शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
3
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
4
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
5
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
6
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
7
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
8
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
9
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
10
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
11
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
12
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
13
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
14
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
15
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
16
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
17
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
18
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
19
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
20
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
Daily Top 2Weekly Top 5

अवघ्या आठ दिवसात रस्ता गेला खड्ड्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2020 13:52 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वाण्याविहीर : शेवाळी ते नेत्रंग या राष्ट्रीय महामार्गावर तळोदा ते अक्कलकुवा दरम्यान खड्ड्यांची दुरूस्ती करून आठ ...

लोकमत न्यूज नेटवर्कवाण्याविहीर : शेवाळी ते नेत्रंग या राष्ट्रीय महामार्गावर तळोदा ते अक्कलकुवा दरम्यान खड्ड्यांची दुरूस्ती करून आठ दहा दिवस होत नाही तोच पुन्हा याच ठिकाणी मोठ-मोठे खड्डे पडून वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या रस्त्याच्या दुरूस्तीचे काम निकृष्ठ दर्जाचे करण्यात आल्याचे बोलले जात आहे.शेवाळी ते नेत्रंग राष्ट्रीय महामार्गावरील तळोदा वळण रस्त्यापासून ते सोमावल फाटा, कुकरमुंडा फाटा, नळगव्हाण फाटा, शिर्वेफाटा, मोदलपाडा, सतोना, रामपूर, वाण्याविहीर फाटा, पिंपरीपाडा फाटा, राजमोई, अक्कलकुवा, सोरापाडा फाटा दरम्यान रस्ता दुरूस्ती करून १० ते १२ दिवस होत नाही तोच जागोजागी खडी उखडून मोठ-मोठ्या खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे.दरम्यान काही ठिकाणी खड्डे व्यवस्थित भरण्यात आले नसल्याने या मार्गावरील अवजड वाहतूक लॉकडाऊन व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद आहे. जेमतेम वाहने सुरू असताना अशी स्थिती आहे तर या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू राहिली असती तर दुरूस्ती केली किवा नाही हे कळालेच नसते. वास्तविक या परिसरात सद्य:स्थितीपर्यंत दमदार पाऊस झाला नाही. त्यामुळे हा रस्ता दमदार पावसामुळे पुन्हा खराब झाला हे कारण सांगता आले असते. परंतु मुसळधार पाऊस नसताना १० दिवसात रस्त्याची ‘जैसे थे’ स्थिती झाल्याने वाहनधारकांना अपघातास कारणीभूत ठरू पाहात आहेत. त्यामुळे संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देवनू तळोदा वळण रस्त्यापासून ते सोमावल फाटा, नळगव्हाण फाटा, शिर्वे फाटा, मोदलपाडा, सतोना, रामपूर फाटा, वाण्याविहीर फाटा, पिंपरीपाडा फाटा, राजमोई फाटा, मोलगी नाका, कृषी कार्यालयासमोर, पोलीस उपविभागीय कार्यालयासमोरील, सोरापाडा पुलावरील, जामली नर्सरी दरम्यानच्या रस्त्यावर नव्याने डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी वाहनधारकांनी केली.