शहरं
Join us  
Trending Stories
1
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
2
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
3
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
4
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
5
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
6
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
7
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
8
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
9
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
10
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
11
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
12
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
13
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर
14
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
15
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
16
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story
17
Shravan Shanivar 2025: शनिवारी कसे करावे अश्वत्थ मारुती पूजन? पिंपळाच्या झाडाचीही पूजा महत्त्वाची!
18
नागरिकांची झोप उडवणाऱ्या चड्डी- बनियान टोळीला पकडण्यात पोलिसांना यश!
19
आशा भोसलेंनी पुण्यातील आलिशान फ्लॅट विकला! एकाच झटक्यात कमावले इतके कोटी, तब्बल ४२ टक्के वाढ
20
कुठल्याही देवावर विश्वास नाही, कुठलाही धर्म मानत नाही, या १० देशांमधील बहुतांश लोक आहेत नास्तिक

खरीप आणि रब्बी पिकांना लागले उत्पादन घटीचे ग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 12:44 IST

नंदुरबार : जिल्ह्यात 2016-17 या वर्षात पावसाळ्यात 61 दिवस पावसाची नोंद होती़ परिणामी रब्बी हंगामातील धान्य पिकांच्या उत्पादनात थेट ...

नंदुरबार : जिल्ह्यात 2016-17 या वर्षात पावसाळ्यात 61 दिवस पावसाची नोंद होती़ परिणामी रब्बी हंगामातील धान्य पिकांच्या उत्पादनात थेट 1़09 टक्के घट आली होती़ खरीप हंगामातही हीच स्थिती होती़ गेल्या तीन वर्षात सातत्याने खरीप आणि रब्बी पिकांच्या उत्पादन घटीचा सामना करावा लागत असल्याने ग्रामीण अर्थव्यवस्थेवर परिणाम होत आह़े खर्च करुन उत्पादन निघत नसल्याने अनेकांनी यंदा पेरण्याच केलेल्या नाहीत   जिल्ह्यात यंदा 67 टक्के पावसाची नोंद होऊन चार तालुक्यात दुष्काळी घोषित झाली आहेत़ याचा परिणाम खरीपानंतर रब्बी पिकांच्या पेरण्यांवर झाला आह़े यामुळे चालू हंगामात 5 हजार 240 हेक्टर क्षेत्रात रब्बी ज्वारी आणि 8 हजार 881 हेक्टर क्षेत्रात गहू पेरण्या पूर्ण करण्यात आल्या आहेत़ सर्वसाधारण क्षेत्राच्या 40 टक्के  झालेल्या धान्य पिकांच्या पेरण्या पाण्याअभावी थांबवल्याचे सांगण्यात येत आह़े येत्या काळात गहू आणि ज्वारीच्या हेक्टरी उत्पादनात घट येण्याची शक्यता वर्तवली जात आह़े परंतू उत्पादन घटीचे हे दुष्टचक्र गेल्या तीन वर्षापासून कायम असून सर्वाधिक फटका गेल्या वर्षात बसल्याचे शासनाकडून जाहिर झालेल्या आकडेवारीवरुन समोर आले आह़े जिल्ह्यात 2015 मध्ये 9 हजार 323 हेक्टरमध्ये ज्वारी पेरा झाला होता त्याची उत्पादकता ही हेक्टरी 995 किलो एवढी होती़ वाढीव असलेली ही उत्पादकता 2016 मध्ये मात्र कमालीची घटून प्रती हेक्टर 886 र्पयत आली होती़  यातून 182़66 मेट्रीक टन ज्वारीचे उत्पादन होऊन 39 टक्के उत्पादनात घट आली आह़े शेतक:यांना सर्वाधिक आधार देणा:या गहूचे गेल्या 2017 च्या रब्बी हंगामातील एकूण उत्पादन हे केवळ 309 मेट्रीक टन एवढे होत़े 18 हजार 352 हेक्टरवरील या गहूची उत्पादकता 1 हजार 684 किलो होती़ किमान 2 हजार 100 किलोग्रॅम असलेली उत्पादकता अचानक खाली आल्याने 19़ टक्के उत्पादन घट झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आह़े धान्याचे उत्पादन कमी झाल्याने आदिवासी शेतक:यांनी ज्वारी आणि बाजरी खरेदी करुन आणावी लागली होती़ यातून अनेकजण कजर्बाजारी झाले होत़े गहू आणि ज्वारीसोबत इतर धान्य पिकांच्या पे:यात कमालीची घट आली आह़े यात प्रामुख्याने बाजरीचा समावेश आह़े 2017 मध्ये 6 हजार हेक्टर क्षेत्रावरील बाजरीचे हेक्टरी 867 किलोग्रॅम उत्पादन आले होत़े तर केवळ 46 मेट्रिक टन बाजारीचे जिल्ह्यातून उत्पादन झाले होत़े बाजारीचे सरासरी 28 टक्के उत्पादन घटल्याने यंदा जिल्ह्यात बाजरीची पेरणीलाही सुरुवात झालेली नसल्याची माहिती आह़े  नवापूर आणि नंदुरबारसह अक्कलकुवा तालुक्यात खरीप हंगामात पेरणी होणा:या भाताच्या शेतीला यंदा मोठा फटका बसला आह़े 2017 मध्ये भाताचे सरासरी क्षेत्र 20 हजार हेक्टर एवढे होत़े यातून प्रति हेक्टर 1 हजार 03 किलोग्रॅम उत्पादन शेतक:यांना मिळू शकले होत़े तर जिल्हाभरात 254 मेट्रीक टन भाताचे उत्पादन घेतले गेले होत़े यंदा मात्र हे उत्पादन निम्मेही नसल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आह़े शेतक:यांना केवळ मका पिकाने दिलासा दिला होता़ 2 हजार 389 किलो हेक्टरी उत्पादकता असलेल्या मक्याचे जिल्ह्यात तब्बल 514 मेट्रीक टन उत्पादन आले होत़े