शहरं
Join us  
Trending Stories
1
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
2
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
3
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
4
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
5
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
6
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
7
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
8
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
9
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
10
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
11
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
12
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
13
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
14
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
15
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
16
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
17
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
18
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
19
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
20
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
Daily Top 2Weekly Top 5

गेल्या वर्षभरात जिल्ह्यात २०१ जणांनी संपविला जीवनाचा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:21 IST

नंदुरबार : जिल्ह्यात १ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२१ या काळात तब्बल २०१ जणांनी आत्महत्या करत जीवनाचा प्रवास ...

नंदुरबार : जिल्ह्यात १ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२१ या काळात तब्बल २०१ जणांनी आत्महत्या करत जीवनाचा प्रवास संपवला आहे. बेरोजगारी, व्यसनाधिनता, काैटुंबिक वाद, लाॅकडाऊनमुळे निर्माण झालेल्या आर्थिक अडचणी यातून या आत्महत्या झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

नंदुरबार जिल्ह्यात एप्रिल २०२० मध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण समोर आला होता. नंतरच्या काळात सुरू झालेले लाॅकडाऊन हे बेरोजगारीचे कारण ठरले. दरम्यान, सातत्याने कोरोना रुग्णांची वाढती संख्या उद्योगधंदे बंद ठेवण्यास परिणामकारक अशीच ठरली होती. यातून मार्ग काढून काहींनी नव्याने सुरुवात केली असली तरी, निवडक जणांनी आत्महत्येचा मार्ग पत्करला. जिल्ह्यात दर महिन्याला आत्महत्येच्या घटना घडल्या आहेत. मध्यमवयीन वयोगटातील आत्महत्येचे प्रमाण अधिक आहे. हाताचे काम गेल्याने बेरोजगार होऊन नैराश्यातील व्यसनाधिनतेने अनेकांचा बळी घेतला आहे. लाॅकडाऊन काळात घरीच राहून एकाकी पडल्याने काहींनी आत्महत्येचा पर्याय स्वीकारला असल्याचेही समोर आले आहे.

कुटुंबाने काळजी घेण्याची गरज

कोरोनामुळे मानसिक आजारांमध्ये वाढ झाली आहे. सौम्य ते अगदी मनोरुग्ण होण्यापर्यंतच्या प्रकारांमध्ये वाढ झाल्याचे आढळले आहे. नोकरी नाही, पैसे नाहीत, कर्ज होणे यातून स्वभावात बदल होतात. झोप उडते, चिंता, भीती वाटणे अशी लक्षणे आढळल्यास कुटुंबीयांनीही आधी संबंधिताला धीर देणे आवश्यक आहे.

ध्येयप्राप्तीतील अपयश येणे, असाहाय्यतेची भावना, डिप्रेशन, आर्थिक समस्या, ताण-तणाव हे आत्महत्येसारख्या निर्णयाकडे व्यक्तीला घेऊन जातात. अशा प्रकारचे विचार येत असतील, तर घरातील व्यक्तींनी हे जाणून घेतले पाहिजे. त्यांच्यासोबत संवाद साधला पाहिजे, त्यांना समजून घेणे गरजेचे आहे.

- डॉ. राजेश मेश्राम, मानसोपचार तज्ज्ञ

अशा झाल्या नोंदी...

आरोग्य विभागाकडून प्राप्त नोंदीनुसार जिल्ह्यात एप्रिल २०२० मध्ये १०, मेमध्ये २०, जून १८, जुलै २२, ऑगस्ट १०, सप्टेंबर १८, ऑक्टोबर १७, नोव्हेंबर २०, डिसेंबर १५, जानेवारी २०२१ मध्ये २०, फेब्रुवारीत १७, तर मार्च महिन्यात १४ अशा २०१ जणांनी गेल्या वर्षात आयुष्य संपविल्याची माहिती देण्यात आली आहे.

हे दिवसही जातील

प्रत्येकाच्या आयुष्यात अडचणींचा काळ येत असतो. नंतर आनंदाचे क्षणही येत असतात. हा विचार प्रत्येकाने करणे गरजेचे आहे. कोरोना काळात पती-पत्नीमधील भांडणे वाढली. लॉकडाऊनमुळे प्रत्येकाचा स्पेस कमी झाला. परंतु, प्रत्येकाने एकमेकांच्या गरजांचा, भावनांचा आणि मनाचाही आदर केला पाहिजे.