शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐन पौर्णिमेलाच चंद्र झाकोळला; चंद्रग्रहणाला सुरुवात, रात्री ११ वाजता लाल रंगात दिसणार...
2
टोयोटाकडून मोठी घोषणा! फॉर्च्युनरची ३.४९ लाखांनी किंमत तुटली, क्रिस्टा तर मार्केट खाणार...
3
एकनाथ शिंदेंनी पाडले अजित पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार; महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षच फोडला, उद्या प्रवेश
4
Lalbaugcha Raja Visarjan Video: चंद्रग्रहणाला काही मिनिटे शिल्लक असताना...; रात्री ९ वाजता लालबागच्या राजाचे विसर्जन
5
नूतनीकरण ऑक्टोबरमध्ये...! इन्शुरन्स कंपन्या आतापासूनच १८ टक्के जीएसटीवाला हेल्थ प्रिमिअम पाठवू लागल्या
6
'पीएम मोदी देशाचे शत्रू ', ट्रम्प टॅरिफचा उल्लेख करत मल्लिकार्जुन खरगेंचे टीकास्त्र
7
ठाणे : जिल्हा न्यायाधीशांच्या शासकीय घरातील स्लॅब कोसळला; न्यायाधीशांची पीडब्ल्यूडीविरोधात पोलिसांत तक्रार
8
गुंडगिरीचा कळस! माजी सरपंचावर जीवघेणा हल्ला; लाेखंडी राॅड, स्टंपने २२ मिनिटे मारहाण
9
इस्रायलने अचानक एअरस्पेस बंद केली; नेमके काय घडतेय... गाझा पट्टी की आणखी काही...
10
लव्ह स्टोरीचे बिंग फुटण्याची भीती; पोलिस भरती अकॅडमीच्या संचालकांनेच केले विद्यार्थ्याचे अपहरण
11
लहान मुलांना सनरुफ उघडून देताय? महिंद्रा ३XO चा व्हिडीओ पहाल कर, थरकाप उडेल...
12
ओबीसी आणि मराठा आरक्षणावर राज्य सरकार ठाम; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची स्पष्टोक्ती
13
“मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचे नुकसान करतायत, स्वतःचे महत्त्व वाढावे...”; कुणी केली टीका?
14
धुळे हळहळले! रील स्टार शुभम सिंघवी याच्या दुचाकीला अपघात, जागेवरच मृत्यू
15
अवघ्या १५०० रुपयांत बनावट आधारकार्ड, दोन हजार लोकांना 'त्यानं' बनवलं मूर्ख! पोलिसांनी कसं पकडलं?
16
नऊवारी, फेटे अन् ढोल ताशे! जर्मनीच्या ड्युसलडॉर्फमध्ये उत्साहात साजरा झाला गणेशोत्सव!
17
भंडाऱ्याची उधळण अन पुष्पवृष्टी, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला दिमाखदार मिरवणुकीने निरोप!
18
दहशतवाद्यांना पाकिस्तानची साथ; भारताने पाडलेल्या लष्कर-ए-तैयबाच्या मुख्यालयाचे बांधकाम पुन्हा सुरू
19
ह्युंदाईचे जीएसटी कपातीचे दर आले! नियॉस ७३,८०८, ऑरा ७८...; पहा कितीने कमी झाली क्रेटा...
20
‘हा तर मणिपूरच्या लोकांचा अपमान आहे’, PM मोदींच्या दौऱ्यावर काँग्रेसची बोचरी टीका

या अंगारकीला तरी नवस फेडता येईल का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:19 IST

जयनगर : मार्च २०२० पासूनच्या कोरोना महामारीमुळे मध्यंतरीचा तीन-चार महिन्यांचा कालावधी वगळल्यास अजूनही सर्व मंदिरे बंदच आहेत. आता कोरोनाच्या ...

जयनगर : मार्च २०२० पासूनच्या कोरोना महामारीमुळे मध्यंतरीचा तीन-चार महिन्यांचा कालावधी वगळल्यास अजूनही सर्व मंदिरे बंदच आहेत. आता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या धोक्यामुळे शासनाने मंदिर उघडण्याबाबत अजूनही काहीही निर्णय न दिल्यामुळे २७ जुलै मंगळवारी अंगारकी चतुर्थीला तरी नवस फेडता येणार का? याविषयी भक्तांच्या मनामध्ये साशंकता असून, धार्मिक कार्यक्रमांवर पोट भरणाऱ्या लोकांचे हाल झाले असून, सर्व आर्थिक उलाढाल ठप्प झाली आहे.

कोरोना महामारीची पहिली लाट ओसरल्यानंतर शासनाने नोव्हेंबर २०२० मध्ये निर्बंध आखून देत मंदिरे उघडण्याचा निर्णय दिला होता. मात्र चार महिन्यांच्या कालावधीनंतर मार्च महिन्यात पुन्हा एकदा कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेने डोके वर काढल्यामुळे शासनाला नाईलाजास्तव सर्व मंदिरे पुन्हा बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागला. तेव्हापासून मंदिरे बंदच असून, सर्व सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांवरील बंदी कायम आहे. त्यामुळे जयनगरसह परिसरातील तसेच मध्य प्रदेशवरून येणारे सर्व भाविक येणाऱ्या अंगारकी चतुर्थीला तरी जयनगर येथील मंदिरात आपल्याला नवस फेडता येईल का? अशी शंका भक्तांच्या मनामध्ये आहे.

यावर्षी मार्च महिन्यात आलेल्या दुसऱ्या लाटेमुळे वर्षातील पहिल्या अंगारकी चतुर्थीला जिल्हा प्रशासनाने यात्रा रद्दचे आदेश दिल्यामुळे भक्तांना जयनगर येथील हेरंब गणेश मंदिरात व जिल्ह्यातील इतर गणपती मंदिरात नवस फेडता आला नव्हता. वर्षातून केवळ एक किंवा दोन अंगारकी चतुर्थीचा योग येतो. मात्र, यावर्षी आता दुसऱ्या अंगारकी चतुर्थीचा योग आला आहे. योगायोगाने यावर्षी दोन अंगारकी चतुर्थीचा योग असला, तरी भक्तांना कोरोनाच्या या महामारीमुळे मंदिरे बंद असल्यामुळे हिरमोड सहन करावा लागत आहे. तसेच कोरोना काळात जयनगरसह परिसरातील अनेक गावांमध्ये मोठ्या संख्येने विवाह सोहळे पार पडले आहेत. हा सोहळा पार पडल्यानंतर जवळजवळ सर्वच नवदाम्पत्य जयनगर येथील हेरंब गणेश मंदिरात सत्यनारायणाची पूजा ठेवत असतात. मात्र नवदांपत्यांनाही मंदिरात सत्यनारायण करता न आल्याने घरीच साध्या पद्धतीने सत्यनारायण करावा लागला.

पुढील महिन्यात ९ ऑगस्टपासून श्रावण महिना चालू होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील तसेच मध्य प्रदेशातील भाविक मोठ्या प्रमाणावर जयनगर येथे श्रावण महिन्यात दर्शनासाठी येत असतात. यामध्ये अनेक भक्तगण, नवदाम्पत्य दर्शनासाठी, तर अनेकजण नवस फेडण्यासाठी येत असतात. मात्र, प्रशासनाने मंदिरे खुले करण्याबाबत अजून कुठलाही निर्णय न दिल्यामुळे सलग दुसऱ्या अंगारकी चतुर्थीला व श्रावण महिन्यात जयनगरसह जिल्ह्यातील विविध मंदिरांत दर्शन व नवस फेडणार्‍या भाविकांसह धार्मिक कार्यक्रमांवर उदरनिर्वाह करणाऱ्या व्यावसायिकांचा हिरमोड होत असल्याचे दिसून येत आहे. मंदिरे बंद असल्यामुळे धार्मिक कार्यक्रमांत अभिषेक, पूजन, प्रसादाचे साहित्य, खेळणीची दुकाने, नाश्त्याची दुकाने, फूल विक्रेते, नारळ विक्रेते यासारख्या व्यावसायिकांवर खूप मोठे आर्थिक संकट निर्माण झाले आहे. अनेक महिन्यांपासून मंदिरे बंद असल्यामुळे दरवर्षी जयनगरसह परिसरातील अनेक शेतकरी फूलहारासाठी लागणारी झेंडूची फुले लावत असतात. मात्र, कोरोना काळात मंदिरांबाबतची स्थिती पाहता, शेतकऱ्यांनी फूल लागवडीकडे दुर्लक्ष केले आहे.

जयनगर येथील हेरंब गणेश मंदिर अनेक महिन्यांपासून बंद असल्यामुळे फूल विक्रेते, नारळ विक्री व्यवसायावर परिणाम झाला आहे. जिल्ह्यासह मध्यप्रदेशातील भाविक दर्शनासाठी येत नसल्यामुळे रिक्षाचालकांवरही याचा परिणाम दिसून येत आहे. येणाऱ्या अंगारकी चतुर्थीला तसेच श्रावण महिन्यात मंदिरे उघडतील की नाही? याबाबत अनिश्चितता आहे.

- किशोर दंगल माळी, सदस्य, हेरंब गणेश ट्रस्ट, जयनगर.