शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
3
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
4
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
5
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
6
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
7
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
8
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
9
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
10
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
11
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
12
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
13
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
14
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
15
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
16
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
17
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
18
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
19
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
20
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
Daily Top 2Weekly Top 5

उशिरा होणाऱ्या परीक्षांमुळे शैक्षणिक कॅलेंडर कोलमडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:31 IST

यंदा मार्च महिन्यापर्यंत चाललेल्या अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेलाही पुढील वर्षी असाच फटका बसण्याची भीती विद्यार्थ्यांकडून व्यक्त होत आहे, याचा थेट ...

यंदा मार्च महिन्यापर्यंत चाललेल्या अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेलाही पुढील वर्षी असाच फटका बसण्याची भीती विद्यार्थ्यांकडून व्यक्त होत आहे, याचा थेट परिणाम त्यांच्या चालू शैक्षणिक वर्षातील अभ्यासावर होण्याची भीती पालकांना आहे. शैक्षणिक वर्ष उशिराने सुरू होताना अभ्यासक्रम कसा वेळेत पूर्ण करणार, असा प्रश्न शिक्षक,प्राध्यापक ही करीत होते. कोरोनामुळे विद्यार्थी आरोग्याला प्राधान्य देत राज्य शिक्षण मंडळाच्या दहावी व बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा पुढे ढकलून त्या मे, जूनमध्ये घेण्यात येणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे साहजिकच यांचा निकाल प्रचलित पद्धतीनुसार ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये अपेक्षित आहे. नेहमीच्या पदवी प्रवेशाच्या शैक्षणिक वेळापत्रकाचा अंदाज घेतल्यास तोपर्यंत निम्म्याहून अधिक प्रवेश प्रक्रिया पूर्ण झालेली असते ; मात्र यंदा ती सुरूच सप्टेंबरमध्ये होईल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

राज्य सीईटी परीक्षाचे वेळापत्रक राज्य मंडळाच्या वेळापत्रकाप्रमाणे बदलण्यात जरी आले तरी जेईई, नीट सारख्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियांचे काय? असा प्रश्न पालक व विद्यार्थी उपस्थित करीत आहेत.

दहावी, बारावीच्या लेट परीक्षांचा फटका केवळ पदवी परीक्षांना नाही तर दहावी नंतरच्या आयटीआय, पॉलिटेक्निक अशा अभ्यासक्रमांना ही बसणार आहे. त्यामुळे एक तर शासनाने देशभरातील प्रवेश प्रक्रियासाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एकच धोरण राबविण्याचा निर्णय घ्यावा, अन्यथा शैक्षणिक राज्य मंडळाच्या परीक्षांना विलंब झाला तरी त्याचे प्रवेशाचे शैक्षणिक कॅलेंडर बिघडणार नाही, याची काळजी घ्यावी, असे मत तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.

कृती आराखडा तयार करणे आवश्यक

शिक्षण विभाग, उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि शिक्षणतज्ज्ञ यांनी या सर्व घोळावर एकत्रित तोडगा काढणे आवश्यक असल्याचे मत पालक व्यक्त करीत आहेत. दहावी, बारावी परीक्षा पुढील नियोजनानुसार वेळेवर झाल्याच तर ऑनलाईन मूल्यांकन, निकालाचा कालावधी, प्रवेश प्रक्रियेचा कालावधी यात कपात करून शैक्षणिक वर्ष सुरळीत करता येते का? यावर अभ्यास करणे आणि आतापासून कृती आराखडा तयार करणे आवश्यक असल्याचे मत पालक व तज्ज्ञांनी मांडले.