शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

लघु सिंचन प्रकल्पांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्षच तळोदा तालुक्यातील सिंचन प्रकल्पानी गाठला तळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:31 IST

तळोदा तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता व्हावी, यासाठी सातपुड्याच्या पायथ्याशी रोझवा, पाडळपूर, गढावली, सिंगसपूर या लघुसिंचन ...

तळोदा तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता व्हावी, यासाठी सातपुड्याच्या पायथ्याशी रोझवा, पाडळपूर, गढावली, सिंगसपूर या लघुसिंचन प्रकल्पांची निर्मिती करण्यात आली आहे. परिसरातील भूजल पातळी वाढण्यास महत्वपूर्ण भूमिका असते. रोझवा जलसिंचन प्रकल्पाची एकूण जलसाठवणूक क्षमता १.७४ दशलक्ष घनमीटर आहे तर पाडळपूर प्रकल्पाची क्षमता १.१७ दशलक्ष घनमीटर, गढावली प्रकल्पाची ०.९४ दशलक्ष घनमीटर व सिंगसपूर प्रकल्पाची २.१७ दशलक्ष घनमीटर एवढी जलसाठा क्षमता आहे. सातपुड्याच्या पायथ्याशी दरवर्षी होणाऱ्या दमदार पावसामुळे चारही प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरतात. मात्र या प्रकल्पांच्या देखभाल दुरुस्तीकडे प्रशासनाकडून सातत्याने दुर्लक्ष करण्यात आले असून, या प्रकल्पांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून साठवण भिंतीना लागलेल्या गळतीमुळे या प्रकल्पातील मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे.

या प्रकल्पात असणाऱ्या जलसाठ्यावर सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या परिसरातील शेतकऱ्यांचा रब्बी व खरीप अनुदान अवलंबून असते. परंतु या प्रकल्पांच्या गळतीमुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाहत जाऊन प्रकल्पांचा मूळ हेतूच साध्य होत नसल्याचे दिसून येते. प्रकल्पातील पाण्याचा पूर्णक्षमतेने शेतकऱ्यांना वापर करता येत नाही.

दरवर्षी या प्रकल्पांची आवश्यक दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत असते, परंतु या प्रकल्पांच्या दुरुस्तीबाबत संबंधित विभागाकडून अद्याप अद्याप कोणत्याही प्रकारच्या ठोस उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. या लघु सिंचन प्रकल्पात होणारा पाणीसाठा वर्षभर टिकावा यासाठी पावसाळा सुरू होण्यापूर्वी या प्रकल्पांची गळती रोखण्यासाठी दुरुस्ती करणे गरजेचे आहे. संबधितानी लक्ष देण्याची गरज आहे.

सिंचन प्रकल्पांना गळती

दरवर्षी हे चारही प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरूनही सिंचन प्रकल्पांना असलेल्या गळतीमुळे प्रकल्पातील जलसाठा अल्पजीवी ठरत आहे. पाणी वाहून जात असल्याने उन्हाळ्याच्या सुरुवातीला यातील जवळपास सर्वच जलसिंचन प्रकल्प तळ गाठतात . प्रकल्पांना असणाऱ्या गळतीमुळे दरवर्षी हजारो लिटर पाणी वाहून जात असल्याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसतो.