शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
2
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
3
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
4
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
5
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
6
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
7
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
8
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
9
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
10
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
11
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
13
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
14
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
15
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
16
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
17
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
18
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
19
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
20
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
Daily Top 2Weekly Top 5

काथर्देदिगर पुनर्वसित सिंचन सुविधांपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2019 12:53 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : सरदार सरोवर प्रकल्पाच्या विकासासाठी पनर्वसन करण्यात आलेल्या मुखडी, डनेल या भागातील आदिवासी बांधवांचे काथर्देदिगर ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सरदार सरोवर प्रकल्पाच्या विकासासाठी पनर्वसन करण्यात आलेल्या मुखडी, डनेल या भागातील आदिवासी बांधवांचे काथर्देदिगर ता. शहादा येथे पूनर्वसन करण्यात आले आहे. परंतु तेथे या बांधवांना सिंचनासाठी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या नाही. त्यामुळे त्यांच्या नाराजीचा सुर उमटू लागला आहे.नर्मदा नदी काठावरील गावांची अक्कलकुवा, तळोदा व शहादा तालक्यांमध्ये पूनर्वसन करण्यात आले आहे. त्यात अक्कलकुवा तालुक्यातील डनेल, मुखडी या भागातील बांधवांचे शहादा तालुक्यातील त:हावद येथे पुनर्वसन  करण्यात आले आहे. तेथे पुन्हा जागा कमी पडत असल्यामुळे बहतांश बांधवांचे काथर्देदिगर येथे पुनर्वसन करण्यात आले आहे. त्यात प्रथम 81 कुटुंबांचे पूनर्वसन झाले त्यानंतर टप्प्या-टप्प्याने 40 व 27 असे एकुण 148 कुटुंबांचा तेथे समावेश करण्यात आला आहे. पूनर्वसित गावांमध्ये अनेक चांगल्या सुविधा उपलब्ध करुन देण्याचे शासनामार्फत सांगण्यात आले होते. परंतु काही सुविधा वगळता बहुतांश सुविधा शासनामार्फत उपब्ध करुन दिल्या नसल्याचे काथर्देदिगर येथील विस्थापितांकडून सांगण्यात आले. नर्मदा नदीकाठावर मोठय़ा जंगलामुळे उदरनिर्वाहासाठी विविध माध्यमातून नागरिकांना भांडवल उपलब्ध होत होते. परंतु पूनर्वसित गावांमध्ये विस्थापित बांधवांना केवळ शेतीवरच अवलंबून राहावे लागत आहे. उदरनिर्वाह व जीवनाचा आधार मिळविण्यासाठी विस्थापितांची धावपळ होत आहे. नर्मदा नदीकाठावर उपलब्ध होणा:या भांडवलासारखे भांडवल काथर्देदिगर येथेही उपलब्ध व्हावे, अशी अपेक्षा काथर्देदिगर येथील नागरिकांमार्फत व्यक्त केली जात आहे. त्यासाठी पूनर्वसित गावांमधी शेतीसाठी मुबलक पाणी उपलब्ध करुन द्यावे, अशी मागणीही करण्यात येत आहे. शेतीसाठी सिंचन सुविधा उपलब्ध करुन द्यावी, या मागणीसाठी मागील काही महिन्यांपासून शासनाकडे नागरिकांमार्फत पाठपुरावा करण्यात येत आहे. त्यात नरशी पाडवी, पारशी पाडवी, शरद कर्मा पाडवी, रामा वसावे, बाठय़ा पाडवी, बामणीबाई वसावे, रामसिंग वसावे, जात:या वसावे, किर्ता वसावे, रणजित वसावे, खेमा वसावे, फुलजी पाडवी, मुरजी पाडवी, वांग:या वसावे, नोकटय़ा पाडवी, अमरसिंग पाडव, तेजला वसावे, रणजित जुग्या वसावे, रायसिंग वसावे, पिद्या वसावे, दमणीबाई पाडवी यांच्यासह 25 शेतक:यांना सिंचनाच्या सुविधा उपलब्ध करुन देण्याची मागणी करण्यात आली आहेत. परंतु अद्याप सुविधा देण्यात आली नाही. याबाबत   वारंवार पाठपुरावा करण्यात आला, परंतु या नागरिकांना मागण्या प्रस्तावित असल्याचेच सांगण्यात येत आहे. प्रत्यक्षात कुठलीही कार्यवाही होतांना दिसून येत नाही. त्यामुळे काथर्देदिगर येथील नागरिकांमध्ये नाराजीचा सुर उमटू लागला आहे. पुन्हा एकदा नागरिकांच्या या मागण्या सोडविण्यात याव्या अशी मागणी करण्यात आली आहे.

सरदार सरोवर प्रकल्पग्रस्त बांधवांमध्ये प्रामुख्याने लाकडापासून निर्मित घरेच बांधण्यात येतात. या घरांना कुठल्याही प्रकारची क्षती पोहोचू नये, यासाठी शासनामार्फत घरपाया योजना राबविण्यात आली. परंतु काही विस्थापिक नागरिक या योजनेपासून वंचित राहिले आहेत. त्यात केशा वसावे, सेस:या पाडवी, खाअल्या वसो, फोत्या पाडवी, फुलजी पाडवी, खेमा पाडवी, सिमजी पाडवी, वाण्या पाडवी, रेशमाबाई वसावे व बायला वसावे यांचा समावेश आहे. या वंचित लाभाथ्र्याना घरपाया याजनेचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी देखील काथर्देदिगर येथील नागरिकांमार्फत करण्यात आली आहे.