शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्याच्या ४४ टक्के क्षेत्रात खरीप पेरण्या पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2020 12:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात खरीप पीक पेरण्यांची कामे सध्या वेगात सुरु असून यातून आजअखेरीस ४४ टक्के क्षेत्रात ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात खरीप पीक पेरण्यांची कामे सध्या वेगात सुरु असून यातून आजअखेरीस ४४ टक्के क्षेत्रात पेरणी झाली आहे़ आतापर्यंत सर्वाधिक शहादा तर सर्वात कमी पेरण्या ह्या तळोदा तालुक्यात झाल्या आहेत़जिल्ह्यात यंदा २ लाख ९५ हजार २१९ हेक्टर क्षेत्रात खरीप पिकांच्या पेरण्या करण्याचे निर्धारित करण्यात आले आहे़ यापैकी १ लाख ३२ हजार १७७ हेक्टर क्षेत्रात आजअखेरीस पेरण्या पूर्ण करण्यात आल्या आहेत़ तालुकानिहाय पेरणीत सर्वाधिक ३५ हजार १६० हेक्टर पिकपेरा हा शहादा तालुक्यात झाला आहे़ नंदुरबार तालुक्यात २९ हजार १५४, नवापूर २६ हजार ९११, तळोदा ३ हजार ६४३, धडगाव १८ हजार ९०५ तर अक्कलकुवा तालुक्यात १८ हजार ४०३ हेक्टर क्षेत्रात खरीप पिके पेरली गेली आहेत़ खरीप पिकांसोबतच शेतकऱ्यांनी ऊस लागवडही सुरु केली असून आतापर्यंत ३ हजार ९९५ हेक्टर क्षेत्रात ऊस लागवड पूर्ण झाल्याची माहिती देण्यात आली आहे़शेतकऱ्यांची सर्वाधिक पसंती यंदाही कापसाला दिसून येत आहे़ कापूस लागवडीचा वेग वाढला असून ६० टक्के क्षेत्रात कापूस टोचणी पूर्ण झाली आहे़ गेल्या दोन आठवड्यापासून पावसाने दडी मारली असली तरी पाऊस येण्याची चिन्हे असल्याने शेतकºयांकडून दरदिवशी पेरणी व शेतीकामांना वेग देण्यात येत आहे़ यंदा खत टंचाईची सर्वाधिक मोठी समस्या असतानाही शेतकरी मागील वर्षाचे शिल्लक खत आणि चालू वर्षातील मिळालेले खत याची मात्रा देऊन पिकांचे संगोपन करण्यात व्यस्त असल्याचे चित्र जिल्ह्यातील विविध भागात दिसून येत आहे़ येत्या पाच दिवसात जिल्ह्यात अतीवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे़ यामुळे शेतकºयांमध्ये काहीअंशी भिती असली तरी पावसामुळे जमिनीतील ओल कायम होणार असल्याने पिकांच्या संगोपनातील अडथळे दूर होणार असल्याचे सांगण्यात येत आहे़ सपाटीच्या तालुक्यांसह सातपुड्याच्या दुर्गम भागातील गावांमध्येही पिकांची पेरणी करण्यात येत असून शेतकरी पारंपरिक कडधान्य पिकांना प्राधान्य देत आहेत़ यांतर्गत धडगाव तालुक्यात यंदा साडेसहा हेक्टर क्षेत्रात उडीदाचा पेरा होणार असल्याचे सांगण्यात आले आहे़यंदा जिल्ह्यात १ लाख ५ हजार ६६१ हेक्टर खरीप पिकाचे निर्धारण आहे़ यापैकी ६३ हजार ४३० हेक्टरवर कापूस लागवड पूर्ण करण्यात आली आहे़ नंदुरबार २४ हजार ६०, नवापूर ४ हजार, शहादा २७ हजार ९२६, तळोदा २ हजार ६९७, धडगाव ७९० तर अक्कलकुवा तालुक्यात ३ हजार ९५३ हेक्टरवर कापूस लागवड करण्यात आली आहे़ जिल्ह्यात ५ हजार ८१२ हेक्टरवर भात, १६ हजार २९९ हेक्टरवर खरीप ज्वारी, १ हजार हेक्टरवर बाजरी, २३१ हेक्टर मका, ५ हजार ८५ हेक्टर तूर, १ हजार ४३८ हेक्टर मूग, ६ हजार ३४४ हेक्टर उडीद, १० हजार १०५ हेक्टरवर सोयाबीन आदी पिकांची पेरणी पूर्ण करण्यात आली आहे़ खरीप ज्वारीच्या उत्पादनात यंदा वाढ होण्याची शक्यता आहे़ शनिवारपर्यंत जिल्ह्यात १६ हजार २९९ हेक्टरवर खरीप ज्वारीचा पेरा झाला आहे़ यात नंदुरबार १ हजार ६९५, नवापूर ३ हजार २६६, शहादा १ हजार १८७, तळोदा २०१, धडगाव ७ हजार ८४० तर अक्कलकुवा तालुक्यात २ हजार ११० हेक्टरवर ज्वारीची पेरणी पूर्ण झाली आहे़ दुर्गम भागातील दोन तालुक्यात ज्वारी पेरणीचा वेग वाढता आहे़ धडगाव तालुक्यात १३५ टक्के ज्वारी पेरणी आहे़यंदाच्या हंगामातही कापूस पेरणीला पसंती दिली जात आहे़ यांतर्गत यंदा १ लाख ५६ हजार ६६१ हेक्टर क्षेत्रात कापूस लागवड होणार आहे़ यापैकी ६३ हजार ४३० हेक्टर क्षेत्रात कापूस लागवड पूर्ण झाली आहे़ सर्वाधिक २७ हजार ९२६ हेक्टर कापूस शहादा तालुक्यात लागवड झाला आहे़ त्यानंतर २४ हजार ६० हेक्टर कापूस नंदुरबार तालुक्यात लागवड झाला आहे़ इतर चार तालुक्यात कापूस पेरा सुरु आहे़