शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

दुरुस्तीअभावी खापरखेडा धरण निरुपयोगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2019 21:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोंढावळ : शहादा तालुक्यातील कोंढावळपासून पाच किलोमीटर अंतरावर खापरखेडा गावाजवळ डोंगराळ भागात 1970 मध्ये रंगूमती नदीवर ...

लोकमत न्यूज नेटवर्ककोंढावळ : शहादा तालुक्यातील कोंढावळपासून पाच किलोमीटर अंतरावर खापरखेडा गावाजवळ डोंगराळ भागात 1970 मध्ये रंगूमती नदीवर मातीचे धरण बांधण्यात आले आहे. या धरणाला 50 वर्षे होत असून, या धरणाची अद्यापर्पयत दुरूस्ती करण्यात आली नसल्याने पाण्याचा अपेक्षित साठा होत नाही. गेल्या 10 वर्षापासून शेतकरी धरणाच्या दुरुस्तीची मागणी करीत आहेत.         मात्र त्याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने नाराजी व्यक्त होत  आहे. खापरखेडा धरणाच्या पाण्यामुळे सुमारे एक हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येईल एवढी क्षमता होती. या धरणामुळे कोंढावळ, जयनगर, बोराळे, वडाळी या गावातील शेतक:यांच्या शेतीला फायदा होईल, अशी अपेक्षा होती. मात्र गेल्या 50 वर्षापासून धरणातील गाळदेखील काढण्यात आलेला नाही.  त्यामुळे धरणातील पाणी क्षमतेत कमालीची घट झाल्याचे दिसून येत आहे.  सद्य:स्थितीत 100 हेक्टर जमिनीलाही त्याचा उपयोग होत नाही. महागडी बियाणे पेरुन शेतकरी आहे त्या परिस्थितीत पिके जगविण्याचा प्रय} करतात. परंतु या पिकांना शेवटचे पाणी मिळत नसल्याने ऐन हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात असल्याचे शेतक:यांनी सांगितले. या सर्व प्रकारास पाटबंधारे विभागाचे अधिकारी व कर्मचारी जबाबदार असल्याचा आरोपही करण्यात येत आहे. गेल्या काही वर्षापासून धरणातील गाळ व दुरूस्तीच्या कामाची माहिती घेतली असता  लाखो रुपयांची बिले पास         झाल्याचे समजते. मात्र धरणाचे कोणत्याही प्रकारे दुरूस्तीचे काम केल्याचे दिसून येत नाही. धरणात पाणी कमी व गाळ अधिक           साचला आहे. धरणाचे मेनगेट 10 वर्षापासून नादुरुस्त असल्याने त्याद्वारे पाणी पास होत नाही. त्याठिकाणी मोठा बोगदा पडला असून या बोगद्याद्वारे पावसाचे पाणी वाहून जाते. धरणाचा काही भाग खचला असल्याने  त्याद्वारेही पाणी वाहून जाते. धरणाच्या बांधावर काटेरी झुडपे प्रचंड प्रमाणात वाढले असून दगडी पिचींगही उखडली आहे. डिसेंबर 2018 मध्ये पाटबंधारे विभागाचे अधिकारी व कर्मचा:यांनी खापरखेडा व कोंढावळ धरणाची पाहणी केली आहे. त्यामुळे उन्हाळ्यात तरी या धरणातील गाळ काढण्यासह दुरूस्तीचे काम होण्याची अपेक्षा आहे. मात्र संबंधित पावसाळ्यात तात्पुरती डागडुजी करून बिले काढत असल्याचा आरोप शेतक:यांकडून होत आहे.दरम्यान, या परिसरात दोन नद्या व लहान नाले असून, या नदी-नाल्यानंवर कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधण्यात आले होते. परंतु तेही पहिल्याच पावसात वाहून गेल्याने याठिकाणी शिरपूर पॅटर्नचे बंधारे बांधण्याची मागणी शेतकरी व ग्रामस्थांकडून केली जात आहे.