शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
3
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
4
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
5
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
6
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
7
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
8
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
9
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
10
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
11
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
12
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
13
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
14
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
15
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
16
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
17
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
18
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
19
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
20
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
Daily Top 2Weekly Top 5

या अंगारकीला तरी नवस फेडता येईल का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:19 IST

जयनगर : मार्च २०२० पासूनच्या कोरोना महामारीमुळे मध्यंतरीचा तीन-चार महिन्यांचा कालावधी वगळल्यास अजूनही सर्व मंदिरे बंदच आहेत. आता कोरोनाच्या ...

जयनगर : मार्च २०२० पासूनच्या कोरोना महामारीमुळे मध्यंतरीचा तीन-चार महिन्यांचा कालावधी वगळल्यास अजूनही सर्व मंदिरे बंदच आहेत. आता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या धोक्यामुळे शासनाने मंदिर उघडण्याबाबत अजूनही काहीही निर्णय न दिल्यामुळे २७ जुलै मंगळवारी अंगारकी चतुर्थीला तरी नवस फेडता येणार का? याविषयी भक्तांच्या मनामध्ये साशंकता असून, धार्मिक कार्यक्रमांवर पोट भरणाऱ्या लोकांचे हाल झाले असून, सर्व आर्थिक उलाढाल ठप्प झाली आहे.

कोरोना महामारीची पहिली लाट ओसरल्यानंतर शासनाने नोव्हेंबर २०२० मध्ये निर्बंध आखून देत मंदिरे उघडण्याचा निर्णय दिला होता. मात्र चार महिन्यांच्या कालावधीनंतर मार्च महिन्यात पुन्हा एकदा कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेने डोके वर काढल्यामुळे शासनाला नाईलाजास्तव सर्व मंदिरे पुन्हा बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागला. तेव्हापासून मंदिरे बंदच असून, सर्व सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांवरील बंदी कायम आहे. त्यामुळे जयनगरसह परिसरातील तसेच मध्य प्रदेशवरून येणारे सर्व भाविक येणाऱ्या अंगारकी चतुर्थीला तरी जयनगर येथील मंदिरात आपल्याला नवस फेडता येईल का? अशी शंका भक्तांच्या मनामध्ये आहे.

यावर्षी मार्च महिन्यात आलेल्या दुसऱ्या लाटेमुळे वर्षातील पहिल्या अंगारकी चतुर्थीला जिल्हा प्रशासनाने यात्रा रद्दचे आदेश दिल्यामुळे भक्तांना जयनगर येथील हेरंब गणेश मंदिरात व जिल्ह्यातील इतर गणपती मंदिरात नवस फेडता आला नव्हता. वर्षातून केवळ एक किंवा दोन अंगारकी चतुर्थीचा योग येतो. मात्र, यावर्षी आता दुसऱ्या अंगारकी चतुर्थीचा योग आला आहे. योगायोगाने यावर्षी दोन अंगारकी चतुर्थीचा योग असला, तरी भक्तांना कोरोनाच्या या महामारीमुळे मंदिरे बंद असल्यामुळे हिरमोड सहन करावा लागत आहे. तसेच कोरोना काळात जयनगरसह परिसरातील अनेक गावांमध्ये मोठ्या संख्येने विवाह सोहळे पार पडले आहेत. हा सोहळा पार पडल्यानंतर जवळजवळ सर्वच नवदाम्पत्य जयनगर येथील हेरंब गणेश मंदिरात सत्यनारायणाची पूजा ठेवत असतात. मात्र नवदांपत्यांनाही मंदिरात सत्यनारायण करता न आल्याने घरीच साध्या पद्धतीने सत्यनारायण करावा लागला.

पुढील महिन्यात ९ ऑगस्टपासून श्रावण महिना चालू होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील तसेच मध्य प्रदेशातील भाविक मोठ्या प्रमाणावर जयनगर येथे श्रावण महिन्यात दर्शनासाठी येत असतात. यामध्ये अनेक भक्तगण, नवदाम्पत्य दर्शनासाठी, तर अनेकजण नवस फेडण्यासाठी येत असतात. मात्र, प्रशासनाने मंदिरे खुले करण्याबाबत अजून कुठलाही निर्णय न दिल्यामुळे सलग दुसऱ्या अंगारकी चतुर्थीला व श्रावण महिन्यात जयनगरसह जिल्ह्यातील विविध मंदिरांत दर्शन व नवस फेडणार्‍या भाविकांसह धार्मिक कार्यक्रमांवर उदरनिर्वाह करणाऱ्या व्यावसायिकांचा हिरमोड होत असल्याचे दिसून येत आहे. मंदिरे बंद असल्यामुळे धार्मिक कार्यक्रमांत अभिषेक, पूजन, प्रसादाचे साहित्य, खेळणीची दुकाने, नाश्त्याची दुकाने, फूल विक्रेते, नारळ विक्रेते यासारख्या व्यावसायिकांवर खूप मोठे आर्थिक संकट निर्माण झाले आहे. अनेक महिन्यांपासून मंदिरे बंद असल्यामुळे दरवर्षी जयनगरसह परिसरातील अनेक शेतकरी फूलहारासाठी लागणारी झेंडूची फुले लावत असतात. मात्र, कोरोना काळात मंदिरांबाबतची स्थिती पाहता, शेतकऱ्यांनी फूल लागवडीकडे दुर्लक्ष केले आहे.

जयनगर येथील हेरंब गणेश मंदिर अनेक महिन्यांपासून बंद असल्यामुळे फूल विक्रेते, नारळ विक्री व्यवसायावर परिणाम झाला आहे. जिल्ह्यासह मध्यप्रदेशातील भाविक दर्शनासाठी येत नसल्यामुळे रिक्षाचालकांवरही याचा परिणाम दिसून येत आहे. येणाऱ्या अंगारकी चतुर्थीला तसेच श्रावण महिन्यात मंदिरे उघडतील की नाही? याबाबत अनिश्चितता आहे.

- किशोर दंगल माळी, सदस्य, हेरंब गणेश ट्रस्ट, जयनगर.