शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
4
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
5
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
6
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
7
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
8
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
9
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
10
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
11
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
12
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
13
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
14
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
15
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
16
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
17
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
18
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
19
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
20
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान

नंदुरबारात जगदंबा देवी अवतार मिरवणूक उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2019 19:27 IST

नंदुरबार : होलिकोत्सवातील श्री जगदंबा देवी अवताराची मिरवणूक सोमवारी सायंकाळी उत्साहात पार पडली. दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. ...

नंदुरबार : होलिकोत्सवातील श्री जगदंबा देवी अवताराची मिरवणूक सोमवारी सायंकाळी उत्साहात पार पडली. दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. रात्री उशीरा गणेश पंचायतन मंदीरात मिरवणुकीची सांगता करण्यात आली.नंदुरबारातील होळी उत्सवाची परंपरा दोन शतकांपूर्वीची आहे. बालाजी संस्थानचा होळी उत्सव म्हणून त्याची ओळख होती. पाच दिवसांचा होळी उत्सव आगळावेगळा तितकाच ऐतिहासिक परंपरा जपणारादेखील होता. आता या उत्सवात कालानुरूप बदल झाला असला तरी त्याचा मूळ गाभा कायम आहे.काही वर्षांपासून मांगल्य सेवा संस्थेतर्फे हा उत्सव साजरा केला जातो. हितेश उपासणी हे गेल्या काही वर्षांपासून देवीचा अवतार धारण करीत आहेत.ग्रामजोशी यांच्या घरी देवी अवतार धारण करणाऱ्या व्यक्तीस सायंकाळी देवीची महावस्त्रे नेसविली गेली. पारंपरिक दागदागिने, पाटल्या, बांगड्या, तोडे, वाकी, पैंजण व तोरड्या आदी दागिने चढविण्यात आले. हे सर्व झाल्यावर देवीचा शृंगारित मुखवटा बांधण्यात आला. कंबरेला वाघाचे कडे, हातात दोन तलवारी, पायात घुंगरू धारण केल्यावर ‘या देवी सर्वभूतेषु... नमतस्यै नमतस्यै नमतस्यै नमो नम’ अशा ब्रह्मवृंदांनी केलेल्या सप्तशतीच्या मंत्रघोषात देवीला तयार करण्यात आली.देवी अवतार बरोबरच लाल वस्त्र परिधान केलेला हातात जळते भळांदे घेतलेला देवीचा भोप्या देवीबरोबर नृत्य करीत होता. देवीची प्रथम पूजा करण्याचा मान ग्रामजोशी घराण्याचा असतो.सायंकाळी सात वाजता सुरू झालेली मिरवणुक उशीरापर्यंत चालली. या दरम्यान शिवाजी चौकाच्या होळीला प्रदक्षिणा घालण्यात आली. तेथून जवळच असलेल्या होळी चौकातील स्टेजवर काहीकाळ देवीला विराजमान करण्यात आले. त्यानंतर जळका बाजार पोस्ट गल्ली, टॉवर समोर, बाजाराचा मुख्य चौक, टिळकपथ, कालाणी यांचे घर, शिरिष मेहता रोडवरील जनक आभूषण जवळ, सराफ बाजारातील फडके चौक, गुळवाडी, बालाजी वाडा, सोनारखुंट, संकट मोचन मारुती चौक, विठ्ठल मंदीर चौैक या ठिकाणी देवीने होळी प्रदक्षिणा करून दर्शन दिले. तेथून गणेश पंचायतन मंदीरात जावून तेथे विधीवत विसर्जन करण्यात आले.यशस्वीतेसाठी मांगल्य सेवा संस्थेचे पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.पूर्वी हा उत्सव पाच दिवस चालत होता. बालाजी संस्थानतर्फे बालाजी वाड्यात होळीपासून पंचमीपर्यंत रात्री विविध कार्यक्रम होत होते. ते कार्यक्रम पहाण्यासाठी शहरासह ग्रामिण भागातील जनता येत होती. आता बालाजी संस्थानतर्फे केवळ देवीच्या अवतारांच्या मुखवट्यांचे पूजन करून ते दर्शनासाठी ठेवले जात असतात. त्यामुळे मांगल्य सेवा संस्थेतर्फे आता हा उत्सव साजरा केला जात आहे.