शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
5
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
6
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
7
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
8
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
9
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
10
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
11
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
12
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
13
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
14
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
15
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
16
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
17
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
18
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
19
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
20
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?

कोरोनाच्या भितीने परदेशातून जिल्ह्यात येणाऱ्यांची होतेय चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2020 13:46 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात आपत्तीव्यवस्थापन २००५ च्या कायद्याची अंमलबजावणी सुरु झाली असून यांतर्गत विदेशातून परत येणाºया जिल्ह्यातील ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात आपत्तीव्यवस्थापन २००५ च्या कायद्याची अंमलबजावणी सुरु झाली असून यांतर्गत विदेशातून परत येणाºया जिल्ह्यातील रहिवाशांची चौकशी करण्यात येत आहे़ यात आतापर्यंत सात जणांची चौकशी पूर्ण झाली असून त्यांना १४ दिवस घराबाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे़जिल्हा रुग्णालयात यापूर्वी दाखल करण्यात आलेल्या दोघांचे रिपोर्ट नेगेटिव्ह आल्याचा खुलासा जिल्हा प्रशासनाने केला होता़ परंतू यानंतर दक्षता म्हणून त्यांना १४ दिवस घराबाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे़ त्यांच्यावर वैद्यकीय पथक नजर ठेवून असणार असल्याची माहिती देण्यात आली आहे़ दरम्यान कोरोनाच्या भितीने जिल्ह्यात चिंता निर्माण झाली आहे़ आरोग्य विभागाकडून या पार्श्वभूमीवर जिल्हा रुग्णालयासह दोन उपजिल्हा रुग्णालय आणि ११ ग्रामीण रुग्णालयात कक्षांची निर्मिती करण्यात आली आहे़ या कक्षांमध्ये रुग्णांवर उपचार करण्यासाठी नियुक्त करण्यात येणाºया डॉक्टर्सला प्रशिक्षित करण्यासाठी दोन दिवस शिबिरे घेण्यात येणार आहे़कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग, सामान्य रुग्णालय प्रशासन यांच्याकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत़ या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ ची कडक अंमलबजावणी सुरू आहे़ यांतर्गत शुक्रवारी दुपारी प्रशासनाकडून जिल्ह्यातून परदेशात गेलेले आणि परत येणाºया रहिवाशांची माहिती गोळा करणे सुरु करण्यात आले होते़ यातून पूर्वीचे तिघे आणि नव्याने चार असे एकूण सात जण विदेशातून परत आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाली होती़ यातील दोघे नंदुरबार तालुक्यातील रनाळे येथील तर दोघे हे नंदुरबार शहरातील असल्याची माहिती आहे़ दोघे धार्मिक कारणासाठी तर दोघे पर्यटनासाठी परदेशात जावून परत आले आहेत़ त्यांना जिल्हा रुग्णालयात बोलावून जिल्हा शल्यचिकित्सक डॉ़ रघुनाथ भोये यांच्या मार्गदर्शनातील पथकांनी तपासण्या करुन सर्व काही सुरळीत असल्याचे पाहून घरी जाण्याचे सांगितले होते़ परंतू १४ दिवस घराबाहेर पडू नये असा इशारा देत घरात बंदिस्त राहण्याच्या सूचना केल्या आहेत़ याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रघुनाथ भोये यांनी विदेशातून आलेल्या सातही प्रवाशांची चौकशी करुन त्यांना घरीच थांबवण्याच्या सूचना दिल्याच्या माहितीला दुजोरा दिला आहे़जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केल्यानंतर सनियंत्रण अधिकारी म्हणून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रघुनाथ भोये आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन बोडके यांची नियुक्ती करण्यात आली आहे़ सोबतच जिल्हा पोलिस विभाग आणि गृहविभाग यांना विदेशातून आलेल्या प्रवाशांची माहिती मिळवण्यासह शहरातील विविध हॉटेल व लॉज मालकांना परदेशातून येणाºया नागरिकांची माहिती देणे सक्तीचे करण्यात आले आहे़ आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत सायबर सेलच्या माध्यमातून सोशल मीडियावर नजर ठेवून अफवा पसरवणाऱ्यांवर आणि चुकीची माहिती देऊन समाजात गैरसमज निर्माण करणाºयांवर कारवाई करण्याचे आदेश काढण्यात आले आहेत़ यानुसार सायबर सेलकडून सोशल मिडियावर नजर ठेवली जात असल्याचे सांगण्यात आले आहे़