शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

बोनमॅरोसाठी तळोदा येथील चिमुरडीची मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे ‘साद’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 12:50 IST

जिल्ह्यात 37 रूग्ण

ठळक मुद्देथॅलेसिमियाग्रस्त रूग्णांना सुविधांची अपेक्षाबोनमॅरोसाठी दात्याचा सुरू आहे शोध 

ऑनलाईन लोकमत

नंदुरबार, दि. 10- कुपोषण आणि सिकलसेल यामुळे बेजार असलेल्या जिल्ह्यात गेल्या काही वर्षात थॅलेसिमिया आजार बळावतो आह़े दीर्घ काळ होणारे उपचार आणि त्यातून मिळणारे तुटपुंजे यश असा खेळ असलेल्या या आजाराचे जिल्ह्यात 37 रूग्ण असून या दुर्धर आजाराने पिडीत  सात वर्षीय चिमुरडीने जिल्ह्यात आलेल्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून थॅलेसिमिया कडे लक्ष घालण्याची याचना केली आह़े    तळोदा येथील दीक्षा गणेश गुरव असे या सात वर्षीय बालिकेचे नाव असून तिने थॅलेसिमियाचे वास्तव यातून मांडले आह़े थॅलेसेमिया व सिकलसेल हे अनुवांशिक असे असाध्य आजार असून जिल्ह्यात 37 थॅलेसेमियाग्रस्त रुग्ण असून दिक्षाही त्यांच्यापैकीच एक आह़े या रुग्णांचे हिमोग्लोबिन कमी कमी होते म्हणून त्यांना दर महिन्यास वयाप्रमाणे 1 किंवा 2 रक्ताच्या पिशव्या द्याव्या लागतात. तसेच त्यांची दर चार ते सहा महिन्यांनी शारीरिक तपासणी करावी लागते. या आजाराचे व्यवस्थापन करण्यासाठी अनेक औषधे घ्यावी लागतात. हे सर्व करताना रुग्णांच्या पालकांची आर्थिक, शारीरिक व मानसिक ओढाताण होऊन असंख्य समस्यांना तोंड द्यावे लागते. रूग्णाला रक्त देण्यासाठी बालरोगतज्ञाकडे एका दिवसाकरीता दाखल करावे लागते. त्यासाठी  500 रूपयांर्पयत फी द्यावी लागते. बहुतांशी पालक गरीब असल्याने त्यांना डॉक्टरांची फी देता येत नाही. यासाठी धुळे येथे थॅलिसिमिया डे केअर सेंटर  सुरू व्हावे,  रुग्णांना रक्त दिल्यानंतर त्यांच्या शरीरात लोहाचे प्रमाण कमी करण्यासाठी लागणा:या डेसीरॉक्स ही औषधी नंदुरबार येथे उपलब्ध करण्यात याव्यात,  रुग्णांना रक्त देतांना अनेक अनावश्यक रक्त घटक शरीरात जाऊन होणारी गुंतागुंत टाळण्यासाठी लागणारे ल्यूकोसिट फिल्टर शासनाने मोफत उपलब्ध करून द्यावे, थॅलेसेमियाग्रस्त रुग्णांना मोफत प्रवासाची सवलत द्यावी, थॅलेसेमियाग्रस्त व सिकलसेलग्रस्त रुग्णांना धुळे येथील नवजीवन रक्तपेढी रक्ताचा पुरवठा करीत आहे. या रक्तपेढीमध्ये रक्ताच्या नॅट चाचणीची मोफत उपलब्धता करून देण्याची आवश्यकता असल्याचे दीक्षा हिने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या पत्रात म्हटले आह़े बोनमॅरोसाठी दात्याचा सुरू आहे शोध थॅलेसेमियाग्रस्त दिक्षाला प्रत्येक महिन्याचे 20 किंवा 25 दिवस पूर्ण झाल्यानंतर रक्त लागत असते. तिला तिचे पुढचे आयुष्य सुरळीत जगण्यासाठी अस्थिमज्जा प्रत्यारोपन अर्थात बोनमॅरो  ट्रान्सप्लांट या शस्त्रक्रियेची आह़े अत्यंत गुंतागुत आणि महागडय़ा अशा या शस्त्रक्रियेसाठी थॅलेसिमियाग्रस्त व्यक्तीचा अस्थिमज्जा तिचा सख्खा भाऊ किंवा बहिणीशी जुळण्याची गरज असत़े मात्र दीक्षाच्या कुटूंबातील कोणत्याही व्यक्तीसोबत तिच्या पेशी जुळल्या नाहीत. त्यामुळे दिक्षा हिला अस्थिमज्जा प्रत्यारोपण अर्थात बोनमॅरो ट्रान्सप्लांट सजर्री करण्याची अत्यंत आवश्यकता आह़े मात्र बोनमॅरो दाता मिळत नसल्याने तिची परवड सुरू आह़े शासनाने तिला दाता उपलब्ध करून द्यावी अशी तिची मागणी असून यासाठी शासनदरबारी तिचे कुटूंबिय खेटे घालत आहेत़ तिला योग्य तो बोनमॅरो दाता मिळाल्यास जीवनदान मिळू शकते.