शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; RCB च्या अधिकाऱ्यासह ४ जणांना अटक
2
'एपस्टाईन फाइल'मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव; मस्क यांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांवर टाकला मोठा बॉम्ब
3
“आता आमच्यातील मैत्री पुढे टिकेल का, ते माहिती नाही”; मस्क यांच्या विधानावर ट्रम्प थेट बोलले
4
भाजपासह काँग्रेसला खिंडार; माजी खासदार, पदाधिकारी अजित पवार गटात, NCPचे घड्याळ बांधले हाती
5
राजस्थानच्या आरोग्यमंत्र्यांच्या पत्नी रात्री जेवून झोपल्या, सकाळी उठल्याच नाहीत; सायलेंट हार्ट अटॅकने मृत्यू
6
१९५७पासून कुटुंब काँग्रेससोबत, पण आता २ बंधू शिवसेनेत; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश
7
बँक मॅनेजरने घरच्यांसह ग्राहकांच्या ११० खात्यातून काढले कोट्यवधि; शेअर मार्केटमध्ये टाकून फसली
8
लेख: आज दोस्ती आहे; पण उद्या कुस्ती होऊ शकते! महाराष्ट्राचं राजकारणात रंजक वळणावर
9
Raja Raghuvanshi : "बेटा, मला तुझी आठवण आली, तू काही खाल्लंस का?"; राजा रघुवंशीचा आईसोबतचा शेवटचा संवाद
10
१२ वर्षांनी बुध-गुरु युती: १६ दिवस ७ राशींना दुप्पट लाभ, व्यापार-नोकरीत यश; शुभ-कल्याण होईल!
11
"चीन १०० वर्षांच्या योजना आखतो, भारत भूतकाळात अडकलाय," दिग्गजानं फरक समजावून केलं मोठं वक्तव्य
12
आजचे राशीभविष्य: ०६ जून २०२५; आर्थिक लाभ होईल, खूप विचार व संताप मानसिक स्वास्थ्य बिघडवेल
13
मोदी पाकिस्तानशी जहाल भाषेत का बोलतात? ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरच्या भाषणात दिसली झलक
14
उद्धव-राज यांनीच एकमेकांशी बोलायला हवे, आम्ही बोलून फरक पडणार नाही- अमित ठाकरे
15
प्लास्टिकला नो, पर्यावरणाला हो म्हणा; पंकजा मुंडे यांचे आवाहन; प्लास्टिकविरोधी मोहीम सुरू
16
धारावी पुनर्वसन: भाजपाचे आशिष शेलार अन् काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांच्यात ‘तू तू मै मै’
17
अकरावी प्रवेश: येत्या रविवारी गुणवत्ता प्रवेश फेरी; १२.७ लाख विद्यार्थ्यांची नोंदणी; मुदत संपुष्टात
18
रेल्वे स्थानकांवरील प्रवाशांची सुरक्षितता अजूनही वाऱ्यावरच; आगीच्या घटनेने जनतेत राग
19
विधि सीईटीत १०० पर्सेंटाईलचे चार विद्यार्थी चौकशीच्या फेऱ्यात; गैरप्रकाराचा संशय
20
राज्यातील २९५ शिक्षण संस्थांची मान्यता रद्द; कामगिरी मूल्यांकन अहवाल न दिल्याने कारवाई

लघु सिंचन प्रकल्पांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्षच तळोदा तालुक्यातील सिंचन प्रकल्पानी गाठला तळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:31 IST

तळोदा तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता व्हावी, यासाठी सातपुड्याच्या पायथ्याशी रोझवा, पाडळपूर, गढावली, सिंगसपूर या लघुसिंचन ...

तळोदा तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता व्हावी, यासाठी सातपुड्याच्या पायथ्याशी रोझवा, पाडळपूर, गढावली, सिंगसपूर या लघुसिंचन प्रकल्पांची निर्मिती करण्यात आली आहे. परिसरातील भूजल पातळी वाढण्यास महत्वपूर्ण भूमिका असते. रोझवा जलसिंचन प्रकल्पाची एकूण जलसाठवणूक क्षमता १.७४ दशलक्ष घनमीटर आहे तर पाडळपूर प्रकल्पाची क्षमता १.१७ दशलक्ष घनमीटर, गढावली प्रकल्पाची ०.९४ दशलक्ष घनमीटर व सिंगसपूर प्रकल्पाची २.१७ दशलक्ष घनमीटर एवढी जलसाठा क्षमता आहे. सातपुड्याच्या पायथ्याशी दरवर्षी होणाऱ्या दमदार पावसामुळे चारही प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरतात. मात्र या प्रकल्पांच्या देखभाल दुरुस्तीकडे प्रशासनाकडून सातत्याने दुर्लक्ष करण्यात आले असून, या प्रकल्पांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून साठवण भिंतीना लागलेल्या गळतीमुळे या प्रकल्पातील मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे.

या प्रकल्पात असणाऱ्या जलसाठ्यावर सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या परिसरातील शेतकऱ्यांचा रब्बी व खरीप अनुदान अवलंबून असते. परंतु या प्रकल्पांच्या गळतीमुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाहत जाऊन प्रकल्पांचा मूळ हेतूच साध्य होत नसल्याचे दिसून येते. प्रकल्पातील पाण्याचा पूर्णक्षमतेने शेतकऱ्यांना वापर करता येत नाही.

दरवर्षी या प्रकल्पांची आवश्यक दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत असते, परंतु या प्रकल्पांच्या दुरुस्तीबाबत संबंधित विभागाकडून अद्याप अद्याप कोणत्याही प्रकारच्या ठोस उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. या लघु सिंचन प्रकल्पात होणारा पाणीसाठा वर्षभर टिकावा यासाठी पावसाळा सुरू होण्यापूर्वी या प्रकल्पांची गळती रोखण्यासाठी दुरुस्ती करणे गरजेचे आहे. संबधितानी लक्ष देण्याची गरज आहे.

सिंचन प्रकल्पांना गळती

दरवर्षी हे चारही प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरूनही सिंचन प्रकल्पांना असलेल्या गळतीमुळे प्रकल्पातील जलसाठा अल्पजीवी ठरत आहे. पाणी वाहून जात असल्याने उन्हाळ्याच्या सुरुवातीला यातील जवळपास सर्वच जलसिंचन प्रकल्प तळ गाठतात . प्रकल्पांना असणाऱ्या गळतीमुळे दरवर्षी हजारो लिटर पाणी वाहून जात असल्याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसतो.