शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
2
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
3
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
4
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
5
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
6
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
7
‘स्थानिक’ निवडणुकीत दोस्त दोस्त ना रहा! महायुती अन् महाविकास आघाडी फुटणार
8
चांदी दीड लाखांवर, ९ महिन्यांत ७५% लाभ! का वाढतेय चांदीची किंमत?
9
संपादकीय : संवेदनशीलतेचा पंचनामा! आता केवळ आर्थिक नव्हे, सरकारी मनाची कसोटी लागणार
10
आता विद्यार्थी ऑनलाइनही शाळेमध्ये दिसणार हजर; यू-डायस प्रणालीत प्रवेश नोंदीसाठी १७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
11
राजेंद्र लोढांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; फॉरेन्सिक ऑडिट सुरू
12
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
13
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
14
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
15
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
16
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
17
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
18
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
19
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
20
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट

कोरोनाच्या दुस-या लाटेत केवळ महिनाभरात ५५ जणांनी गमावले प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:31 IST

नंदुरबार : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही आता १५ हजार झाली आहे. यातील २७० जणांचा मृत्यू झाला आहे. दर ...

नंदुरबार : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही आता १५ हजार झाली आहे. यातील २७० जणांचा मृत्यू झाला आहे. दर दिवशी मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याने जिल्ह्यात मृत्यूदर हा दोन टक्क्यांपर्यंत जावून पाेहोचला आहे. जिल्ह्यातील या मृत्यूंचा आढावा घेतला असता, मार्च महिन्यात महिन्यात ५५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

गेल्या एक महिन्यात मयत झालेल्यांचे वर्गीकरण केल्यानंतर यातील सर्वाधिक मृत्यू हे पन्नाशी ओलांडलेल्या नागरीकांचे झाले असल्याचे समोर आले आहे. ज्येष्ठ नागरीकांच्या मृत्यूची संख्याही वाढली असल्याने जिल्ह्यातील नागरीकांच्या चिंतांमध्ये वाढ झाली आहे. दरम्यान जिल्ह्यात गेल्या एक महिन्यात रुग्णांची संख्या पाच हजाराने वाढल्याचे शासकीय आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे. दुसऱ्या लाटेत मृत्यू होणा-या रुग्णांच्या वयाचे अंतर दिवसेंदिव कमी होत असून चाळीशीत असलेल्यांचेही मृत्यू झाल्याचे आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

जिल्ह्यात मार्च महिन्यात २६ ते ५० वयोगटातील आठ जणांचा मृत्यू झाला आहे. यात नंदुरबार येथील सर्वाधिक ५ तर नवापूर, शहादा, तळोदा येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. ५१ ते ७५ या गटात सर्वाधिक ३५ जणांचे मृत्यू झाले आहेत. यात नंदुरबारात सर्वाधिक १८, नवापूरात २, शहादा ११ तर तळोदा येथील चाैघांचा समावेश आहे. ७६ ते पुढील वयाच्या एकूण १२ जणांचा मार्च महिन्यात मृत्यू झाला. यात सर्वाधिक सात जण हे नंदुरबार, १ नवापूर, तीन शहादा तर एक तळोदा येथील आहे. नंदुरबारात महिनाभरात सर्वाधिक ३० जणांचा मृत्यू झाला.

पन्नाशीतील रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. नागरीकांनी कोविडच्या तपासण्या करुन घेत तातडीने उपचार घेतले पाहिजेत. उपचारांना उशिर न करता, काय लक्षणे आहेत हे आपल्या डाॅक्टरसोबत चर्चा करुन घेतल्यास पुढील धोका टळतो.

-डाॅ. के.डी.सातपुते,

अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक.