शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
5
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
6
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
7
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
8
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
9
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
10
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
11
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
12
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
13
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
14
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
15
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
16
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
17
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
18
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
19
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
20
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
Daily Top 2Weekly Top 5

...बोगस डॉक्टरांना तरी काम करू द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2020 12:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : आरोग्य केंद्रांमध्ये डॉक्टर व कर्मचाऱ्यांचा अभाव पहाता रुग्णांना वाचविण्यासाठी बोगस डॉक्टरच ऐनवेळी दुर्गम भागात ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : आरोग्य केंद्रांमध्ये डॉक्टर व कर्मचाऱ्यांचा अभाव पहाता रुग्णांना वाचविण्यासाठी बोगस डॉक्टरच ऐनवेळी दुर्गम भागात धावून येतात. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करतांना त्या बाजूचाही विचार केला पाहिजे. किंबहुना आधी पुरेसे अधिकारी, कर्मचारी नेमा व नंतरच अशा डॉक्टरांवर कारवाई करा अशी मागणी जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सभेत सदस्यांनी केली. बैठकीत इतरही विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.स्थायी समितीची सभा अध्यक्षा सिमा वळवी यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी झाली. बैठकीस उपाध्यक्ष राम रघुवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, सभापती रतन पाडवी, अभिजीत पाटील, निर्मला राऊत यांच्यासह सदस्य उपस्थित होते. आरोग्याच्या प्रश्नावर बैठकीत चर्चा झाली. सदस्य भरत गावीत यांनी बोगस डॉक्टरांवर कारवाईचा मुद्दा उपस्थित केला. आधीच आरोग्य केंद्रांमध्ये पुरेशा सुविधा नाहीत, पुरेसा अधिकारी, कर्मचारीवर्ग नाही त्यामुळे स्थानिक डॉक्टरच रुग्णांचा जीव वाचवत आहेत. त्यामुळे अशा डॉक्टरांवर कारवाई करतांना या बाजूचाही विचार केला गेला पाहिजे. ग्रामिण व दुर्गम भागात बोगस डॉक्टर राहणार नाहीत तर अनेकांना आपला जीव गमवावा लागेल असेही गावीत यांनी स्पष्ट केले. त्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी सांगितले, आदिवासी जिल्हा म्हणून विशेष बाब लक्षात घेता स्थानिक ठिकाणीच भरतीसाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी सर्व घटकांचे सहकार्य अपेक्षीत आहे. शिवाय सर्व आरोग्य केंद्रांचा अहवाल घेवून वाहने मिळण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे सांगितले. देवमन पवार यांनी आरोग्य केंद्र कुणाच्या भरवशावर चालतात हा संशोधनाचा विषय असल्याचे सांगितले. जिल्हा परिषदेत सदस्यांच्या कामांसाठी देखील संबधित अधिकारी व कर्मचाºयाला पैसे द्यावे लागतात, तरच काम होते. सदस्यांची ही गत तर सर्वसामान्यांचे काय? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.शिक्षणाच्या विषयावर विजय पराडके यांनी जुने धडगाव शाळेची इमारत पडकी असल्याचे सांगितले. ३६ वस्ती शाळा शिक्षकांना सेवेत सामाूवन घेण्याचाही मुद्दा उपस्थित केला. शासनाकडे प्रस्ताव पाठविला असून संबधीत शिक्षकांची शासन पात्रतेत बसत नसल्याने शासनाकडून निर्णय होत नसल्याचे सीईओ यांनी सांगितले.मधुकर नाईक यांनी तारापूर येथील शाळेत एकही शिक्षक नसल्याचे निदर्शनास आणून दिले.अर्चना गावीत यांनी प्रशासन काळात एमपीआर अंतर्गत किती कामे झाली. एकाच ठेकेदाराला एवढी कामे कशी दिली गेली. कामे केली नाहीत तरीही पैसे काढले गेले , तशा ग्रामस्थांच्या तक्रारी असल्याचे गावीत यांनी सांगितले. सीईओ यांनी अशा ठिकाणची यादी द्या, मी स्वत: त्या ठिकाणी भेटी देवून चौकशी करणार असल्याचे सांगितले.दुर्गम भागात हातपंपांना पाणी आहे, परंतु ते सुरू नसल्यामुळे त्यांचा उपयोग नाही. गावठाण फिडरवरून वीज पुरवठा करावा अशी मागणी देखील करण्यात आली. अध्यक्षा सिमा वळवी यांनी कंत्राटी बेसवर टेंडर काढून वाहने व कर्मचारी घेवू व अशा कुपनलिका सुरू करू असे सांगितले.बैठकीत इतरही विविध विषयांवर चर्चा झाली.नवनियुक्त पदाधिकारी व सदस्यांची ही पहिलीच स्थायी समितीची सभा होती. पहिली बैठक असली तरी अध्यक्षा व उपाध्यक्षांनी सदस्यांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली. बºयाच वेळा मुख्य कार्यकारी अधिकारी गौडा यांनी सदस्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. आरोग्य, शिक्षण आणि बांधकामाच्या विषयांवर सर्वाधिक प्रश्न उपस्थित झाले. यापुढील बैठकांमध्ये आणखी चांगली आणि अभ्यासात्मक चर्चा होण्याची शक्यता आहे. आता सर्वसाधारण सभेकडे लक्ष लागून आहे.