शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

कभी लगते थे यहाँ मेले, आज थंडे पडे है चुल्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 12:42 IST

लोकमत न्यूज नेटवर्क धडगाव/मोलगी/वाण्याविहिर : सातपुड्याच्या दुर्गम भागात आदिवासी बांधवांच्या अर्थचक्राला वेग देणाऱ्या आमचूर उद्योगाला यंदा घरघर लागली आहे़ ...

लोकमत न्यूज नेटवर्कधडगाव/मोलगी/वाण्याविहिर : सातपुड्याच्या दुर्गम भागात आदिवासी बांधवांच्या अर्थचक्राला वेग देणाऱ्या आमचूर उद्योगाला यंदा घरघर लागली आहे़ जानेवारी ते फेब्रुवारी दरम्यान सतत झालेला अवकाळी पाऊस, गारठा आणि त्यानंतरचे वातावरणीय बदल यामुळे झाडांवर आंबेच न आल्याने यंदा हा उद्योग फूलू शकलेला नाही़ परिणामी अनेकांच्या घरांच्या चुली थंड पडल्या असून संपूर्ण वर्ष याचा परिणाम दिसून येणार आहे़गाव, पाडा व घर तेथे महू आणि आंब्याची झाडे ही सातपुड्याची ओळख आहे़ निसर्गादत्त असलेल्या या झाडांच्या साथीने जगणाºया आदिवासी बांधवांनी यातून रोजगार संधी उपलब्ध करुन घेतल्या आहेत़ गेल्या काही वर्षात सातपुड्यात लागवड करण्यात आलेल्या शेकडो आंब्यांच्या झाडांसोबत वनांमध्ये नैसर्गिकरित्या बहरलेल्या आम्रवृक्षांतून येणाºया कैºया आणि आंबे यांची विक्री करण्याचा उपक्रम सुरु आहे़ यातही कच्च्या कैरीपासून तयार होणाºया आमचूरला सर्वाधिक महत्त्व आले आहे़ मोलगी, धडगाव या दोन ठिकाणी बाजारपेठ निर्माण झाल्याने परराज्यातून येणारे व्यापारी उन्हाळ्यात हा माल खरेदी करुन घेऊन जात होते़ यामुळे मार्च ते मे या तीन महिन्यात घराघरो आमचूर तयार करण्यास वेग येत होता़ यंदा मात्र या उलट चित्र आहे़ जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यात वेळोवेळी पडलेला अवकाळी पाऊस आणि त्यानंतरचा गारठा यामुळे आंबा झाडांवर आलेल्या मोहोरवर परिणाम झाला आहे़ यात नव्याने येणाºया मोहोरला प्रामुख्याने उष्णताच न मिळाल्याने नुकसान वाढले होते़ ज्या झाडांवर मोहोर आला होता तोही वेळोवेळी कोसळलेल्या अवकाळी पावसात गळून गेला़ यातून यंदाच्या हंगामात सातपुड्यात पाच टक्केही आंबा उत्पादन आलेले नसल्याचे सांगण्यात येत आहे़सातपुड्याच्या दुर्गम व अती दुर्गम भागात धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यातील असंख्य झाडे आंब्याविनाच आहेत़ थोड्याफार प्रमाणात आलेले आंबे आमसूल तयार करण्यायोग्य नसल्याने दुर्गम भागातील आमचूर उद्योग पूर्णपणे थांबला आहे़ परिणामी केवळ आदिवासी बांधवच नव्हे तर आमचूर खरेदी करुन त्याची देशभर निर्यात करणारे व्यापारी आणि त्यांच्याकडे काम करणारे मजूर यांचे नुकसान झाले आहे़ यामुळे स्थलांतर करुन परतलेल्या शेकडो मजूरांच्या हाताला काम नसल्याने त्यांची आर्थिक स्थिती खालावली आहे़तीन महिन्यापासून लॉकडाऊन असल्याने इतर रोजगार बुडाले आहेत़ लॉकडाऊनमध्ये शासनाकडून धान्य किंवा इतर बाबींचा पुरवठा करण्यात येत असला तरी दैनंदिन व्यवहारांसाठी पैसाच उपलब्ध नसल्याची माहिती आहे़ मोलगी, धडगाव, खुंटामोडी, पिंपळखुटा यासह जागोजागी लागणारे आमचूर मोजणारे वजन काटेही नसल्याने दुर्गम भागातील चैतन्य हरवल्याचे जाणवत आहे़ स्थलांतरीत झालेले परत येत असल्याने त्यांना आमचूरमधून मिळणारा रोजगार नसल्याने चिंता वाढल्या आहेत़

४सावर ता़ तळोदा येथील अशोक वसावे यांच्यासोबत याबाबत चर्चा केली असता त्यांनी सांगितले की, आमच्या कुटूंबातील आबालवृद्ध तसेच नातेवाईकही या कामात चार महिने मदत करत होते़ यातून सर्वांनाच रोजगार मिळत होता़ शेतात, परसबागेतील आंबा झाडांसोबत नातलगांकडून भाडोत्री पद्धतीने आंबा झाडे घेऊन हा व्यवसाय फुलवत होता़ परंतू यंदा एका रुपयाचेही उत्पादन न आल्याने अडचणी वाढल्या आहेत़ किरकोळ स्वरुपातही आंबे नाहीत़ शासनाने याकडे गांभिर्याने लक्ष देवून सातपुड्याच्या दऱ्याखोºयातील आमचूर व आंबा उत्पादकांना मदत करण्याची गरज आहे़अशोक वसावे यांच्या कुटूंबाप्रमाणेच तळोदा, अक्कलकुवा व धडगाव तालुक्याच्या विविध भागातील कुटूंबांची सध्या अशीच गत आहे़ हाती काहीच नसल्याने कुटूंबाचा उदरनिर्वाह करावा कसा, असा प्रश्न उपस्थित होत आहे़

गेल्या वर्षी आमचूरचे दर हे प्रतिकिलो २०० रुपयांपर्यंत गेले होते़ १०० ते २०० रुपये प्रतिकिलो या दराने हे आमचूर खरेदी करण्यात येत होती़ तीन वर्गवारीनुसार आमचूरची खरेदी व्यापारी करत होते़ यंदा या दरांमध्ये वाढ होण्याचे संकेत होते़ परंतू हंगामच नसल्याने कोणत्याही प्रकारचा रोजगार मिळालेला नाही़ चार महिने चालणाऱ्या या व्यवसायातून एका कुटंूबाला किमान ५० हजार ते १ लाख रुपयांपर्यंतची रक्कम मिळत होती़ साधारण १० क्विंटल किंवा त्यापेक्षा अधिक आमसूलाची निर्मिती संपूर्ण कुटंूब करत होते़ यातून वार्षिक उत्सव, घरात मृत्यू झालेल्यांचे उत्तरकार्य, विवाह सोहळे यासोबत इतर घरगुती कार्यक्रम केले जात होते़ रोजगारच न मिळाल्याने या सर्व उपक्रमांना यंदा ब्रेक लागला असल्याची माहिती देण्यात येत आहे़

धडगाव तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये कैऱ्यांपासून आमचूर तयार करण्याच्या उद्योगासोबत गावठी आंबा विक्रीचाही व्यवसाय तेजीत होता़ सेंद्रीय पद्धतीने नैसर्गिक आंबा त्याच पद्धतीने पिकवून त्याची विक्री केली जात होती़ गुजरातसह नंदुरबार जिल्ह्याच्या शहरी भागात लोकप्रिय असलेला आंबा यंदा मिळत नसल्याने खवय्यांची निराशा झाली आहे़ धडगाव तालुक्याच्या विविध भागात गावठी सोबतच केशर आणि कलमी आंब्यांच्या बागा आहेत़ या बांगाही ओस पडल्या आहेत़ सोबत घरोघरी आमचूर बनवण्याचे काम नसल्याने घरे बंदीस्त होऊन शुकशुकाट पसरला आहे़