षभर शाळा बंद होत्या. मध्यंतरी शाळा सुरू झाल्या, तरीही विद्यार्थी वाहतुकीला परवानगी देण्यात आलेली नव्हती. त्यामुळे शाळा सुरू होऊन देखील काहीही उपयोग झाला नव्हता.

अनेक रिक्षा चालकांनी कर्ज काढून रिक्षा घेतल्या होत्या. परंतु वर्षभरापासून व्यवसायच होत नसल्याने बॅंकाचे हप्ते थकले. कर्ज वाढले. त्यामुळे अनेक रिक्षाचालकांनी थेट रिक्षा विकून दुसरा व्यवसाय निवडला. कुणी भाजी विक्री सुरू केली, कुणी दुसरीकडे कामाला लागले तरी कुणी इतर व्यवसाय शोधला.

यंदाच्या कोरोना संचारबंदीत राज्य शासनाने परवानाधारक रिक्षा चालकांना दीड हजार रुपये मदत देण्याचे जाहीर केले. थेट रिक्षा चालकांच्या बॅंक खात्यावर ही रक्कम जमा होणार आहे. परंतु या घोषणेला आता महिना होण्यात आला, तरीही काहीही हालचाल झालेली दिसत नाही. त्यामुळे रिक्षा चालक या मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.

जिल्ह्यात एकूण चार हजारापेक्षा अधिक रिक्षाचालक आहेत. त्यातील केवळ साडेतीनशे जणांकडेच परवाना असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे जवळपास साडेतीन हजार रिक्षा चालकांना या मदतीचा काहीही उपयोग होणार नाही. त्यामुळे सरसकट सर्वच रिक्षा चालकांना मदतीची हात राज्य शासनाने द्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. शिवाय मिळणाऱ्या मदतीची रक्कम देखील वाढवून मिळावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

राज्य शासनाने रिक्षा चालकांना मदत जाहीर केली तरी त्याबाबत अद्याप काहीही हालचाली नाहीत. केवळ परवानाधारक रिक्षा ऐवजी सरसकट सर्व रिक्षा चालकांना या मदतीचा लाभ झाला पाहिजे.

-किरण गवळी, अध्यक्ष, नेताजी रिक्षाचालक संघटना, नंदुरबार.