शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
2
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
3
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
4
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
5
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
6
कोकणात आणखी सहा ग्रोथ सेंटर्स; १०६ गावांत विकास केंद्रे, पर्यटन, कृषी व्यवसायाला चालना   
7
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
8
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
9
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
10
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
13
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
14
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
15
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
16
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
17
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
18
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
19
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
20
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)

गेल्या वर्षभरात जिल्ह्यात २०१ जणांनी संपविला जीवनाचा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:21 IST

नंदुरबार : जिल्ह्यात १ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२१ या काळात तब्बल २०१ जणांनी आत्महत्या करत जीवनाचा प्रवास ...

नंदुरबार : जिल्ह्यात १ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२१ या काळात तब्बल २०१ जणांनी आत्महत्या करत जीवनाचा प्रवास संपवला आहे. बेरोजगारी, व्यसनाधिनता, काैटुंबिक वाद, लाॅकडाऊनमुळे निर्माण झालेल्या आर्थिक अडचणी यातून या आत्महत्या झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

नंदुरबार जिल्ह्यात एप्रिल २०२० मध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण समोर आला होता. नंतरच्या काळात सुरू झालेले लाॅकडाऊन हे बेरोजगारीचे कारण ठरले. दरम्यान, सातत्याने कोरोना रुग्णांची वाढती संख्या उद्योगधंदे बंद ठेवण्यास परिणामकारक अशीच ठरली होती. यातून मार्ग काढून काहींनी नव्याने सुरुवात केली असली तरी, निवडक जणांनी आत्महत्येचा मार्ग पत्करला. जिल्ह्यात दर महिन्याला आत्महत्येच्या घटना घडल्या आहेत. मध्यमवयीन वयोगटातील आत्महत्येचे प्रमाण अधिक आहे. हाताचे काम गेल्याने बेरोजगार होऊन नैराश्यातील व्यसनाधिनतेने अनेकांचा बळी घेतला आहे. लाॅकडाऊन काळात घरीच राहून एकाकी पडल्याने काहींनी आत्महत्येचा पर्याय स्वीकारला असल्याचेही समोर आले आहे.

कुटुंबाने काळजी घेण्याची गरज

कोरोनामुळे मानसिक आजारांमध्ये वाढ झाली आहे. सौम्य ते अगदी मनोरुग्ण होण्यापर्यंतच्या प्रकारांमध्ये वाढ झाल्याचे आढळले आहे. नोकरी नाही, पैसे नाहीत, कर्ज होणे यातून स्वभावात बदल होतात. झोप उडते, चिंता, भीती वाटणे अशी लक्षणे आढळल्यास कुटुंबीयांनीही आधी संबंधिताला धीर देणे आवश्यक आहे.

ध्येयप्राप्तीतील अपयश येणे, असाहाय्यतेची भावना, डिप्रेशन, आर्थिक समस्या, ताण-तणाव हे आत्महत्येसारख्या निर्णयाकडे व्यक्तीला घेऊन जातात. अशा प्रकारचे विचार येत असतील, तर घरातील व्यक्तींनी हे जाणून घेतले पाहिजे. त्यांच्यासोबत संवाद साधला पाहिजे, त्यांना समजून घेणे गरजेचे आहे.

- डॉ. राजेश मेश्राम, मानसोपचार तज्ज्ञ

अशा झाल्या नोंदी...

आरोग्य विभागाकडून प्राप्त नोंदीनुसार जिल्ह्यात एप्रिल २०२० मध्ये १०, मेमध्ये २०, जून १८, जुलै २२, ऑगस्ट १०, सप्टेंबर १८, ऑक्टोबर १७, नोव्हेंबर २०, डिसेंबर १५, जानेवारी २०२१ मध्ये २०, फेब्रुवारीत १७, तर मार्च महिन्यात १४ अशा २०१ जणांनी गेल्या वर्षात आयुष्य संपविल्याची माहिती देण्यात आली आहे.

हे दिवसही जातील

प्रत्येकाच्या आयुष्यात अडचणींचा काळ येत असतो. नंतर आनंदाचे क्षणही येत असतात. हा विचार प्रत्येकाने करणे गरजेचे आहे. कोरोना काळात पती-पत्नीमधील भांडणे वाढली. लॉकडाऊनमुळे प्रत्येकाचा स्पेस कमी झाला. परंतु, प्रत्येकाने एकमेकांच्या गरजांचा, भावनांचा आणि मनाचाही आदर केला पाहिजे.