शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
2
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
3
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
4
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
5
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
6
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
7
False Gangrape Case: बलात्काराचा खोटा गुन्हा; महिलेस साडेसात वर्षे शिक्षा, न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
8
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
9
"म्हणजे पक्ष फोडून आमदार गोळा करायचे हे मुलांनी पहिलीपासूनच...", हिंदी सक्तीवरुन मराठी लेखकाचा टोला
10
...तर तुमचे अकाउंट होऊ शकते हॅक; कोट्यवधी लोकांची खाजगी माहिती लीक झाल्याची भिती
11
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
12
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
13
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
14
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
15
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
16
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
17
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
18
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
19
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
20
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं

दुरुस्तीअभावी खापरखेडा धरण निरुपयोगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2019 21:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोंढावळ : शहादा तालुक्यातील कोंढावळपासून पाच किलोमीटर अंतरावर खापरखेडा गावाजवळ डोंगराळ भागात 1970 मध्ये रंगूमती नदीवर ...

लोकमत न्यूज नेटवर्ककोंढावळ : शहादा तालुक्यातील कोंढावळपासून पाच किलोमीटर अंतरावर खापरखेडा गावाजवळ डोंगराळ भागात 1970 मध्ये रंगूमती नदीवर मातीचे धरण बांधण्यात आले आहे. या धरणाला 50 वर्षे होत असून, या धरणाची अद्यापर्पयत दुरूस्ती करण्यात आली नसल्याने पाण्याचा अपेक्षित साठा होत नाही. गेल्या 10 वर्षापासून शेतकरी धरणाच्या दुरुस्तीची मागणी करीत आहेत.         मात्र त्याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने नाराजी व्यक्त होत  आहे. खापरखेडा धरणाच्या पाण्यामुळे सुमारे एक हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येईल एवढी क्षमता होती. या धरणामुळे कोंढावळ, जयनगर, बोराळे, वडाळी या गावातील शेतक:यांच्या शेतीला फायदा होईल, अशी अपेक्षा होती. मात्र गेल्या 50 वर्षापासून धरणातील गाळदेखील काढण्यात आलेला नाही.  त्यामुळे धरणातील पाणी क्षमतेत कमालीची घट झाल्याचे दिसून येत आहे.  सद्य:स्थितीत 100 हेक्टर जमिनीलाही त्याचा उपयोग होत नाही. महागडी बियाणे पेरुन शेतकरी आहे त्या परिस्थितीत पिके जगविण्याचा प्रय} करतात. परंतु या पिकांना शेवटचे पाणी मिळत नसल्याने ऐन हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात असल्याचे शेतक:यांनी सांगितले. या सर्व प्रकारास पाटबंधारे विभागाचे अधिकारी व कर्मचारी जबाबदार असल्याचा आरोपही करण्यात येत आहे. गेल्या काही वर्षापासून धरणातील गाळ व दुरूस्तीच्या कामाची माहिती घेतली असता  लाखो रुपयांची बिले पास         झाल्याचे समजते. मात्र धरणाचे कोणत्याही प्रकारे दुरूस्तीचे काम केल्याचे दिसून येत नाही. धरणात पाणी कमी व गाळ अधिक           साचला आहे. धरणाचे मेनगेट 10 वर्षापासून नादुरुस्त असल्याने त्याद्वारे पाणी पास होत नाही. त्याठिकाणी मोठा बोगदा पडला असून या बोगद्याद्वारे पावसाचे पाणी वाहून जाते. धरणाचा काही भाग खचला असल्याने  त्याद्वारेही पाणी वाहून जाते. धरणाच्या बांधावर काटेरी झुडपे प्रचंड प्रमाणात वाढले असून दगडी पिचींगही उखडली आहे. डिसेंबर 2018 मध्ये पाटबंधारे विभागाचे अधिकारी व कर्मचा:यांनी खापरखेडा व कोंढावळ धरणाची पाहणी केली आहे. त्यामुळे उन्हाळ्यात तरी या धरणातील गाळ काढण्यासह दुरूस्तीचे काम होण्याची अपेक्षा आहे. मात्र संबंधित पावसाळ्यात तात्पुरती डागडुजी करून बिले काढत असल्याचा आरोप शेतक:यांकडून होत आहे.दरम्यान, या परिसरात दोन नद्या व लहान नाले असून, या नदी-नाल्यानंवर कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधण्यात आले होते. परंतु तेही पहिल्याच पावसात वाहून गेल्याने याठिकाणी शिरपूर पॅटर्नचे बंधारे बांधण्याची मागणी शेतकरी व ग्रामस्थांकडून केली जात आहे.