शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
5
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
6
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
7
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
8
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
9
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
10
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
11
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
12
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
13
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
14
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
15
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
16
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
17
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
18
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
19
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
20
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

कारवाईची सूरी येऊ लागली गळा तरीही सरकारी बाबूंना लाचेचा लळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:48 IST

विविध शासकीय योजना तसेच कर्ज प्रकरणांच्या मंजुरीसह इतर विभागातील किरकोळ कामांसाठी काही हजार ते काही लाख रुपयांची लाच घेण्याचे ...

विविध शासकीय योजना तसेच कर्ज प्रकरणांच्या मंजुरीसह इतर विभागातील किरकोळ कामांसाठी काही हजार ते काही लाख रुपयांची लाच घेण्याचे प्रकार सुरू आहेत. खुर्चीला मान म्हणून अनेक जण काम होत आहे, या एकाच अपेक्षेने हातात असलेली रक्कम देऊन स्वत:चा मार्ग मोकळा करुन घेतात. शाॅर्टकट मार्गाने पैसे मिळतात, म्हणून अनेक जण लाचेची मागणी करून स्वत:चं भलं करून घेत आहेत. अशा लाचखोरांना धडा शिकवणारेही काही आहेत. त्यांच्या पुढाकाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सद्या जिल्ह्यात काम करत असून त्यांच्याकडून सातत्याने कारवाई करुन लाचखोरांवर गुन्हेही दाखल होत आहेत. विभागाला समक्ष किंवा निनावी माहिती दिल्यानंतर ही कारवाई होत आहे. २०१८ मध्ये अपसंपदा बाळगणाऱ्या दोघांवर विभागाने गुन्हे दाखल केले होते. दोघेही नंदुरबार शहरातील होते. चाैकशीअंती अपसंपदा असल्याचे सिद्ध झाल्यानंतर हे गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती देण्यात आले आहे. दरम्यान कमी श्रमात अधिक पैसा मिळू लागल्याने वाढीव खर्च करण्याच्या नादात अनेक जण हिमतीने लाचेची मागणी करतात. अशा तक्रारी संबंधित विभागाकडे प्राप्त झाल्यानंतर त्याची पूर्णपणे चाैकशी करूनच पुढील कारवाई होत आहे. गेल्या चार वर्षात ताब्यात घेण्यात आलेल्या लाचखोरांमध्ये सर्वाधिक संख्या ही महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी यांची आहे. त्याखालोखाल पोलीस व इतर विभागाचे कर्मचारी असल्याची माहिती देण्यात आली आहे. किरकोळ रकमेच्या मागणीचे हे गुन्हे आहेत.

महसूल विभागात सामान्य नागरिकांची अनेक प्रकारची कामे असतात. या कामांसाठी तहसील कार्यालय, तलाठी कार्यालय तसेच इतर कार्यालयांमध्ये वेळोवेळी जाणाऱ्यांना लाचखोरीचा सामना करावा लागल्याचे समोर आले आहे. भूमी अभिलेख विभाग, पोलीस दलातील किरकोळ कामांसाठी अनेकांना लाच देणे योग्य न वाटल्याने त्यांनी तक्रारी दिल्यानंतर लाचखोरांनाना ताब्यात घेण्यात आले होते.

जिल्ह्यात गेल्या तीन वर्षात झालेल्या कारवायांमध्ये सर्वच विभागातील कर्मचारी आहेत. यात सर्वाधिक कर्मचारी हे महसूल विभागाचे आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सध्या जिल्ह्यात तब्बल पाच जणांची गुप्त चाैकशी सुरू आहे. तर दोघांवर कारवाईची शक्यता आहे. हे पाच जण कोण याची अद्याप माहिती समोर आली नसली तरी लाचखोरीतून अपसंपदा गोळा करू पाहणाऱ्यांवरच ही कारवाई होणार असे निश्चित आहे.

शासनाकडून कर्मचाऱ्यांना इमानदारीने कर्तव्य पार पाडून सामान्यांची सेवा करावी या उद्देशाने सातत्याने समुपदेशन करण्यात येते. परंतु बदलत्या काळानुसार खर्च करण्याची सवय झालेल्यांकडून लाचखोरीला वाव मिळेल, अशी परिस्थिती निर्माण करण्यात येत आहे. लाचेची मागणी करणाऱ्या विरोधात लिखित तक्रारी आल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडूनही कारवाई करण्यात येत आहे.

जिल्ह्यात लाचेची मागणी करणाऱ्यांची तक्रार करण्यासाठी विभागाकडून हेल्पलाईन सेवाही सुरू करण्यात आली आहे. या माध्यमातून शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये केल्या जाणाऱ्या लाचेच्या मागणीची तक्रार किंवा माहिती देता येणार आहे. विभागाकडून दरवर्षी यासाठी विशेष पंधरवाड्याचे आयोजन करून शाळा, महाविद्यालय, बसस्थानके यासह विविध सार्वजनिक ठिकाणी शिबिरे घेण्यात येऊन लाचखोरीला आळा घालण्यासाठी प्रयत्न केला जातो.

चार वर्षात सातत्याने लाचखोरांना ताब्यात घेतले जात आहे. येत्या काळातही हे सत्र सुरूच राहणार आहे. नागरिकांनीही लाचेच्या मागणीला प्रतिसाद न देताना पुढाकार घेतल्यास या समस्येचे निराकारण होऊन स्वच्छ प्रशासन कामाला येऊ शकते. प्रत्येकाने याबाबत काळजी घेत कामकाज करावे.

- शिरीष जाधव, उपअधीक्षक,एसीबी, नंदुरबार