शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
2
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
3
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
4
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
5
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
6
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
7
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
8
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
9
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
10
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
11
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
12
Surya Grahan 2025: ग्रहण सूर्याला मात्र 'या' राशींचे भाग्य येईल फळाला; १०० वर्षांनी जुळून आलाय अपूर्व योग!
13
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
14
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
15
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!
16
Gold Silver Price 18 September: अचानक का कमी होताहेत सोन्या-चांदीचे दर; पुढेही सुरू राहणार का ही घसरण?
17
१ महिना सूर्य-शनि समोरासमोर: ८ राशींना विशेष लाभ, भरभरून पद-पैसा; शुभ-कल्याण, सुखाचा काळ!
18
ऑनलाइन पद्धतीने मतदाराचे नाव मतदार यादीतून हटवता येते का? निवडणूक आयोग म्हणाले...
19
११ वर्षांनी लहान मुलाच्या प्रेमात पडली २८ वर्षांची तरुणी; लग्नाला नकार मिळाल्यावर मागू लागली ५० लाख!
20
Navi Mumbai: 'कपडे काढ नाहीतर तुझ्या भावालाच संपवेन'; 12 वर्षाच्या मुलीवर घरी नेऊन केला बलात्कार, नवी मुंबईतील घटना

तळोदा तालुक्यातील ६७ ग्रामपंचायतींच्या थकीत बिलांचा प्रश्न मार्गी लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:22 IST

तळोदा : राज्य शासनाने १५ वा वित्त आयोगाच्या निधीतून ग्रामपंचायतींना आपल्याकडील थकीत वीज बिलाची रक्कम देण्याचे आदेश लागू केल्यामुळे ...

तळोदा : राज्य शासनाने १५ वा वित्त आयोगाच्या निधीतून ग्रामपंचायतींना आपल्याकडील थकीत वीज बिलाची रक्कम देण्याचे आदेश लागू केल्यामुळे तळोदा तालुक्यातील ६७ ग्रामपंचायतींमधील ग्रामीण पाणी पुरवठ्याच्या साधारण सव्वा तीन कोटीच्या थकीत बिलांचा प्रश्न मार्गी लागणार आहे. त्यासाठी आता पंचायतींनी सुयोग्य नियोजन करण्याची आवश्यकता आहे.

ग्रामीण भागातील खेड्यांमधील पथदिवे व पाणी पुरवठ्याच्या वीज पुरवठ्यासाठी ग्रामपंचायत वीज वितरण कंपनीचे वीज बिल अदा करत असते. हे बिल ग्रामपंचायत ग्रामस्थांकडील घरपट्टी, पाणीपट्टी वसुलीतून भरत असते. परंतु ग्रामपंचायतीच्या महसुली करारास ग्रामस्थांकडून पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नसल्याने ग्रामपंचायतीदेखील वीज वितरण कंपनीचे वीज बिल भरण्यास असमर्थ ठरत असत. साहजिकच यामुळे वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना वाढत्या थकीत वीज बिलापोटी नाईलाजास्तव वीजपुरवठा खंडित करावा लागत असतो. परिणामी पाणी पुरवठ्यावर देखील त्याचा परिणाम होत असतो. खंडित पाणीपुरवठ्याने गावकरी आरडाओरड करतात, तेव्हा ग्रामपंचायत काही रक्कम वीज वितरणकडे भरून पुन्हा गावाचा पाणी पुरवठा सुरळीत करते. मात्र त्यानंतरही थकलेल्या बिलासाठी वीजपुरवठा खंडित केला जात असतोच. साहजिकच ग्रामीण भागातील पाणीपुरवठ्याच्या वीज बिलासाठी शासनाच्या अनुदानातून ग्रामपंचायतींना तरतुदीची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी ग्रामीण जनतेकडून शासनाकडे सातत्याने केली जात होती.

याप्रकरणी स्थानिक लोकप्रतिनिधींनी सुध्दा शासनाकडे पाठपुरावा केला होता. या पार्श्वभूमीवर शासनाच्या ग्राम विकास विभागाने बुधवारी तशा आशयाचा आदेश जारी केला आहे. त्यात म्हटले आहे की, ग्रामपंचायतींनी आपल्याकडील शासनाने दिलेल्या १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून ग्रामीण पाणीपुरवठा व पथदिव्यांच्या वीज वितरण कंपनीच्या थकीत वीज बिलापोटी रक्कम वापरता येईल. साहजिकच यामुळे तळोदा तालुक्यातील ६७ ग्रामपंचायतींनादेखील शासनाच्या या आदेशाचा फायदा होणार आहे. कारण या ग्रामपंचायतींमधील ४५ गावांमधील ग्रामीण पाणीपुरवठ्याचा वीजपुरवठा सुरळीत होणार आहे. कारण त्यांच्याकडे गेल्या अनेक वर्षांपासूनची साधारण तीन कोटी २० लाखांची वीज बिले थकली आहेत. त्यामुळे आता ग्रामपंचायतींना ही थकलेली बिले भरता येणार आहेत. परंतु ग्रामपंचायतींच्या प्रशासनाने सुयोग्य नियोजन करण्याची मागणी ग्रामीण जनतेने केली आहे.

वीज कंपनीचा तगादा थांबणार

ग्रामीण भागातील ग्रामपंचायतींकडील थकीत वीज बिलासाठी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना सातत्याने ग्रामपंचायत प्रशासान व अधिकाऱ्यांकडे तगादा लावावा लागत होता. काही वेळेस लोकप्रतिनिधी दबाव आणत असल्यामुळे नाईलाजास्तव कारवाई करावी लागत नसे. शिवाय कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून वसुलीच्या इष्टांक देण्यात येतो. त्याचीही वित्त आयोगाच्या निधीतून पूर्तता करण्यात यश येणार आहे. साहजिकच शासनाच्या सदर आदेशाबाबत अधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

ग्रामपंचायतीकडील वीज बिले अदा करण्यासाठी आता शासनाच्या ग्राम विकास विभागाने १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून खर्च करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे तळोदा तालुक्यातील ज्या ग्रामपंचायतीकडे वीज बिले थकली आहेत, त्यांनी तातडीने बिले भरून कंपनीला सहकार्य करावे.

- प्रदीप चहांदे, उपविभागीय अभियंता, वीज वितरण कंपनी कार्यालय, तळोदा.

पुरेशा महसुलाअभावी ग्रामपंचायतींना वीज वितरण कंपनीचे वीज बिल भरताना मोठ्या अडचणी निर्माण होत असतात. थकीत बिलामुळे काही वेळेस ग्रामीण पाणीपुरवठ्यावरही परिणाम होत असतो. आता १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून वीज बिल भरण्याची परवानगी मिळाल्यामुळे ग्रामपंचायतीची कटकट थांबणार आहे.

- बळीराम पाडवी, तालुकाध्यक्ष, सरपंच संघटना, तळोदा तालुका