शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

दुरुस्तीअभावी खापरखेडा धरण निरुपयोगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2018 12:47 IST

शेतकरी पाण्यापासून वंचित : मेनगेटला भगदाड, गाळ साचल्याने जलसाठय़ावर परिणाम

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 23 : खापरखेडा, ता.शहादा येथील रंगूमती नदीवर असलेल्या धरणात पूर्णपणे गाळ भरला गेल्याने व नादुरुस्त पाटचा:यांमुळे हे धरण निरुपयोगी ठरत आहे. या धरणात साचलेल्या गाळामुळे पाण्याचा साठा होत नसल्याने शेतक:यांना पाण्यापासून वंचित रहावे लागत  आहे.खापरखेडा येथे रंगूमती नदीवर 1970 मध्ये मातीचे धरण बांधण्यात आले आहे. या धरणाची वेळोवेळी दुरुस्ती होत नसल्याने व पूर्णपणे गाळाने भरल्याने पाण्याचा साठा होऊ शकत नाही. हे धरण सद्यस्थितीत तलावासारखे वाटते. परिसरातील सुमारे 700 एकर शेती सिंचनाखाली येईल या उद्देशाने हे धरण बांधण्यात आले होते. परंतु धरणात गाळ साचल्याने व मुख्य गेट नादुरुस्त असल्याने पावसाळ्यात पाणीसाठा न होता पाणी वाहून जाते. जेमतेम 100 एकर शेतीलाही पाणी मिळत नाही. या धरणाच्या दुरुस्तीसाठी निधी मिळाल्याचे समजते. मात्र गेटची दुरुस्ती, पिचींग भरणे, गाळ काढणे, पाटचारी तयार करणे, लहान चा:या बनविणे आदी कोणतीही कामे झालेली नाहीत. धरणाच्या दुरुस्तीसाठी मिळालेला निधी व झालेल्या कामांची चौकशी  करण्याची मागणी शेतक:यांकडून होत आहे.सद्यस्थितीत धरणात पाणीसाठा नसल्याने त्याची दुरुस्ती होण्याची गरज आहे. गाळ काढण्यासाठी शासनाने जेसीबी मशीन उपलब्ध करून देऊन संपूर्ण गाळ काढण्यात यावा. मेनगेट दुरुस्त करून धरणार्पयत जाण्यासाठी रस्ता तयार करावा. या धरणातील गाळ वाहून नेणा:या शेतक:यांकडून काही जण पैशांची मागणी करतात. पैसे दिले नाही तर काही महाभाग तर गाळ वाहून नेणा:या वाहनांना आडवे येतात, अशी तक्रार शेतक:यांकडून होत आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाच्या कर्मचा:यांनी तेथे थांबण्याची गरज आहे.शासनाकडून ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ मोहीम राबविली जाते. त्यासाठी लाखो रुपये खर्च करण्यात येतात. त्याचप्रमाणे खापरखेडा धरणातील गाळ उपसण्यासाठी शासनाने जेसीबी मशीन उपलब्ध करून द्यावे. त्यामुळे धरणातील गाळही काढला जाईल व शेतक:यांच्या जमिनीसाठी गाळ उपयोगी पडणार आहे. धरणातील गाळ कमी झाल्यानंतर पुरेसा पाणीसाठा होऊन शेती सिंचनासाठी त्याचा उपयोग होणार आहे. लोकप्रतिनिधी व पाटबंधारे विभागाच्या अधिका:यांनी या धरणाच्या दुरुस्तीकडे लक्ष घालून पाण्याअभावी शेती बागायती करण्यापासून वंचित असलेल्या शेतक:यांना पाणी उपलब्ध  करून देण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.