शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
3
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
4
"हवे ते निर्बंध लादून दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना बक्षीस देता, दुटप्पीपणा चालणार नाही"; PM मोदींचा इशारा
5
Air India Plane Crash: 'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग', माजी वैमानिकाने दोन मुद्द्यांवर ठेवलं बोट
6
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
7
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
8
सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार 'धडाम'; Sensex २६९ अंकांच्या घसरणीसह उघडला, 'या' वृत्तानं दिलं टेन्शन
9
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
10
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
11
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
12
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
13
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
14
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
15
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
16
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
17
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
18
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
19
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
20
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!

पदरमोड करून रेमडेसिविर गरीब रुग्णांना वाटप केले हा गुन्हा ठरतो का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार: कोरोनामुळे प्रशासन, जनता हवालदिल झाली आहे. परिस्थिती आवाक्याबाहेर गेल्याने खान्देशच्या जनतेच्या हितासाठी प्राण वाचवण्यासाठी स्वतःचा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नंदुरबार: कोरोनामुळे प्रशासन, जनता हवालदिल झाली आहे. परिस्थिती आवाक्याबाहेर गेल्याने खान्देशच्या जनतेच्या हितासाठी प्राण वाचवण्यासाठी स्वतःचा पैसा खर्च करून कमी दरात रुग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शन पुरवले. मंत्री नवाब मलीक यांना हा गुन्हा वाटत असेल तर आम्ही गुन्हा केला फक्त आणि फक्त जनतेच्या हितासाठीच आणि पुन्हा तो करणार असे प्रतिउत्तर हिरा प्रतिष्ठानचे संचालक तथा माजी आमदार शिरिष चौधरी यांनी पत्रकार परिषदेत दिले.

मंत्री नवाब मलिक यांनी नंदुरबार हिरा ग्रुप मार्फत रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार होत असून हॉटेल हिरा पॅलेस मध्ये इंजेक्शनचा मोठा साठा असल्याचा आरोप मंगळवारी केला. या आरोपांमुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर माजी आमदार शिरिष चौधरी यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यांनी सांगितले की, गेल्या वर्षापासून कोरोनामुळे राज्यात, जिल्ह्यात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. नंदुरबार जिल्ह्यात अपुऱ्या आरोग्य सुविधांचा अभावाने परिस्थिती बिकट झाली आहे. केवळ नंदुरबारच नाही तर खान्देशा अनेक कुटुंब उध्वस्त झाले आहे. काही घरातील कर्ते पुरुष गेले आहे आणि काही जात आहे. अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

परदेशात निर्यात होणारे रेमडेसिविर इंजेक्शन आपल्या भागातील लोकांचे प्राण वाचवण्यासाठी सेवा म्हणून उपलब्ध करून दिले. हे इंजेक्शन स्वतः तोटा सहन करत साडे आठशे, नऊशे, पंधराशे रुपये अश्या भावाने दिले. बाजारभावात त्याचे मूल्य अधिक असताना हिरा ग्रुपने स्वतःचे पंचवीस ते तीस लाखांचा खर्च करून पदरमोड केले. त्यामुळे काळा बाजारचा प्रश्नच उद्भवत नाही. त्याला जनता, प्रशासन साक्षीला आहे.त्यामुळे आम्ही शासनाचा कर बुडवला नाही किंवा फसवणूक केली नाही. त्यामुळे मंत्र्यांनी केलेले आरोप बिनबुडाचे व राजकीय हेतूने प्रेरित आहे. ही वेळ राजकारण करण्याची नाही तर रूग्णांची सेवा करण्याची आहे.

अमळनेरचे आमदार अनिल पाटील यांनी खोटी माहिती पुरवण्याचा आरोप करीत मंत्री नवाब मलीक यांनी त्याची शहनिशा न करता आरोप केल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी पालिकेतील विरोधी गटनेते चारूदत्त कळवणकर उपस्थित होते.