शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: भगूर नगरपरिषदेत शिवसेनेची २५ वर्षांची सत्ता अजितदादांच्या राष्ट्रवादीने उलथवली; पहा लेटेस्ट अपडेट
2
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
3
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
4
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
5
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
6
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
7
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
8
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
9
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
10
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
11
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
12
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
13
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
14
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
15
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
16
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
17
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
18
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
19
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
20
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
Daily Top 2Weekly Top 5

अतिदक्षता विभाग सुसज्ज ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2020 12:53 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : परदेशासह देशाच्या विविध राज्यांमध्ये शिक्षणानिमित्त व उद्योग व्यवसायासह नोकरीनिमित्त राहणाऱ्या शहादेकर नागरिकांची संख्या जिल्ह्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : परदेशासह देशाच्या विविध राज्यांमध्ये शिक्षणानिमित्त व उद्योग व्यवसायासह नोकरीनिमित्त राहणाऱ्या शहादेकर नागरिकांची संख्या जिल्ह्यात सर्वाधिक आहे. देशात कोरोना व्हायरसचे थैमान सुरू असल्याने सर्वत्र लॉकडाऊनसारखी परिस्थिती असल्याने विविध भागात राहणारे नागरिक येत्या काही दिवसात शहाद्यात मोठ्या संख्येने येणार आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी शहरातील खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभाग सज्ज ठेवण्याचे आदेश दिले आहेत.शहादा शहरात खाजगी रुग्णालयांची संख्या सर्वाधिक असून बहुतांश रुग्णालयाकडे अद्ययावत अतिदक्षता विभाग कार्यरत आहेत. राज्यात कोरोना व्हायरसचे रुग्ण सर्वाधिक आढळून आल्याने मुख्यमंत्र्यांनी ३१ मार्चपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र राज्यात १४४ कलम लागू करून लोकांचे आदेश दिले आहेत. राज्यातील अनेक विद्यार्थी मुंबई-पुणे व राज्याच्या इतर भागात शिक्षणासाठी वास्तव्यास आहेत. त्याचप्रमाणे अनेक नागरिक उद्योग-व्यवसायानिमित्त वास्तव्यास आहेत. ते शहाद्याकडे परत येत आहेत. गेल्या आठवड्यात अनेक नागरिक व विद्यार्थी परदेशासह मुंबई, पुणे येथून शहाद्यात दाखल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी शहरातील खाजगी रुग्णालयांशी संपर्क साधून तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करून अतिदक्षता विभागातील आयसोलेशन बेड तयार करण्यासह आवश्यक ती यंत्रसामग्री व व्हेंटीलेटर तयार ठेवण्याचे आदेश दिले आहेत. याठिकाणी शासकीय वैद्यकीय अधिकारी व कर्मचाºयांचे पथक कार्यरत असणार असून ते संबंधित संशयित कोरोनाग्रस्त रुग्णांचे नमुने तपासणीसाठी घेतील. राज्यात पुणे, मुंबई व नागपूर या तीन ठिकाणी तपासणीची सुविधा उपलब्ध आहे. दुर्दैवाने तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आल्यास या अतिदक्षता विभागात संबंधित रुग्णांवर उपचार करण्याची सुविधा केली जाणार आहे.दरम्यान, परदेशातून व राज्यासह परराज्यातून शहाद्यात परतणाºयांची संख्या गेल्या चार-पाच दिवसात वाढली आहे. अशा नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी आपापली वैद्यकीय तपासणी स्वत:हून करून घ्यावी. त्याचप्रमाणे पुढील १५ दिवस कुठल्याही सार्वजनिक उपक्रमात शोभायात्रा व कार्यक्रमात हजर राहू नये. जे विद्यार्थी व नागरिक या आदेशाचा भंग करतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती तहसीलदार डॉ.मिलिंद कुलकर्णी यांनी दिली.