शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

काथर्देदिगर पुनर्वसित सिंचन सुविधांपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2019 12:53 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : सरदार सरोवर प्रकल्पाच्या विकासासाठी पनर्वसन करण्यात आलेल्या मुखडी, डनेल या भागातील आदिवासी बांधवांचे काथर्देदिगर ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सरदार सरोवर प्रकल्पाच्या विकासासाठी पनर्वसन करण्यात आलेल्या मुखडी, डनेल या भागातील आदिवासी बांधवांचे काथर्देदिगर ता. शहादा येथे पूनर्वसन करण्यात आले आहे. परंतु तेथे या बांधवांना सिंचनासाठी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या नाही. त्यामुळे त्यांच्या नाराजीचा सुर उमटू लागला आहे.नर्मदा नदी काठावरील गावांची अक्कलकुवा, तळोदा व शहादा तालक्यांमध्ये पूनर्वसन करण्यात आले आहे. त्यात अक्कलकुवा तालुक्यातील डनेल, मुखडी या भागातील बांधवांचे शहादा तालुक्यातील त:हावद येथे पुनर्वसन  करण्यात आले आहे. तेथे पुन्हा जागा कमी पडत असल्यामुळे बहतांश बांधवांचे काथर्देदिगर येथे पुनर्वसन करण्यात आले आहे. त्यात प्रथम 81 कुटुंबांचे पूनर्वसन झाले त्यानंतर टप्प्या-टप्प्याने 40 व 27 असे एकुण 148 कुटुंबांचा तेथे समावेश करण्यात आला आहे. पूनर्वसित गावांमध्ये अनेक चांगल्या सुविधा उपलब्ध करुन देण्याचे शासनामार्फत सांगण्यात आले होते. परंतु काही सुविधा वगळता बहुतांश सुविधा शासनामार्फत उपब्ध करुन दिल्या नसल्याचे काथर्देदिगर येथील विस्थापितांकडून सांगण्यात आले. नर्मदा नदीकाठावर मोठय़ा जंगलामुळे उदरनिर्वाहासाठी विविध माध्यमातून नागरिकांना भांडवल उपलब्ध होत होते. परंतु पूनर्वसित गावांमध्ये विस्थापित बांधवांना केवळ शेतीवरच अवलंबून राहावे लागत आहे. उदरनिर्वाह व जीवनाचा आधार मिळविण्यासाठी विस्थापितांची धावपळ होत आहे. नर्मदा नदीकाठावर उपलब्ध होणा:या भांडवलासारखे भांडवल काथर्देदिगर येथेही उपलब्ध व्हावे, अशी अपेक्षा काथर्देदिगर येथील नागरिकांमार्फत व्यक्त केली जात आहे. त्यासाठी पूनर्वसित गावांमधी शेतीसाठी मुबलक पाणी उपलब्ध करुन द्यावे, अशी मागणीही करण्यात येत आहे. शेतीसाठी सिंचन सुविधा उपलब्ध करुन द्यावी, या मागणीसाठी मागील काही महिन्यांपासून शासनाकडे नागरिकांमार्फत पाठपुरावा करण्यात येत आहे. त्यात नरशी पाडवी, पारशी पाडवी, शरद कर्मा पाडवी, रामा वसावे, बाठय़ा पाडवी, बामणीबाई वसावे, रामसिंग वसावे, जात:या वसावे, किर्ता वसावे, रणजित वसावे, खेमा वसावे, फुलजी पाडवी, मुरजी पाडवी, वांग:या वसावे, नोकटय़ा पाडवी, अमरसिंग पाडव, तेजला वसावे, रणजित जुग्या वसावे, रायसिंग वसावे, पिद्या वसावे, दमणीबाई पाडवी यांच्यासह 25 शेतक:यांना सिंचनाच्या सुविधा उपलब्ध करुन देण्याची मागणी करण्यात आली आहेत. परंतु अद्याप सुविधा देण्यात आली नाही. याबाबत   वारंवार पाठपुरावा करण्यात आला, परंतु या नागरिकांना मागण्या प्रस्तावित असल्याचेच सांगण्यात येत आहे. प्रत्यक्षात कुठलीही कार्यवाही होतांना दिसून येत नाही. त्यामुळे काथर्देदिगर येथील नागरिकांमध्ये नाराजीचा सुर उमटू लागला आहे. पुन्हा एकदा नागरिकांच्या या मागण्या सोडविण्यात याव्या अशी मागणी करण्यात आली आहे.

सरदार सरोवर प्रकल्पग्रस्त बांधवांमध्ये प्रामुख्याने लाकडापासून निर्मित घरेच बांधण्यात येतात. या घरांना कुठल्याही प्रकारची क्षती पोहोचू नये, यासाठी शासनामार्फत घरपाया योजना राबविण्यात आली. परंतु काही विस्थापिक नागरिक या योजनेपासून वंचित राहिले आहेत. त्यात केशा वसावे, सेस:या पाडवी, खाअल्या वसो, फोत्या पाडवी, फुलजी पाडवी, खेमा पाडवी, सिमजी पाडवी, वाण्या पाडवी, रेशमाबाई वसावे व बायला वसावे यांचा समावेश आहे. या वंचित लाभाथ्र्याना घरपाया याजनेचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी देखील काथर्देदिगर येथील नागरिकांमार्फत करण्यात आली आहे.